शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

प्रभारी पालकत्वापासून सांगली जिल्ह्याची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 15:02 IST

पुन्हा एकदा जिल्ह्यातील नेत्यांकडे पालकमंत्रीपद येणार असून, जयंत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे.

सांगली : गेल्या पाच वर्षापासून बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांच्या हाती असणारे जिल्ह्याचे प्रभारी पालकत्व आता संपणार आहे. पुन्हा एकदा जिल्ह्यातील नेत्यांकडे पालकमंत्रीपद येणार असून, जयंत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणारे विकास कामांसाठी पालकमंत्रीपद महत्वाचे आहे.

गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडीनंतर महाविकास आघाडीची अखेर सत्ता आली आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्याच टप्प्यात जिल्ह्यातून जयंत पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप बाकी असला तरी, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पाटील यांच्याकडेच जबाबदारी येणार, हे निश्चित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातीलच नेत्याला हे महत्त्वाचे पद मिळणार आहे.

महायुतीच्या कालावधित गेल्या पाच वर्षापासून सुरुवातीला कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील व त्यानंतर सोलापूरच्या सुभाष देशमुख यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. मात्र, जिल्ह्यातील कामकाजात अपवाद वगळता त्यांचा सहभागच जाणवत नसे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी आल्यानंतर, तातडीने आपापल्या जिल्ह्यात परत जाण्यासाठी त्यांची लगबग असे. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील प्रश्न तडीस नेण्याबाबतही दोघांची धडपड अपवादानेच दिसून आल्याने, जिल्ह्यातील मंत्री पालकमंत्री असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.

नव्या सरकारमध्ये पालकमंत्री पदाची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे येणार हे निश्चित आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देताना पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची ठरत असते. जिल्हा परिषदेसह अन्य यंत्रणांना द्यावयाचा निधी, त्याचा विनियोग यासह पायाभूत सुविधांचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठीही पालकमंत्री महत्वाची भूमिका बजावत असल्याने, जिल्ह्यातील मंत्र्याकडे पालकत्व असणे आवश्यक असते. ती अपेक्षा आता पूर्ण होणार आहे.

पतंगरावांची कामगिरी 'लय भारी'!

आघाडी सरकारच्या कालावधित पतंगराव कदम यांच्याकडे कोणत्याही विभागाचे मंत्रीपद असले तरी, जिल्ह्याचे पालकमंत्री पद मात्र कायम होते. यामुळेच त्यांची जिल्ह्यातील ओळख पालकमंत्री अशीच होती. अधिकाऱ्यांना केवळ सूचना न देता, त्याक्षणीच आदेश देत काम मार्गी लावण्यात पतंगरावांचा हातखंडा होता. जिल्हा नियोजनच्या बैठकांतही चर्चेचे गुहाळ ठेवता जागच्या जागी निर्णय घेत समोरच्याला दिलासा मिळत असल्याने, पालकमंत्री म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय अशीच ठरली होती.