शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सांगलीच्या राजकीय आखाड्यात आणखी एक 'पैलवान'; राजू शेट्टींनी जाहीर केला स्वाभिमानीचा उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 11:09 IST

Raju Shetty: राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सांगलीच्या राजकीय आखाड्यात एंट्री झाली आहे.

Sangli Lok Sabha ( Marathi News ) :सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र महाविकास आघाडीत उमेदवारीवरून मोठा कलगीतुरा रंगला आणि अखेर ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्याचा निर्णय झाला. उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने नाराज असलेले काँग्रेस नेते विशाल पाटील हे सध्या बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सांगलीच्या राजकीय आखाड्यात एंट्री झाली असून शेट्टी यांच्याकडून महेश खराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेल्याने काँग्रेसचे विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीकडून लढणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली आणि विशाल पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर यंदा महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहावा, यासाठी आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात सांगली जिल्हा काँग्रेसने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र तरीही ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली. त्यामुळे नाराज झालेले विशाल पाटील हे अन्य पर्यायांच्या शोधात असताना स्वाभिमानीच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवण्याचाही पर्याय त्यांच्यासमोर होता. परंतु राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

राजू शेट्टी काय म्हणाले?

महेश खराडे यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, "आमचा उमेदवार फाटका माणूस असून गरीब शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे ही निवडणूक आम्ही 'एक व्होट एक नोट' या तत्त्वावर लढवणार आहोत. अनेक दिवसांपासून स्वाभिमानीचा जिल्हाध्यक्ष आणि कणखर नेता म्हणून खराडे यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. गेल्या निवडणुकीत आम्ही ही जागा लढवली होती. जवळपास साडेतीन लाख मते आम्हाला मिळवली होती. यावेळी त्यापेक्षा अधिक मते मिळवून महेश खराडे विजयी होतील," असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

विश्वजीत कदमांना अजूनही आशा

महाविकास आघाडीने जागावाटप जाहीर केलं असलं तरी सांगलीबाबत पुनर्विचार व्हावा, अशी काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम यांची मागणी आहे. "आजही सांगली जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची पारख करून पुन्हा या निर्णयाचा फेरविचार करावा ही आमची महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती आहे. ही माझी व्यक्तिगत नाही तर काँग्रेस पक्षाची भावना आहे. राज्य आणि देशात जे वातावरण आहे ते नाकारत नाही. परंतु काँग्रेस पक्षाची ही जागा असून मविआनं गांभीर्याने या जागेबाबत विचार करावा," अशी मागणी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे. 

टॅग्स :sangli-pcसांगलीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Raju Shettyराजू शेट्टी