शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाजप नेते सरकारी तिजोरी लुटतात, रघुनाथदादा पाटलांचा गंभीर आरोप

By अशोक डोंबाळे | Updated: August 30, 2022 18:23 IST

जेलमध्ये जावा; पण कर्ज, वीजबिल भरू नका!

सांगली : शेतीमालाला ठोस दर मिळत नसल्यामुळे शेतकरी, कष्टकरी आर्थिक अडचणीत आहेत. पण, सत्ताधारी भाजप आणि विरोधक शासकीय तिजोरी लुटत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगलीत आज, मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठीच पुण्यातील तळेगाव येथे ३ सप्टेंबर रोजी ऊस परिषद आयोजित केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.रघुनाथदादा पाटील म्हणाले, शेती उत्पादनाला दर मिळायला लागला की लगेच केंद्र सरकार निर्यात बंदी घालून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करीत आहे. गहू, आटा निर्यात बंदी घातली आहे. ऊस उत्पादकांची लूट चालू असतानाच कमी की काय म्हणून केंद्र सरकारने नव्याने एफआरपी जाहीर करताना ०.२५ टक्केनी साखर उतारा बेस बदलून तो सध्या १०.२५ केला आहे. कारखानदारांच्याच बाजूचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. या सर्व धोरणामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहे. भाजपच्या या धोरणाला विरोधकही मूक सहमती देऊन गप्प आहेत. या धोरणाविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे. म्हणूनच पुणे येथे ३ सप्टेंबर रोजी पुण्यातील तळेगाव येथे ऊस परिषद घेणार आहे. या परिषदेला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते येणार आहेत.

जेलमध्ये जावा; पण कर्ज, वीजबिल भरू नका!शेतकऱ्यांनी कर्ज, वीजबिल भरूच नये. जोपर्यंत कर्ज आणि वीजबिल भरणार, तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. कर्ज, वीजबिल वसुलीला येणाऱ्यांना जोडे मारा, प्रसंगी जेलमध्ये जावे लागले तरी चालेल परंतु, कर्ज भरूच नये. मी गेल्या तीस वर्षांत वीजबिल भरले नाही आणि कर्जही भरले नाही, म्हणूनच सध्या सुखी आहे, असे मत रघुनाथदादा यांनी व्यक्त केले.

ऊस परिषदेतील प्रमुख मागण्या

  • दोन साखर, इथेनॉल कारखान्यांतील हवाई अंतराची अट रद्द करा.
  • कांदा, बटाट्याची निर्यातबंदी कायमची रद्द करा.
  • गुंठेवारीची नोंद तत्काळ चालू करून तुकडेबंदी कायदा रद्द झाला पाहिजे.
  • सातबाऱ्यावरील पुनर्वसनचे शिक्के तत्काळ रद्द करा.
  • संपूर्ण कर्ज व वीज बिल मुक्ती झालीच पाहिजे.
टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीBJPभाजपा