शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आयर्विन पुलाच्या उभारणीसाठी राबले लक्ष्मीबार्इंचे हात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:49 IST

कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीमुळे लक्ष्मीबाई पतीसमवेत सांगलीत आल्या आणि मिळेल तिथे झोपडी बांधून राहत होत्या. हळदीच्या कारखान्यासह रुग्णालय, अनेकांच्या बागांमध्ये त्या राबत होत्या. लक्ष्मीबार्इंचे पती, त्यांची पाच मुले व दोन मुली आता हयात नाहीत. नातवंडेही विविध कारणांनी मृत्युमुखी पडली. परतवंडांपैकी केवळ मीनाक्षी या एकट्याच जिवंत आहेत.

ठळक मुद्देपरतवंडांपैकी केवळ मीनाक्षी या एकट्याच जिवंत आहेत.

सांगली : मोठमोठ्या महापुरांचा सामना करूनही सांगलीकरांची इमानेइतबारे सेवा करणाºया व समृद्धीचा सेतू बनून सांगलीकरांच्या हृदयात घर केलेल्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला आज, सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी नव्वद वर्षे पूर्ण होत आहेत. या पुलाच्या उभारणीवेळी  मजूर म्हणून राबलेल्या सांगलीच्या लक्ष्मीबाई कामन्ना पुजारी (वय १०४) यांनी त्यावेळच्या अनेक आठवणी जागविल्या. आयर्विनच्या नव्वदाव्या वर्धापनदिनी त्यांचा सत्कार सांगलीकरांच्यावतीने करण्यात      येणार आहे.

सांगलीचा आयर्विन पूल हा १८ नोव्हेंबर १९२९ रोजी सांगलीकरांच्या सेवेत दाखल झाला. त्यापूर्वी सुमारे तीन ते चार वर्षापूर्वी याच्या कामास सुरुवात झाली होती. लक्ष्मीबार्इं पुजारी यांनी या पुलाच्या उभारणीत कष्ट उपसले होते. लक्ष्मीबाई या मूळच्या कर्नाटकातील जमखंडी तालुक्यातील तोदलबगीच्या. कर्नाटकातील मजुरांच्या टोळीने त्यांच्या कुटुंबीयांना या कामासाठी सोबत घेतले. जमखंडी, विजापूर परिसरातील शेकडो मजुरांच्या टोळ्या आयर्विन पुलाच्या कामासाठी सांगलीत दाखल झाल्या. पाणी अडविण्याच्या कामापासून त्यांची सुरुवात झाली होती. त्यावेळी लक्ष्मीबाई दहा वर्षाच्या होत्या. इतक्या लहान वयातही त्यांना खडीने भरलेल्या पाट्या उचलून डोक्यावरून वाहण्याचे काम कुटुंबीयांनी दिले होते.

दोन वर्षे त्यांनी याठिकाणी काम केले. पुलाचे खांब उभारल्यानंतर काही मजूर गावाकडे परतले, त्यात लक्ष्मीबार्इंचे कुटुंबही होते. लक्ष्मीबार्इंचा त्यानंतर १२ व्या वर्षी विवाह झाला. कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीमुळे लक्ष्मीबाई पतीसमवेत सांगलीत आल्या आणि मिळेल तिथे झोपडी बांधून राहत होत्या. हळदीच्या कारखान्यासह रुग्णालय, अनेकांच्या बागांमध्ये त्या राबत होत्या. लक्ष्मीबार्इंचे पती, त्यांची पाच मुले व दोन मुली आता हयात नाहीत. नातवंडेही विविध कारणांनी मृत्युमुखी पडली. परतवंडांपैकी केवळ मीनाक्षी या एकट्याच जिवंत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीroad transportरस्ते वाहतूक