शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने उमेदवारी डावलल्यास बंडखोरी, जयश्रीताई पाटील यांचा सांगली विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 17:59 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून माझ्या उमेदवारीला हिरवा कंदील

सांगली : मागील विधानसभा निवडणुकीत मीच काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेतला होता. माझ्या कार्यकर्त्यांनीही त्यांचे मनापासून काम केले. या वर्षी मी इच्छुक असल्यामुळे पृथ्वीराज पाटील यांनी थांबावे आणि मला पाठिंबा द्यावा, असे आवाहन काँग्रेसच्या नेत्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील बुधवारी पत्रकार परिषदेत केले. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही माझ्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखविला आहे, असेही त्या म्हणाल्या.जयश्रीताई पाटील म्हणाल्या, मदन पाटील यांचे निधन झाल्यामुळे २०१९ ची विधानसभा निवडणूक मी लढणार नाही, असे पक्षाला स्पष्ट सांगितले होते. त्यानंतर सर्वांच्या चर्चेतूनच पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाली. पक्षाचा आदेश समजून मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. पृथ्वीराज पाटील यांनीही “आता मदत करा, पुढे मी तुम्हाला मदत करणार आहे,” असे स्पष्ट केले होते. दिलेल्या शब्दानुसार पृथ्वीराज पाटील यांनी मला पाठिंबा देऊन विजयासाठी मदत करावी. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईत दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. पटोले यांनीही तुम्ही कामाला सुरुवात करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा शब्द दिला आहे. खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचाही माझ्या उमेदवारीसाठी पाठिंबा आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील ३० नगरसेवक आणि कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. म्हणूनच काँग्रेस पक्षाकडून निश्चित मला उमेदवारी मिळणार आहे. त्यादृष्टीने माझे काम सुरू आहे. कार्यकर्त्यांनीही सांगली विधानसभा मतदारसंघात काम सुरू ठेवले आहे.

काँग्रेसने उमेदवारी डावलल्यास बंडखोरीकाँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मागील विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस नेत्यांनी सांगली विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द दिला आहे. यातूनही काँग्रेसने उमेदवारी डावलल्यास बंडखोरी करून सांगली विधानसभा निवडणूक लढविणार आहे. तसेच जिंकूनही दाखविणार, असा विश्वास जयश्रीताई पाटील यांनी व्यक्त केला.

२५ टक्के महिलांना उमेदवारीकाँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत महिलांना २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सांगली विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारी देऊन पक्षाने दिलेला शब्द पाळावा, अशी मागणीही जयश्रीताई यांनी केली.

पोस्टरबाजी करून उमेदवारी मिळत नाहीकाँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांच्या कामाला महत्त्व दिले जाते. केवळ पोस्टरबाजी करून उमेदवारी मिळत नाही, असा टोलाही जयश्रीताई यांनी पृथ्वीराज पाटील यांचे नाव न घेता लगावला. तसेच आम्ही आमच्या कर्तृत्वावर उमेदवारी मागत आहोत, असेही स्पष्ट केले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेस