शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

चांदोली धरणाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे-: राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मातीचे धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 01:01 IST

देशात संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविली जात आहे. मात्र, शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देसीसीटीव्ही, पथदिवे बंद ; शासनाने गंभीर दखल घेण्याची गरज

गंगाराम पाटील ।वारणावती : देशात संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविली जात आहे. मात्र, शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. येथील पथदिवे आणि सीसीटीव्ही बंद असून धरणाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरण ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे राज्यातील मातीचे सर्वांत मोठे धरण आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणारे हे जंगलातील व डोंगर-दऱ्यातील धरण आहे. जवळच चांदोली राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प असल्याने हा परिसर संवेदनशील आहे.नुकत्याच घडलेल्या पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या धरण परिसरात अखंड वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवावेत व कडक सुरक्षा व्यवस्था ठेवणे गरजेचे आहे. या धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने परिसरात कोणत्याही प्रकारची चोख व्यवस्था नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी, धनगरवाडा, अंबाईवाडी, तनाळी या परिसरातून, तर शिराळा व पाटण तालुक्यातील डोंगर-दºयातून धरणाच्या परिसरात सहज प्रवेश करून माहिती घेऊन कधीही शत्रूकडून धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे चारही बाजूंनी धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शासनाने पाऊल उचलले पाहिजे.दिव्याखाली अंधारएवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साठवण क्षमता असलेल्या चांदोली धरणाच्या पाण्यावर १६ मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते, तर नव्यानेच कार्यान्वित झालेल्या सोनवडे जलविद्युत प्रकल्पातून ४ मेगावॅट वीज निर्मिती होते. एकूण २० मेगावॅट विजेची निर्मिती या धरणाच्या पाण्यावर केली जाते. पण या धरणाच्या माथ्यावरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. धरण प्रशासन गांधारीची भूमिका घेत आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे कळविले असल्याचे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात दिव्याखाली अंधारच दिसत आहे.परिसर संवेदनशीलपावसाचे आगर समजल्या जाणाºया या परिसरात धुवांधार पाऊस पडतो. वार्षिक साडेतीन ते चार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. सभोवताली डोंगर-दºया, घनदाट जंगल, तसेच शेजारी चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. दुर्गम असला तरी हा परिसर संवेदनशील असल्याने सुरक्षा व्यवस्था मजबूत असण्याची गरज आहे.पोलीस चौक्यांचीही दुरवस्थाचांदोली धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पायथ्याजवळ पोलीस कर्मचाऱ्यांसाठी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. या चौक्यांना अद्याप विद्युत व पाणी पुरवठा दिलेला नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना अंधारात व उघड्यावरच धरणाचे रक्षण करण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

टॅग्स :Damधरण