शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

Ramdas Athawale: राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला-मंत्री रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 11:48 IST

१९९२ नंतर महाराष्ट्रात गेल्या तीस वर्षांत कधीही जातीय तणाव निर्माण झालेला नाही. महाराष्ट्राची जनता सुबुद्ध आहे. ती ठाकरे यांच्या वक्तव्याने भूलणार नाही. ठाकरे यांचे नवे राजकारण यशस्वी होणार नाही.

सांगली : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या राज ठाकरेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. राज यांची भूमिका दंगली घडविणारी आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.

आठवले म्हणाले की, राज ठाकरेंची सध्या बाळासाहेब ठाकरेंशी तुलना केली जात आहे. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकारही राज ठाकरेंना नाही. शिवसेना सोडून त्यांनी नवा पक्ष स्थापन केला आहे. बाळासाहेब यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला होता. हिरवा, भगवा, पांढरा अशा सर्व रंगांचा समावेश त्यांनी त्यांच्या झेंड्यात केला होता. आता ते धर्माधर्मात अंतर करीत आहेत. मशिदीच्या भोंग्यांचा त्रास होण्याचे कारण नाही. आपल्याकडेही शिवजयंती, भीमजयंती, गणेशोत्सव व अन्य वेगवेगळे धार्मिक सोहळे, मिरवणुका यात वाद्य, भोंगे वापरले जातात. त्यामुळे त्याचा कोणाला त्रास होण्याचे कारण नाही. एकमेकांचा आदर करायला हवा.

१९९२ नंतर महाराष्ट्रात गेल्या तीस वर्षांत कधीही जातीय तणाव निर्माण झालेला नाही. महाराष्ट्राची जनता सुबुद्ध आहे. ती ठाकरे यांच्या वक्तव्याने भूलणार नाही. ठाकरे यांचे नवे राजकारण यशस्वी होणार नाही. संविधानात सर्वधर्मीय समभावाचा अंतर्भाव आहे. त्यामुळे संविधानविरोधी कोणत्याही कृत्याचे आम्ही समर्थन करणार नाही.

कोरेगाव भीमा प्रकरणात आयोगाने दिलेला अहवाल योग्यच असणार. संभाजी भिडे जसे या दंगलीला जबाबदार नाहीत, तसेच पुण्यातील एल्गार परिषदही या दंगलीस जबाबदार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे.

भाजपच्या खासदारास पाठिंबा

भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यास मनाई केली आहे. उत्तर प्रदेशवासीयांची माफी मागण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर आठवले म्हणाले की, भाजप खासदाराच्या मागणीस आमचा पाठिंबा आहे. राज ठाकरेंनी अयोध्येत जाऊ नये.

फडणवीस यांच्यामुळे दंगली थांबल्या

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाची योग्य हाताळणी केल्यामुळे राज्यात दंगली झाल्या नाहीत, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SangliसांगलीRaj Thackerayराज ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवले