शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राजकारणाच्या आखाड्यात शत्रूचा शत्रू तोच आपला दोस्त; राजू शेट्टींचा फंडा, मातोश्रीवरील भेटीने चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 16:23 IST

जाहीरनाम्याचा पंचनामा अन् नवा डाव..

अशोक पाटीलइस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून २०२४ च्या मैदानात एकला चलोची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सुरुवातीला घेतली होती. मात्र, अचानक त्यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांच्याशी खलबते केली. या भेटीने आगामी लोकसभेसाठी शत्रूचा शत्रू तो आपला दोस्त असा राजकीय फंडा घेऊन शेट्टी यांनी नवीन डाव टाकल्याची चर्चा आहे.एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी आपला वाढदिवस जोरदार साजरा करून हातकणंगलेतून आपली उमेदवारीच जाहीर केली. त्यामुळे भाजप नेत्यांच्यात अस्वस्थता वाढली आहे. तरीसुध्दा भाजपकडून उमेदवारीची चाचपणी केली जात आहे. महायुतीमध्ये ही खलबते सुरू असताना राजू शेट्टी यांनी अचानक मातोश्री गाठल्याने पुन्हा राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

सुरुवातीला राजू शेट्टी यांनी स्वबळाचा नारा पुकारला होता. मात्र, मातोश्रीच्या भेटीवर त्यांनी वेगळी प्रतिक्रिया देऊन या भेटीला वेगळे वळण दिले. तरीही हातकणंगले मतदार संघात उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेची ताकद आजही आहे, हे नाकारता येणार नाही. सध्या ठाकरे गट इंडिया आघाडीत सामील आहे. शरद पवार प्रणित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही या आघाडीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचाही आपण पाठिंबा मिळवू शकतो, असा डाव शेट्टींच्या मातोश्रीवरील भेटीमागील आहे. हा नवीन डाव लपून राहणारा नाही.

जाहीरनाम्याचा पंचनामा अन् नवा डाव..राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने महाविकास आघाडीत चर्चेला उधाण आले. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशिल माने यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील निधीचा जाहीरनामाच प्रसिद्ध केला. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक लक्ष्य ठेवून आहेत. तर राजू शेट्टी यांनीही माने यांनी दिलेल्या निधीचा पंचनामा केला आहे. एकंदरीत या मतदार संघात माने आणि शेट्टी यांच्यातच लढत होणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय शत्रू असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जावून नवीन डाव टाकला आहे.

पाटगाव (जि. कोल्हापूर) येथील अदानी उद्योगसमूहाने वीजनिर्मितीसाठी कोकणात पाणी जाऊन वाया जाणार आहे. त्यामुळेच इचलकरंजी शहराला पिण्याच्या पाण्याचा फटका बसणार आहे. यासाठी या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी राजू शेट्टी मातोश्रीवर गेले होते. लोकसभेपर्यंत अजून बरेच पाणी पुलाखालून जाणार आहे. - भागवत जाधव, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीlok sabhaलोकसभा