शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महामार्गबाधित मोठ्या झाडांचे पुनर्राेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:17 IST

मिरजेतील शिल्पकार विजय गुजर यांनी १५ वर्षात आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, रामफळ अशा विविध वृक्षांचे संगोपन केले आहे. या बहरलेल्या वृक्षांवर विविध प्रकारचे पक्षी वास्तव्याला आहेत.

ठळक मुद्देपर्यावरणपूरक पाऊल : शिल्पकार विजय गुजर यांचा उपक्रम

मिरज : मिरजेतील शिल्पकार विजय गुजर यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी संपादित केलेल्या कळंबीजवळ शेतजमिनीत असलेली सुमारे ७० आंबा व नारळाची झाडे क्रेनच्या साहाय्याने उचलून त्यांचे पुनर्रोपण केले आहे. महामार्गासाठी हजारो झाडे तोडण्यात येत असताना, पदरमोड करीत मोठा खर्च करून शेतातील झाडे वाचविण्याची विजय गुजर यांची ही धडपड पर्यावरणासाठी आदर्शवत ठरली आहे.

मिरज तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर या महामार्गासाठी जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. या संपादित जमिनीत असलेल्या झाडांची शेतकऱ्यांना भरपाई देऊन अनेक गावांतील शेतांमध्ये व रस्त्याकडेला असणारी झाडे तोडण्यात येणार आहेत. यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे.

मिरजेतील शिल्पकार विजय गुजर यांनी कळंबी गावच्या हद्दीत असलेल्या शेतात १५ वर्षांपूर्वी मोठे शिल्पसंग्रहालय व विविध प्रकारची फळझाडे लावली होती. गुजर यांनी १५ वर्षात आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, रामफळ अशा विविध वृक्षांचे संगोपन केले आहे. या बहरलेल्या वृक्षांवर विविध प्रकारचे पक्षी वास्तव्याला आहेत. शेतात अनेक लहान-मोठ्या शिल्पकृतीही ठेवल्या आहेत. शेतात ३० फूट उंचीचे मारुतीचे भव्य शिल्प मिरज-पंढरपूर मार्गावर नजरेस पडते. मात्र महामार्गासाठी संपादित होणाºया दीड एकर शेतजमिनीत पंधरा वर्षे जोपासलेली ४० आंब्याची, ३० नारळाची झाडे व अन्य फळझाडेही नष्ट होणार असल्याने, विजय गुजर यांनी या झाडांचे पुनर्रोपण करण्याचा निश्चय केला.

गेला महिनाभर या झाडांच्या पुनर्राेपणाचे काम सुरू असून यासाठी जेसीबी, पोकलॅन व क्रेनचा वापर करण्यात येत आहे. जेसीबीने झाडांभोवती खड्डा काढून मुळांसह झाडे क्रेनच्या साहाय्याने उचलून तेथून काही अंतरावर असलेल्या शेतजमिनीत मोठा खड्डा काढून तेथे या झाडांचे रोपण करण्यात येत आहे.

पर्यावरणप्रेमींना दिलासापुनर्राेपण केलेली झाडे पुन्हा पूर्वीप्रमाणे जगतील, बहरतील व पर्यावरणाची हानी टाळता येईल, असा विश्वास गुजर यांनी व्यक्त केला. मिरज-पंढरपूर रस्त्यावर महामार्गासाठी हजारो झाडे तोडण्यात येत असताना, झाडांचे पुनर्राेपण करण्याचे विजय गुजर यांचे प्रयत्न पर्यावरणप्रेमींना दिलासा देणारे आहेत.

 

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्ग