शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरणाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे-: राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मातीचे धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 01:01 IST

देशात संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविली जात आहे. मात्र, शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देसीसीटीव्ही, पथदिवे बंद ; शासनाने गंभीर दखल घेण्याची गरज

गंगाराम पाटील ।वारणावती : देशात संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविली जात आहे. मात्र, शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. येथील पथदिवे आणि सीसीटीव्ही बंद असून धरणाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरण ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे राज्यातील मातीचे सर्वांत मोठे धरण आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणारे हे जंगलातील व डोंगर-दऱ्यातील धरण आहे. जवळच चांदोली राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प असल्याने हा परिसर संवेदनशील आहे.नुकत्याच घडलेल्या पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या धरण परिसरात अखंड वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवावेत व कडक सुरक्षा व्यवस्था ठेवणे गरजेचे आहे. या धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने परिसरात कोणत्याही प्रकारची चोख व्यवस्था नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी, धनगरवाडा, अंबाईवाडी, तनाळी या परिसरातून, तर शिराळा व पाटण तालुक्यातील डोंगर-दºयातून धरणाच्या परिसरात सहज प्रवेश करून माहिती घेऊन कधीही शत्रूकडून धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे चारही बाजूंनी धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शासनाने पाऊल उचलले पाहिजे.दिव्याखाली अंधारएवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साठवण क्षमता असलेल्या चांदोली धरणाच्या पाण्यावर १६ मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते, तर नव्यानेच कार्यान्वित झालेल्या सोनवडे जलविद्युत प्रकल्पातून ४ मेगावॅट वीज निर्मिती होते. एकूण २० मेगावॅट विजेची निर्मिती या धरणाच्या पाण्यावर केली जाते. पण या धरणाच्या माथ्यावरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. धरण प्रशासन गांधारीची भूमिका घेत आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे कळविले असल्याचे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात दिव्याखाली अंधारच दिसत आहे.परिसर संवेदनशीलपावसाचे आगर समजल्या जाणाºया या परिसरात धुवांधार पाऊस पडतो. वार्षिक साडेतीन ते चार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. सभोवताली डोंगर-दºया, घनदाट जंगल, तसेच शेजारी चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. दुर्गम असला तरी हा परिसर संवेदनशील असल्याने सुरक्षा व्यवस्था मजबूत असण्याची गरज आहे.पोलीस चौक्यांचीही दुरवस्थाचांदोली धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पायथ्याजवळ पोलीस कर्मचाऱ्यांसाठी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. या चौक्यांना अद्याप विद्युत व पाणी पुरवठा दिलेला नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना अंधारात व उघड्यावरच धरणाचे रक्षण करण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

टॅग्स :Damधरण