शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

सांगलीतील चिंतामणीनगरच्या पुलासाठी रेल्वे रोखणार, नागरिकांच्या बैठकीत निर्णय

By अशोक डोंबाळे | Updated: September 20, 2023 18:34 IST

जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देणार

सांगली : सांगली ते तासगाव रस्त्यावरील चितांमणीनगर येथील रेल्वे पुलाचे काम बंद ठेवले आहे, याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असतील तर रेल्वे रोखण्याचा निर्णय बुधवारी नागरिकांच्या बैठकीत घेतला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रश्नावर चर्चेसाठी गुरुवार दि. २१ रोजी भेटीची वेळ दिली आहे.चिंतामणीनगर येथील रेल्वे पुलाचे बांधकाम थांबल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कलानगर येथे नागरिकांची बैठक झाली. यावेळी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, माजी नगरसेवक हणमंत पवार, गौतम पवार, पद्माकर जगदाळे, गजानन साळुंखे, नितीन चव्हाण, शिवकुमार शिंदे, नंदू चव्हाण, ॲड. प्रदीप पोळ, महेश साळुंखे, सचिन देसाई, महालिंग हेगडे, विजय माळी यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.चिंतामणीनगर येथील रेल्वेच्या पुलासाठी सांगली ते तासगाव रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. यामुळे लाखो प्रवाशांची रोज गैरसोय होत आहे. तरीही प्रशासन नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. याबद्दल रेल्वे रोखो आंदोलन करून प्रशासनाला जागे करूया, अशी मागणी संतप्त नागरिकांनी बैठकीत केली. यावेळी रेल्वेचे अभियंता शंभू चौधारी यांना रेल्वे पुलाच्या थांबलेल्या कामाबद्दल दूरध्वनीवरून जाब विचारला.नागरिकांना जुना बुधगाव रस्त्यावरून जाताना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तेथील वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. तरीही चिंतामणीनगर येथील पुलाच्या कामांकडे प्रशासन लक्ष देत नाहीत. गेल्या महिन्याभरापासून पुलाचे कामच बंद आहे. अशा पद्धतीने काम चालू राहिल्यास जानेवारी २०२४ मध्ये काम कसे पूर्ण होणार, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला.काम थांबविणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणीही केली. प्रशासन केवळ बघ्याचीच भूमिका घेणार की काय?, असा सवालही नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी केला. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याशी संपर्क केला असता. त्यांनी पुलाच्या प्रश्नावर गुरुवार दि. २१ सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजता भेटीची वेळ दिली आहे. या बैठकीत समाधानकारक निर्णय झाला तर ठीक नाही अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्याचा नागरिकांनी निर्णय घेतला.

भुयारी पुलाचा प्रश्न सोडवापूल मोठा होणार असेल तर चिंतामणीनगर, घनश्यामनगर आणि कलानगर येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी भुयारी पुलाची व्यवस्था केली पाहिजे. याबाबत रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण देण्याची गरज आहे, अशीही आंदोलकांनी मागणी केली.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे