शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

महांकाली साखर कारखाना चालविण्यास राजारामबापूचा पुढाकार, वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर 

By हणमंत पाटील | Updated: September 26, 2023 16:47 IST

युनूस शेख इस्लामपूर : सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील आर्थिक अरिष्ट्यात सापडलेला महांकाली साखर कारखाना २५ वर्षांसाठी सहयोगी तत्वावर चालविण्यास ...

युनूस शेखइस्लामपूर : सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील आर्थिक अरिष्ट्यात सापडलेला महांकाली साखर कारखाना २५ वर्षांसाठी सहयोगी तत्वावर चालविण्यास घेण्यास राजारामबापू साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सभासदांनी मंजुरी दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला महांकाली कारखान्याचा विषय संपुष्टात येण्याच्या मार्गावर आला आहे. विशेष म्हणजे या कारखान्याची उभारणी राजारामबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. या निर्णयामुळे राजारामबापू आता पाचव्या शाखेला गवसणी घालण्याचा तयारीत आहे.राजारामबापू कारखान्याची ५४ वी वार्षिक सभा अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शक माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, प्रा.शामराव पाटील, नेताजीराव पाटील, विनायकराव पाटील, भीमराव पाटील-कणेगावकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, रविंद्र बर्डे उपस्थित होते.दिवंगत नानासाहेब सगरे,पुंडलीकराव जाधव हे त्या काळातील बापूंचे जुने-जाणते आणि निष्ठावंत सहकारी होते. दुष्काळी भागातील बापूंचे समाजकारण, राजकारण हे दोघे बघत असत.बापूंचा त्यांच्या आयुष्यात जिल्ह्याच्या दुष्काळी भागाशी विशेष असा स्नेह होता. तेथील प्रत्येक प्रश्न आणि समस्येवर बापू नेहमीच आग्रही असायचे. जयंत पाटील यांनीही हा स्नेह पहिल्यापासून जपला आहे.विजय सगरे यांनाही त्यांनी नेहमीच ताकद देण्याचे काम केले आहे.मात्र उसाची कमतरता आणि आर्थिक व्यवस्थापनातील गोंधळ यामुळे महांकाली कारखाना दिवसेंदिवस आर्थिक अडचणीत येत गेला.२०१८-१९ पासून कारखाना बंद आहे. त्यामुळे तो आता जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे.कर्जाचा काही भाग हलका करण्यासाठी कारखान्याची ८० एकर जमीन विकण्याचा विषय समोर आला. हा जमीन विक्रीचा विषयसुद्धा कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे कारखाना वाचला पाहिजे ही आजची प्राथमिकता असल्याने त्याचा विचार करून राजारामबापू कारखान्याने महांकाली कारखाना सहयोगी तत्वावर चालविण्यास घेण्याचा ठराव करत त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे दुष्काळी भागाच्या विकासाचे राजारामबापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी टाकलेले हे धाडसी पाऊल ठरणार आहे.७३ कोटी रुपयांचे दायित्व स्वीकारून २५ वर्षांसाठी हा कारखाना चालविण्यास घेण्यास सभेने मंजुरी दिली आहे. साखराळे, वाटेगाव-सुरुल,कारंदवादी आणि जत-तिप्पेहळी या चार शाखेसह आता महांकाली हा पाचवा कारखाना चालविण्यास अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजारामबापू कारखाना सज्ज झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलSugar factoryसाखर कारखाने