शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
4
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
5
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
6
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
7
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
8
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
9
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
10
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
11
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
12
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
13
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
14
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
15
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
16
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
17
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
19
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
20
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Daily Top 2Weekly Top 5

हात जोडून सरकारला विनंती; गरजेच्या वस्तू सगळेच देऊ, तुम्ही पूरग्रस्तांचं घर उभारा...सांभाळा!- शर्मिला ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 14:42 IST

शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारं साहित्य, वह्या, दफ्तरे याचा संपूर्ण खर्च मनसे पक्षाकडून केला जाणार आहे

सांगली - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावाला भेट दिली. पुरामध्ये या गावात बोट उलटून 16 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. शर्मिला ठाकरे यांनी गावातील लोकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ब्रह्मनाळ गावकऱ्यांच्या व्यथा ऐकून शर्मिला ठाकरे यांना अश्रू अनावर झाले. 

यावेळी माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, पुरामुळे लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मनसे सर्वोतोपरी मदत करणार आहे. या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. यामध्ये कोणतंही राजकारण नाही. मनसेचे कार्यकर्ते सुरुवातीपासून पूरग्रस्त भागात मदत करत आहेत असं त्यांनी सांगितले.   

तसेच सरकारला हात जोडून विनंती आहे की, पूरग्रस्तांसाठी गरजेच्या वस्तू सगळेच मिळून देत आहोत. अनेकांकडून मदतीचा ओघ सुरु आहे. मात्र पुरामुळे लोकांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहे. त्यांच्या घरातलं सामान, जनावरं, माणसे गेली आहेत. संपूर्ण माणूस सरकारला पुन्हा उभा करावा लागणार आहे. बाकीच्या सगळ्या वस्तू येतील पण सरकारने पूरग्रस्तांची घरं उभारा असं आवाहन शर्मिला ठाकरेंनी सरकारला केलं आहे. 

दरम्यान ब्रह्मनाळ गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारं साहित्य, वह्या, दफ्तरे याचा संपूर्ण खर्च मनसे पक्षाकडून केला जाणार आहे अशी माहिती शर्मिला ठाकरेंनी दिली. सांगली दौऱ्याआधी शर्मिला यांनी कराडमधील पूरग्रस्त गावांना भेट दिली. 

निसर्ग हा सगळ्यापेक्षा मोठा आहे. त्याच्यापुढे आपले काहीही चालू शकत नाही. अतिवृष्टी अन् महापूर ही मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. सरकारचे प्रयत्न त्यापुढे पुरूच शकत नाहीत. यातून बाहेर पडण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळेच मनसे पूरग्रस्तांबरोबर आहे असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं.

पुरामध्ये अनेकांच्या घराची पडझड झाली आहे. घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झालं आहे. पूर ओसरल्यानंतर ही घरं धोकादायक झाली आहे. त्यामुळे सरकारने त्यांना पक्की घरं उभारुन द्यावी असं आवाहन शर्मिला ठाकरे यांनी केलं आहे. 

टॅग्स :MNSमनसेSangli Floodसांगली पूरSatara Floodसातारा पूर