शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Ramdas Athawale: राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला-मंत्री रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 11:48 IST

१९९२ नंतर महाराष्ट्रात गेल्या तीस वर्षांत कधीही जातीय तणाव निर्माण झालेला नाही. महाराष्ट्राची जनता सुबुद्ध आहे. ती ठाकरे यांच्या वक्तव्याने भूलणार नाही. ठाकरे यांचे नवे राजकारण यशस्वी होणार नाही.

सांगली : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या राज ठाकरेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. राज यांची भूमिका दंगली घडविणारी आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.

आठवले म्हणाले की, राज ठाकरेंची सध्या बाळासाहेब ठाकरेंशी तुलना केली जात आहे. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकारही राज ठाकरेंना नाही. शिवसेना सोडून त्यांनी नवा पक्ष स्थापन केला आहे. बाळासाहेब यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला होता. हिरवा, भगवा, पांढरा अशा सर्व रंगांचा समावेश त्यांनी त्यांच्या झेंड्यात केला होता. आता ते धर्माधर्मात अंतर करीत आहेत. मशिदीच्या भोंग्यांचा त्रास होण्याचे कारण नाही. आपल्याकडेही शिवजयंती, भीमजयंती, गणेशोत्सव व अन्य वेगवेगळे धार्मिक सोहळे, मिरवणुका यात वाद्य, भोंगे वापरले जातात. त्यामुळे त्याचा कोणाला त्रास होण्याचे कारण नाही. एकमेकांचा आदर करायला हवा.

१९९२ नंतर महाराष्ट्रात गेल्या तीस वर्षांत कधीही जातीय तणाव निर्माण झालेला नाही. महाराष्ट्राची जनता सुबुद्ध आहे. ती ठाकरे यांच्या वक्तव्याने भूलणार नाही. ठाकरे यांचे नवे राजकारण यशस्वी होणार नाही. संविधानात सर्वधर्मीय समभावाचा अंतर्भाव आहे. त्यामुळे संविधानविरोधी कोणत्याही कृत्याचे आम्ही समर्थन करणार नाही.

कोरेगाव भीमा प्रकरणात आयोगाने दिलेला अहवाल योग्यच असणार. संभाजी भिडे जसे या दंगलीला जबाबदार नाहीत, तसेच पुण्यातील एल्गार परिषदही या दंगलीस जबाबदार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे.

भाजपच्या खासदारास पाठिंबा

भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यास मनाई केली आहे. उत्तर प्रदेशवासीयांची माफी मागण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर आठवले म्हणाले की, भाजप खासदाराच्या मागणीस आमचा पाठिंबा आहे. राज ठाकरेंनी अयोध्येत जाऊ नये.

फडणवीस यांच्यामुळे दंगली थांबल्या

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाची योग्य हाताळणी केल्यामुळे राज्यात दंगली झाल्या नाहीत, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SangliसांगलीRaj Thackerayराज ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवले