शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी पालकत्वापासून सांगली जिल्ह्याची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 15:02 IST

पुन्हा एकदा जिल्ह्यातील नेत्यांकडे पालकमंत्रीपद येणार असून, जयंत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे.

सांगली : गेल्या पाच वर्षापासून बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांच्या हाती असणारे जिल्ह्याचे प्रभारी पालकत्व आता संपणार आहे. पुन्हा एकदा जिल्ह्यातील नेत्यांकडे पालकमंत्रीपद येणार असून, जयंत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणारे विकास कामांसाठी पालकमंत्रीपद महत्वाचे आहे.

गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडीनंतर महाविकास आघाडीची अखेर सत्ता आली आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्याच टप्प्यात जिल्ह्यातून जयंत पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप बाकी असला तरी, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पाटील यांच्याकडेच जबाबदारी येणार, हे निश्चित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातीलच नेत्याला हे महत्त्वाचे पद मिळणार आहे.

महायुतीच्या कालावधित गेल्या पाच वर्षापासून सुरुवातीला कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील व त्यानंतर सोलापूरच्या सुभाष देशमुख यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. मात्र, जिल्ह्यातील कामकाजात अपवाद वगळता त्यांचा सहभागच जाणवत नसे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी आल्यानंतर, तातडीने आपापल्या जिल्ह्यात परत जाण्यासाठी त्यांची लगबग असे. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील प्रश्न तडीस नेण्याबाबतही दोघांची धडपड अपवादानेच दिसून आल्याने, जिल्ह्यातील मंत्री पालकमंत्री असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.

नव्या सरकारमध्ये पालकमंत्री पदाची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे येणार हे निश्चित आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देताना पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची ठरत असते. जिल्हा परिषदेसह अन्य यंत्रणांना द्यावयाचा निधी, त्याचा विनियोग यासह पायाभूत सुविधांचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठीही पालकमंत्री महत्वाची भूमिका बजावत असल्याने, जिल्ह्यातील मंत्र्याकडे पालकत्व असणे आवश्यक असते. ती अपेक्षा आता पूर्ण होणार आहे.

पतंगरावांची कामगिरी 'लय भारी'!

आघाडी सरकारच्या कालावधित पतंगराव कदम यांच्याकडे कोणत्याही विभागाचे मंत्रीपद असले तरी, जिल्ह्याचे पालकमंत्री पद मात्र कायम होते. यामुळेच त्यांची जिल्ह्यातील ओळख पालकमंत्री अशीच होती. अधिकाऱ्यांना केवळ सूचना न देता, त्याक्षणीच आदेश देत काम मार्गी लावण्यात पतंगरावांचा हातखंडा होता. जिल्हा नियोजनच्या बैठकांतही चर्चेचे गुहाळ ठेवता जागच्या जागी निर्णय घेत समोरच्याला दिलासा मिळत असल्याने, पालकमंत्री म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय अशीच ठरली होती.