शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सांगली महापालिकेत मार्चमध्ये होणार भरती, आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 17:44 IST

लवकरच पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होणार

सांगली : महापालिकेची पदोन्नतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच ती पूर्ण केली जाईल. पदोन्नतीनंतर रिक्त होणाऱ्या जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाईल. रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया मार्चमध्ये सुरू होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिली.जनसुराज्य पक्षाचे समित कदम,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, एमआयएमचे डॉ. महेशकुमार कांबळे, माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, गॅब्रिएल तिवडे आदींच्या शिष्टमंडळाकडून पदोन्नतीबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेवेळी भरती प्रक्रियेचा विषय आयुक्त गुप्ता यांनी स्पष्ट केला. पदोन्नतीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील सुमारे साडेचारशे ते पाचशे जागा रिक्त होतील. या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नवीन भरतीमुळे प्रशासन आणखी गतिमान होईल, असे मतही गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केले.

तीन शहरांची महापालिका १९९८ मध्ये स्थापन झाली. त्यावेळी सांगली नगरपालिकेतील १ हजार ५५४, मिरज नगरपालिकेतील ४५२, कुपवाड नगरपालिकेतील १५६ कर्मचाऱ्यांचा महापालिकेत समावेश झाला. सध्या महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची २ हजार ४०६ पदे मंजूर आहेत. त्यातील आठशेहून अधिक पदे रिक्त आहेत. दोन वर्षांपूर्वी महापालिकेने नवीन आकृतिबंध शासनाला सादर केला होता. त्याला शासनाकडून मान्यता मिळाली होती; परंतु त्यानंतर तांत्रिक कारणातून ही भरती प्रक्रिया रखडली. रिक्त पदांच्या भरतीचा विषय अनेकदा चर्चेत आला. मात्र, पदोन्नतीच्या नावाखाली ही प्रक्रिया रखडत गेली.महापालिकेत २००४ पासून भरती प्रक्रियाच राबवण्यात आली नाही. सध्याच्या प्रशासकीय काळात पालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने हा मुद्दा पुढे आणण्यात आला. पदोन्नतीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. महिना अखेरपर्यंत पदोन्नतीचे काम पूर्ण होणार आहे. सव्वादोनशे कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर रिक्त द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील साडेचारशे ते पाचशे कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. साधारणपणे मार्च महिन्यात भरतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.

हरकतीवरील सुनावणीनंतरच घरपट्टीवाढीव घरपट्टीबाबत शिष्टमंडळाने आयुक्त गुप्ता यांच्याशी चर्चा केली. ज्यांनी वाढीव घरपट्टीबाबत हरकती दाखल केलेल्या आहेत, त्यावर सुनावणी घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. वाढीव घरपट्टीबाबत कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :Sangliसांगली