शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

Ramdas Athawale: राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला-मंत्री रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 11:48 IST

१९९२ नंतर महाराष्ट्रात गेल्या तीस वर्षांत कधीही जातीय तणाव निर्माण झालेला नाही. महाराष्ट्राची जनता सुबुद्ध आहे. ती ठाकरे यांच्या वक्तव्याने भूलणार नाही. ठाकरे यांचे नवे राजकारण यशस्वी होणार नाही.

सांगली : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या राज ठाकरेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. राज यांची भूमिका दंगली घडविणारी आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.

आठवले म्हणाले की, राज ठाकरेंची सध्या बाळासाहेब ठाकरेंशी तुलना केली जात आहे. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकारही राज ठाकरेंना नाही. शिवसेना सोडून त्यांनी नवा पक्ष स्थापन केला आहे. बाळासाहेब यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला होता. हिरवा, भगवा, पांढरा अशा सर्व रंगांचा समावेश त्यांनी त्यांच्या झेंड्यात केला होता. आता ते धर्माधर्मात अंतर करीत आहेत. मशिदीच्या भोंग्यांचा त्रास होण्याचे कारण नाही. आपल्याकडेही शिवजयंती, भीमजयंती, गणेशोत्सव व अन्य वेगवेगळे धार्मिक सोहळे, मिरवणुका यात वाद्य, भोंगे वापरले जातात. त्यामुळे त्याचा कोणाला त्रास होण्याचे कारण नाही. एकमेकांचा आदर करायला हवा.

१९९२ नंतर महाराष्ट्रात गेल्या तीस वर्षांत कधीही जातीय तणाव निर्माण झालेला नाही. महाराष्ट्राची जनता सुबुद्ध आहे. ती ठाकरे यांच्या वक्तव्याने भूलणार नाही. ठाकरे यांचे नवे राजकारण यशस्वी होणार नाही. संविधानात सर्वधर्मीय समभावाचा अंतर्भाव आहे. त्यामुळे संविधानविरोधी कोणत्याही कृत्याचे आम्ही समर्थन करणार नाही.

कोरेगाव भीमा प्रकरणात आयोगाने दिलेला अहवाल योग्यच असणार. संभाजी भिडे जसे या दंगलीला जबाबदार नाहीत, तसेच पुण्यातील एल्गार परिषदही या दंगलीस जबाबदार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे.

भाजपच्या खासदारास पाठिंबा

भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यास मनाई केली आहे. उत्तर प्रदेशवासीयांची माफी मागण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर आठवले म्हणाले की, भाजप खासदाराच्या मागणीस आमचा पाठिंबा आहे. राज ठाकरेंनी अयोध्येत जाऊ नये.

फडणवीस यांच्यामुळे दंगली थांबल्या

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाची योग्य हाताळणी केल्यामुळे राज्यात दंगली झाल्या नाहीत, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SangliसांगलीRaj Thackerayराज ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवले