शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 11:34 IST

यावर्षी मान्सून पाऊस वेळेत झाला नसल्यामुळे खरीप हंगामाच्या शंभर टक्के पेरण्या झाल्या नाहीत. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या, तेथील पिके परतीच्या मुसळधार पावसामुळे कुजू लागली आहेत. अनेक जमिनीत पाणी साचून राहिल्यामुळे रब्बी पेरणीसाठी जमिनी तयार करण्यासाठी वाफसाच नसल्यामुळे रब्बी पेरणीही लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबणीवर हंगामासाठी शेत तयार करणार कसे, असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न

सांगली : यावर्षी मान्सून पाऊस वेळेत झाला नसल्यामुळे खरीप हंगामाच्या शंभर टक्के पेरण्या झाल्या नाहीत. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या, तेथील पिके परतीच्या मुसळधार पावसामुळे कुजू लागली आहेत. अनेक जमिनीत पाणी साचून राहिल्यामुळे रब्बी पेरणीसाठी जमिनी तयार करण्यासाठी वाफसाच नसल्यामुळे रब्बी पेरणीही लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच खरीप हंगामातील तयार झालेली पिके काढण्यास पावसामुळे अडथळा निर्माण झाला असून, त्याचा परिणाम रब्बी हंगामाची पेरणीवर झाला आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर पडण्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.यावर्षी रब्बी हंगामातील पेरणी आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आजमितीस ज्वारी व हरभरा पेरणीला सुरुवात होणे आवश्यक होते. गव्हाची पेरणी थोडी उशिराने केली तरी चालणार आहे. या पिकांच्या पेरण्यांसाठी आधी शेत तयार करावे लागणार असून, त्यासाठी खरिपाची पिके काढणे आवश्यक आहे.प्रत्यक्षात मात्र हीच पिके शेतात उभी असल्याने रब्बी हंगामासाठी शेत तयार करणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. जोपर्यंत वाफसा तयार होत नाही, तोपर्यंत पेरणी करता येणार नाही. येत्या दहा दिवसांमध्ये चांगल्या प्रमाणात ऊन पडले तर वाफसा होणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली