शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक पाणी योजनांना घरघर

By admin | Updated: November 18, 2014 23:23 IST

अनुदान बंदच : ४४ गावांतील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती

अमित काळे: तासगाव ::गावपातळीवर पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांबाबत ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रडतखडत सुरू असणाऱ्या या योजनांवर हजारो कुटुंबांची पाण्यासाठी भिस्त आहे. योजनेचे उत्पन्न व येणारा खर्च याचा मेळ व्यवहारात बसत नसल्यामुळे ‘योजना बंद’ पडण्याचा त्रास सर्वसामान्यांना भोगावा लागतो. प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांचे अनुदान बंद झाल्यापासून योजनांची गाडी रुळावरून घसरली. यावर कायमस्वरूपी उपाययोजना न करता जुजबी मलमपट्टी करून पाणी पुरवठा सुरू आहे. कवठेमहांकाळ, येळावी, मणेराजुरी योजनांची वीजबिल थकबाकी १० कोटींच्या घरात आहे. १० कोटींची थकबाकी असूनही वीज वितरण कंपनीने यांचा विजेचा पुरवठा सुरू ठेवला आहे. मात्र पैसे भरलेच जात नाहीत, असे निदर्शनास आल्यावर वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे सुमारे ४४ गावांचा पुरवठा बंद झाला. सध्या प्रत्येक कुटुंबाला १ हजार ८०० रुपये पाणीपट्टी आकारली जाते. सार्वजनिक कनेक्शनला ५०० रुपये आकार आहे. तासगावच्या अखत्यारितील सर्व योजनांची १०० टक्के वसुली झाली तरी, ती १ कोटी २० लाखांपर्यंत जाते व महिन्याची वीज बिले २५ ते २७ लाखांपर्यंत येतात. वर्षाला वीज बिलेच ११ कोटी ५८ लाखांपर्यंतची आहेत. याशिवाय योजनेचा इतर खर्चही आहे. एकत्रितरित्या हा खर्च ४० लाखांपर्यंतचा आहे. मुळात पाणीपट्टी १०० टक्के वसूल होत नाही. ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत वसुली आहे. अपवादात्मक परिस्थितीत १०० टक्के वसुलीचे गाव आहे. पाणी पुरवठ्यासाठी वीज वितरण कंपनीने बिलाची आकारणी कमी दराने करावी, अशी पाणी पुरवठा विभागाची मागणी आहे. हा दर कमी होत नाही, तोवर वाढीव वीजबिले येणार आहेत. योजनेच्या देखभाल, दुरुस्तीचे अनुदानही शासनाकडून मिळत नाही.वीज बिलाच्याबाबतीत जेवढे बिल भरले जाईल, त्याच्या ५० टक्के अनुदान मिळत असते. पण इथे वीज बिल भरायचाच प्रश्न असल्याने अनुदान केव्हा मिळणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रादेशिक योजनांबाबतीत शासनाने ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ज्या गावांमध्ये पाण्याचे स्थानिक स्त्रोत उपलब्ध आहेत, ज्यांनी पूरक योजना तयार केल्या आहेत तिथे मोठी समस्या जाणवत नाही. परंतु ज्या गावामध्ये काहीच पर्याय नाही, त्यांनी पाणी कुठून प्यायचे, हा प्रश्न आहे. त्यांना टँकरशिवाय पर्यायच नाही.वीज बिल थकले म्हणून कनेक्शन तोडून योजना बंद करण्याचा हा पहिलाच प्रकार घडला, असे नाही. योजना बंद करण्यात आल्या होत्या.पाण्यासाठी कमी दराने आकारणी हवीमुळात पाणीपट्टी १०० टक्के वसूल होत नाही. ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत सरासरी वसुली आहे. अपवादात्मक परिस्थितीत १०० टक्के वसुलीचे गाव आहे. पाणी पुरवठ्यासाठी वीज वितरण कंपनीने कमी दराने आकारणी करावी, अशी पाणी पुरवठा विभागाची मागणी आहे. हा दर कमी होत नाही, तोवर वाढीव वीजबिले येणार आहेत. योजनेच्या देखभाल, दुरुस्तीचे अनुदानही शासनाकडून मिळत नाही.