शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

राजू शेट्टींनी आंदोलन करण्यापेक्षा साखर विकत घ्यावी-सुभाष देशमुख यांची खोचक टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 21:52 IST

एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हे आंदोलन करत आहेत. साखरेला बाजारपेठेत उठावच नसल्याने कारखान्यांमध्ये साखर पडून आहे. शेट्टींनी साखर विकत घेण्याची भूमिका घेतली

ठळक मुद्देकारखानदारांचा फॉर्म्युला ‘स्वाभिमानी’ला मान्य नसल्यामुळेच उसाची बिले लांबली

सांगली : एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हे आंदोलन करत आहेत. साखरेला बाजारपेठेत उठावच नसल्याने कारखान्यांमध्ये साखर पडून आहे. शेट्टींनी साखर विकत घेण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी आता शिल्लक राहिलेली साखर विकत घ्यावी आणि शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळवून द्यावी, अशी खोचक टीका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शेट्टी यांच्यावर शुक्रवारी सांगलीत केली. कारखानदारांना मी तसे आवाहन केल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

 

साखर कारखाने सुरू होऊन तीन महिन्यांचा काळ उलटला तरी शेतकºयांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. कारखानदारांनी काढलेला ७०:३० हा फॉर्म्युला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नाही. संघटनेने एकरकमी एफआरपीसाठी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची भूमिका घेतली आहे, आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. यावर पत्रकारांनी सहकारमंत्री देशमुख यांना विचारले असता ते बोलत होते. त्यांच्याहस्ते सांगलीमध्ये महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या बेघर निवारा केंद्राचे उद्घाटन झाले.

ते पुढे म्हणाले, एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हे पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. साखरेला बाजारपेठेत उठावच नसल्याने कारखान्यांमध्ये साखर शिल्लक आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. राजू शेट्टींनी मध्यंतरी साखर विकत घेण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी आता शिल्लक राहिलेली साखर विकत घ्यावी आणि शेतकºयांना एकरकमी एफआरपी मिळवून द्यावी. राज्यातील साखर कारखानदारांना आवाहन करतो की, त्यांनी राजू शेट्टी यांना साखर विकत द्यावी आणि एफआरपीचा तोडगा काढावा. शेतकºयांना वेळेत उसाची बिले मिळावीत, हीच सरकारची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने अधिकाºयांशी माझी सारखी चर्चा सुरु आहे. साखर कारखानदारांशी चर्चा केली असता, ते साखरेला दर नसल्याचे सांगत आहेत. शासनाकडून काही मदत करुन एफआरपीची रक्कम देण्याच्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत, असेही सुभाष देशमुख म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, शेट्टी म्हणत आहेत की सहकार मंत्र्यांच्याच कारखान्याची एफआरपी थकीत आहे. पण शेतकºयांना १०० टक्के एफआरपीची रक्कम मिळणार आहे हे निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.भाजप-सेना युती होणारचलोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. भाजपनेही निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत आमची युती होणारच आहे, त्यात काही शंका नाही. काही नेत्यांचे मतभेद हे होत असतात. यावर मार्ग काढून नेत्यांचे मतभेद मिटवून तोडगा काढून युती होईलच, असा विश्वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीPoliticsराजकारणSugar factoryसाखर कारखाने