शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

रब्बी हंगामाला पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 20:38 IST

सुरुवातीला शेतकरी समाधानी होता, मात्र तालुक्यात यंदा २००५ पेक्षाही जादा पाऊस पडल्याने वारणा व मोरणा या दोन्हीही नद्या नियंत्रण सीमा पार करून वाहिल्यामुळे नदीकाठची पिके पुराच्या पाण्याने वाहून गेली.

ठळक मुद्देमात्र उत्पादन कमी निघत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे.

विकास शहा ।शिराळा : परतीच्या पावसामुळे शेतात अजूनही पाणी आहे. यामुळे ७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील रब्बी पेरण्या एक महिना लांबल्या आहेत. शेतात पाणी साचून राहिल्यामुळे मशागत करता येणार नाही. याअगोदर अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला आहे आणि आता रब्बी हंगामही वाया जाण्याची शक्यता आहे. नुकसानीचे पंचनामे करावेत, तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

तालुक्यात जवळपास साडेसात हजार हेक्टरमध्ये रब्बी हंगामातील पेरण्या होतात. खरीप हंगामातील पिके काढून शेतकरी रब्बीत गहू, हरभरा, खपली, मका आदी पिकांच्या पेरण्या करतात. मात्र यंदा अतिपावसामुळे सध्या तरी पेरणीयोग्य चित्र नाही. शेतात अजूनही पाणी साठलेले आहे. खरीप हंगाम अगोदरच वाया गेला आहे. त्यातच आता रब्बी हंगामही पावसामुळे धोक्यात आला आहे.

तालुक्यात काढावयास आलेल्या पिकांपैकी ४० टक्के काढणी पूर्ण झाली असून ६० टक्के पिके अजूनही शेतामध्ये उभीच आहेत. तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या काळात पिकांना पोषक असा पाऊस पडला होता. परिणामी खरीप क्षेत्रामध्ये वाढही झाली होती. सुरुवातीला शेतकरी समाधानी होता, मात्र तालुक्यात यंदा २००५ पेक्षाही जादा पाऊस पडल्याने वारणा व मोरणा या दोन्हीही नद्या नियंत्रण सीमा पार करून वाहिल्यामुळे नदीकाठची पिके पुराच्या पाण्याने वाहून गेली.

पावसाने उघडीप दिल्यामुळे तालुक्यात खरीप हंगामात आगाप पेरणी झालेले सोयाबीन, भुईमूग, भात, मूग, चवाळी आदी पिकांच्या काढणीला गती आली आहे. मात्र उत्पादन कमी निघत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी