शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

महांकाली साखर कारखाना चालविण्यास राजारामबापूचा पुढाकार, वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर 

By हणमंत पाटील | Updated: September 26, 2023 16:47 IST

युनूस शेख इस्लामपूर : सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील आर्थिक अरिष्ट्यात सापडलेला महांकाली साखर कारखाना २५ वर्षांसाठी सहयोगी तत्वावर चालविण्यास ...

युनूस शेखइस्लामपूर : सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील आर्थिक अरिष्ट्यात सापडलेला महांकाली साखर कारखाना २५ वर्षांसाठी सहयोगी तत्वावर चालविण्यास घेण्यास राजारामबापू साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सभासदांनी मंजुरी दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला महांकाली कारखान्याचा विषय संपुष्टात येण्याच्या मार्गावर आला आहे. विशेष म्हणजे या कारखान्याची उभारणी राजारामबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. या निर्णयामुळे राजारामबापू आता पाचव्या शाखेला गवसणी घालण्याचा तयारीत आहे.राजारामबापू कारखान्याची ५४ वी वार्षिक सभा अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शक माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, प्रा.शामराव पाटील, नेताजीराव पाटील, विनायकराव पाटील, भीमराव पाटील-कणेगावकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, रविंद्र बर्डे उपस्थित होते.दिवंगत नानासाहेब सगरे,पुंडलीकराव जाधव हे त्या काळातील बापूंचे जुने-जाणते आणि निष्ठावंत सहकारी होते. दुष्काळी भागातील बापूंचे समाजकारण, राजकारण हे दोघे बघत असत.बापूंचा त्यांच्या आयुष्यात जिल्ह्याच्या दुष्काळी भागाशी विशेष असा स्नेह होता. तेथील प्रत्येक प्रश्न आणि समस्येवर बापू नेहमीच आग्रही असायचे. जयंत पाटील यांनीही हा स्नेह पहिल्यापासून जपला आहे.विजय सगरे यांनाही त्यांनी नेहमीच ताकद देण्याचे काम केले आहे.मात्र उसाची कमतरता आणि आर्थिक व्यवस्थापनातील गोंधळ यामुळे महांकाली कारखाना दिवसेंदिवस आर्थिक अडचणीत येत गेला.२०१८-१९ पासून कारखाना बंद आहे. त्यामुळे तो आता जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे.कर्जाचा काही भाग हलका करण्यासाठी कारखान्याची ८० एकर जमीन विकण्याचा विषय समोर आला. हा जमीन विक्रीचा विषयसुद्धा कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे कारखाना वाचला पाहिजे ही आजची प्राथमिकता असल्याने त्याचा विचार करून राजारामबापू कारखान्याने महांकाली कारखाना सहयोगी तत्वावर चालविण्यास घेण्याचा ठराव करत त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे दुष्काळी भागाच्या विकासाचे राजारामबापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी टाकलेले हे धाडसी पाऊल ठरणार आहे.७३ कोटी रुपयांचे दायित्व स्वीकारून २५ वर्षांसाठी हा कारखाना चालविण्यास घेण्यास सभेने मंजुरी दिली आहे. साखराळे, वाटेगाव-सुरुल,कारंदवादी आणि जत-तिप्पेहळी या चार शाखेसह आता महांकाली हा पाचवा कारखाना चालविण्यास अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजारामबापू कारखाना सज्ज झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलSugar factoryसाखर कारखाने