शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

Ramdas Athawale: राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला-मंत्री रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 11:48 IST

१९९२ नंतर महाराष्ट्रात गेल्या तीस वर्षांत कधीही जातीय तणाव निर्माण झालेला नाही. महाराष्ट्राची जनता सुबुद्ध आहे. ती ठाकरे यांच्या वक्तव्याने भूलणार नाही. ठाकरे यांचे नवे राजकारण यशस्वी होणार नाही.

सांगली : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या राज ठाकरेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. राज यांची भूमिका दंगली घडविणारी आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.

आठवले म्हणाले की, राज ठाकरेंची सध्या बाळासाहेब ठाकरेंशी तुलना केली जात आहे. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकारही राज ठाकरेंना नाही. शिवसेना सोडून त्यांनी नवा पक्ष स्थापन केला आहे. बाळासाहेब यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला होता. हिरवा, भगवा, पांढरा अशा सर्व रंगांचा समावेश त्यांनी त्यांच्या झेंड्यात केला होता. आता ते धर्माधर्मात अंतर करीत आहेत. मशिदीच्या भोंग्यांचा त्रास होण्याचे कारण नाही. आपल्याकडेही शिवजयंती, भीमजयंती, गणेशोत्सव व अन्य वेगवेगळे धार्मिक सोहळे, मिरवणुका यात वाद्य, भोंगे वापरले जातात. त्यामुळे त्याचा कोणाला त्रास होण्याचे कारण नाही. एकमेकांचा आदर करायला हवा.

१९९२ नंतर महाराष्ट्रात गेल्या तीस वर्षांत कधीही जातीय तणाव निर्माण झालेला नाही. महाराष्ट्राची जनता सुबुद्ध आहे. ती ठाकरे यांच्या वक्तव्याने भूलणार नाही. ठाकरे यांचे नवे राजकारण यशस्वी होणार नाही. संविधानात सर्वधर्मीय समभावाचा अंतर्भाव आहे. त्यामुळे संविधानविरोधी कोणत्याही कृत्याचे आम्ही समर्थन करणार नाही.

कोरेगाव भीमा प्रकरणात आयोगाने दिलेला अहवाल योग्यच असणार. संभाजी भिडे जसे या दंगलीला जबाबदार नाहीत, तसेच पुण्यातील एल्गार परिषदही या दंगलीस जबाबदार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे.

भाजपच्या खासदारास पाठिंबा

भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यास मनाई केली आहे. उत्तर प्रदेशवासीयांची माफी मागण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर आठवले म्हणाले की, भाजप खासदाराच्या मागणीस आमचा पाठिंबा आहे. राज ठाकरेंनी अयोध्येत जाऊ नये.

फडणवीस यांच्यामुळे दंगली थांबल्या

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाची योग्य हाताळणी केल्यामुळे राज्यात दंगली झाल्या नाहीत, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SangliसांगलीRaj Thackerayराज ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवले