शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

महांकाली साखर कारखाना चालविण्यास राजारामबापूचा पुढाकार, वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर 

By हणमंत पाटील | Updated: September 26, 2023 16:47 IST

युनूस शेख इस्लामपूर : सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील आर्थिक अरिष्ट्यात सापडलेला महांकाली साखर कारखाना २५ वर्षांसाठी सहयोगी तत्वावर चालविण्यास ...

युनूस शेखइस्लामपूर : सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील आर्थिक अरिष्ट्यात सापडलेला महांकाली साखर कारखाना २५ वर्षांसाठी सहयोगी तत्वावर चालविण्यास घेण्यास राजारामबापू साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सभासदांनी मंजुरी दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला महांकाली कारखान्याचा विषय संपुष्टात येण्याच्या मार्गावर आला आहे. विशेष म्हणजे या कारखान्याची उभारणी राजारामबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. या निर्णयामुळे राजारामबापू आता पाचव्या शाखेला गवसणी घालण्याचा तयारीत आहे.राजारामबापू कारखान्याची ५४ वी वार्षिक सभा अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शक माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, प्रा.शामराव पाटील, नेताजीराव पाटील, विनायकराव पाटील, भीमराव पाटील-कणेगावकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, रविंद्र बर्डे उपस्थित होते.दिवंगत नानासाहेब सगरे,पुंडलीकराव जाधव हे त्या काळातील बापूंचे जुने-जाणते आणि निष्ठावंत सहकारी होते. दुष्काळी भागातील बापूंचे समाजकारण, राजकारण हे दोघे बघत असत.बापूंचा त्यांच्या आयुष्यात जिल्ह्याच्या दुष्काळी भागाशी विशेष असा स्नेह होता. तेथील प्रत्येक प्रश्न आणि समस्येवर बापू नेहमीच आग्रही असायचे. जयंत पाटील यांनीही हा स्नेह पहिल्यापासून जपला आहे.विजय सगरे यांनाही त्यांनी नेहमीच ताकद देण्याचे काम केले आहे.मात्र उसाची कमतरता आणि आर्थिक व्यवस्थापनातील गोंधळ यामुळे महांकाली कारखाना दिवसेंदिवस आर्थिक अडचणीत येत गेला.२०१८-१९ पासून कारखाना बंद आहे. त्यामुळे तो आता जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे.कर्जाचा काही भाग हलका करण्यासाठी कारखान्याची ८० एकर जमीन विकण्याचा विषय समोर आला. हा जमीन विक्रीचा विषयसुद्धा कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे कारखाना वाचला पाहिजे ही आजची प्राथमिकता असल्याने त्याचा विचार करून राजारामबापू कारखान्याने महांकाली कारखाना सहयोगी तत्वावर चालविण्यास घेण्याचा ठराव करत त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे दुष्काळी भागाच्या विकासाचे राजारामबापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी टाकलेले हे धाडसी पाऊल ठरणार आहे.७३ कोटी रुपयांचे दायित्व स्वीकारून २५ वर्षांसाठी हा कारखाना चालविण्यास घेण्यास सभेने मंजुरी दिली आहे. साखराळे, वाटेगाव-सुरुल,कारंदवादी आणि जत-तिप्पेहळी या चार शाखेसह आता महांकाली हा पाचवा कारखाना चालविण्यास अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजारामबापू कारखाना सज्ज झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलSugar factoryसाखर कारखाने