शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
2
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
3
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
5
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
6
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
7
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
8
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
9
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
10
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
11
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
12
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
13
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
14
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
15
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
16
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
17
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
18
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
19
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
20
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टींनी आंदोलन करण्यापेक्षा साखर विकत घ्यावी-सुभाष देशमुख यांची खोचक टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 21:52 IST

एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हे आंदोलन करत आहेत. साखरेला बाजारपेठेत उठावच नसल्याने कारखान्यांमध्ये साखर पडून आहे. शेट्टींनी साखर विकत घेण्याची भूमिका घेतली

ठळक मुद्देकारखानदारांचा फॉर्म्युला ‘स्वाभिमानी’ला मान्य नसल्यामुळेच उसाची बिले लांबली

सांगली : एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हे आंदोलन करत आहेत. साखरेला बाजारपेठेत उठावच नसल्याने कारखान्यांमध्ये साखर पडून आहे. शेट्टींनी साखर विकत घेण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी आता शिल्लक राहिलेली साखर विकत घ्यावी आणि शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळवून द्यावी, अशी खोचक टीका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शेट्टी यांच्यावर शुक्रवारी सांगलीत केली. कारखानदारांना मी तसे आवाहन केल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

 

साखर कारखाने सुरू होऊन तीन महिन्यांचा काळ उलटला तरी शेतकºयांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. कारखानदारांनी काढलेला ७०:३० हा फॉर्म्युला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नाही. संघटनेने एकरकमी एफआरपीसाठी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची भूमिका घेतली आहे, आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. यावर पत्रकारांनी सहकारमंत्री देशमुख यांना विचारले असता ते बोलत होते. त्यांच्याहस्ते सांगलीमध्ये महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या बेघर निवारा केंद्राचे उद्घाटन झाले.

ते पुढे म्हणाले, एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हे पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. साखरेला बाजारपेठेत उठावच नसल्याने कारखान्यांमध्ये साखर शिल्लक आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. राजू शेट्टींनी मध्यंतरी साखर विकत घेण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी आता शिल्लक राहिलेली साखर विकत घ्यावी आणि शेतकºयांना एकरकमी एफआरपी मिळवून द्यावी. राज्यातील साखर कारखानदारांना आवाहन करतो की, त्यांनी राजू शेट्टी यांना साखर विकत द्यावी आणि एफआरपीचा तोडगा काढावा. शेतकºयांना वेळेत उसाची बिले मिळावीत, हीच सरकारची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने अधिकाºयांशी माझी सारखी चर्चा सुरु आहे. साखर कारखानदारांशी चर्चा केली असता, ते साखरेला दर नसल्याचे सांगत आहेत. शासनाकडून काही मदत करुन एफआरपीची रक्कम देण्याच्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत, असेही सुभाष देशमुख म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, शेट्टी म्हणत आहेत की सहकार मंत्र्यांच्याच कारखान्याची एफआरपी थकीत आहे. पण शेतकºयांना १०० टक्के एफआरपीची रक्कम मिळणार आहे हे निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.भाजप-सेना युती होणारचलोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. भाजपनेही निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत आमची युती होणारच आहे, त्यात काही शंका नाही. काही नेत्यांचे मतभेद हे होत असतात. यावर मार्ग काढून नेत्यांचे मतभेद मिटवून तोडगा काढून युती होईलच, असा विश्वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीPoliticsराजकारणSugar factoryसाखर कारखाने