शेतकरी वाचविण्यासाठी आक्रमक लढा उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST2021-02-14T04:25:44+5:302021-02-14T04:25:44+5:30

केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले कायदे याविषयी माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमचे निरीक्षक अमित पारेकर व नंदकुमार शेळके यांनी ...

Raise an aggressive fight to save the farmers | शेतकरी वाचविण्यासाठी आक्रमक लढा उभारा

शेतकरी वाचविण्यासाठी आक्रमक लढा उभारा

केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले कायदे याविषयी माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमचे निरीक्षक अमित पारेकर व नंदकुमार शेळके यांनी दिली. शेतकरी व शेतमजूर यांचा काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

विशाल पाटील म्हणाले, कवठेमहांकाळ तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आम्ही बळ देणार आहोत. आगामी होणाऱ्या निवडणुकीत नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व गावपातळीवरील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

जितेश कदम म्हणाले की, राज्याचे मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली येथून पुढच्या काळात कोणत्याही अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. तसेच या जिल्ह्यात पुन्हा एकदा नव्या जोमाने काँग्रेस पक्ष उभा करण्याचे काम नव्या उमेदीने करणार.

शहराध्यक्ष राजाराम घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माणिकराव भोसले, बाळासाहेब गुरव, धनाजी पाटील, संजय हजारे, अविराजे शिंदे, विजय ओलेकर, अल्लाबक्ष मुल्ला, वैभव गुरव, विश्वनाथ पाटील, सुलोचना माने, सरोजा पाटील, पोपट पाटील, गुलाब मकानदार, आदी उपस्थित होते. वैभव गुरव यांनी मानले.

Web Title: Raise an aggressive fight to save the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.