शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रेल्वे पोलिस खरे सांगताहेत की मध्य रेल्वे प्रशासन ?, सांगलीतील चिंतामणीनगर पुलाच्या मुदतवाढीचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 17:44 IST

सांगली : चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा गोंधळ अजून संपलेला नसताना त्याच्या मुदतवाढीवरूनही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आंदोलनाचा इशारा ...

सांगली : चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा गोंधळ अजून संपलेला नसताना त्याच्या मुदतवाढीवरूनही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आंदोलनाचा इशारा दिलेल्या सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांना मध्य रेल्वेने दिलेले पत्र व रेल्वे सुरक्षा दलाने दिलेली नोटीस यात पुलाचे काम पूर्ण होण्याच्या तारखा वेगवेगळ्या दिल्या आहेत. त्यामुळे रेल्वेच्याच या गोंधळावर समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सतीश साखळकर यांना रुळावर स्वातंत्र्य दिन साजरा न करण्यासाठी नोटीस बजावली आहे. या नोटिशीमध्ये चिंतामणीनगरचा उड्डाणपूल पूर्ण करण्यास १० सप्टेंबर २०२४ ची मुदत दिल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेच्या उपमुख्य अभियंत्यांनी साखळकर यांना एक पत्र देऊन पुलाच्या कामाबाबत काही स्पष्टीकरण दिले आहे. यात त्यांनी हा पूल ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे रेल्वेच्याच दोन वेगवेगळ्या विभागांनी दिलेल्या दोन वेगळ्या तारखांमुळे सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी संभ्रमावस्थेत आहेत.

तारीख पे तारीखचा खेळउड्डाणपुलाचे काम १० जून २०२३ पासून सुरू झाले होते. १० जानेवारी २०२४ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात जानेवारीची मुदत पुन्हा मार्चपर्यंत पुढे गेली. त्यानंतर वारंवार मुदतवाढ देत वर्ष उलटले. एक वर्षानंतरही काम पूर्ण न झाल्याने पुलाचे वर्षश्राद्ध घालण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी या पुलास १५ ऑगस्टची अंतिम मुदत दिली. आता रेल्वेने सप्टेंबरमधील दोन वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत.

खरे कोण अन् खोटे कोण?मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाचे पत्र व रेल्वे पोलिस दलाची नोटीस सोशल मीडियावर प्रसिद्ध करून सर्वपक्षीय समितीने यातील कोणती तारीख खरी आहे, असा सवाल उपस्थित केला. सोशल मीडियावर नागरिकांनी या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.

किती दिवस नागरिकांचे हाल?सांगलीसह उत्तर बाजूस असलेले तालुके, प्रमुख गावांना या पुलाअभावी मोठा फटका बसला आहे. व्यापार, उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. नागरिक, विद्यार्थ्यांना पर्यायी मार्गाने जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. हे हाल आणखी किती दिवस राहणार, असा हताश सवालही सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे