शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: श्रेयवादाची जुगलबंदी ठरणार नव्या राजकीय संघर्षाची नांदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 16:42 IST

आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर मतदारसंघातील राजकारण अनेक नावीन्यपूर्ण वळणे घेत पुन्हा संघर्षाच्या वळणावर आले

दत्ता पाटीलतासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या सत्तानाट्यानंतर कवठेमहांकाळ पाणी योजनेच्या श्रेयवादाचा नारळ फुटला. तेव्हापासून सुरू झालेली श्रेयवादाची चढाओढ तासगाव पंचायत समिती इमारत बांधकामाच्या निधी मंजुरीपर्यंत येऊन ठेपली आहे. भाजप, राष्ट्रवादीच्या श्रेयवादाचा संघर्ष राष्ट्रवादीचे रोहित पाटील आणि भाजपचे प्रभाकर पाटील या युवा नेत्यांनी चांगलाच मनावर घेतला आहे. या श्रेयवादाच्या जुगलबंदीने राजकीय संघर्षाची नांदी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने मतदारसंघात युवा नेत्यांच्या संघर्षाचा नवा अध्याय पाहिला मिळत आहे.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील व खासदार संजय पाटील यांच्या गटातील जुन्या संघर्षाची नव्याने सुरुवात कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीनंतर झाली तेव्हापासून आजअखेर हा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे.कवठेमहांकाळचे नगराध्यक्षपद ताब्यात घेताच, शासनाने मंजूर केलेली पाणी योजना आमच्याच प्रयत्नातून झाल्याचा दावा खासदार गटाने केला. तर या पाणी योजनेचा प्रस्ताव देऊन पाठपुरावा केल्याचा दावा राष्ट्रवादीने केला तेव्हापासून मतदार संघात येणाऱ्या प्रत्येक निधीवर दोन्ही गटांतील नेते दावा करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेयवादाचा कांगावा सुरू आहे.सहा महिन्यांपूर्वी पंचायत समितीला १५ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर झाला. मात्र राज्यातील सरकार बदलल्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांनी जुन्या सरकारमधील सर्वच कामांना स्थगिती दिली. त्याचवेळी पंचायत समितीच्या निधीसही स्थगिती मिळाली. ही स्थगिती नुकतीच शासनाकडून शासनाकडून उठवण्यात आली. यावरून समाजमाध्यमांवर श्रेयवाद सुरू झाला. भाजपचे नेते प्रभाकर पाटील यांनी पुराव्यांसह हे आमचेच श्रेय असल्याचे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही पुराव्यांसह भूमिका मांडली. या श्रेयवादाने भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतःचे स्वतःच समाधान करून घेतले असले तरी सामान्य जनतेला नेमके काम कोणाचे आहे, याचे वास्तव माहीत आहे. मुळातच श्रेयवादाचा आटापिटा कशासाठी? असाच प्रश्न आहे.पब्लिक सब जानती है...! आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर मतदारसंघातील राजकारण अनेक नावीन्यपूर्ण वळणे घेत पुन्हा संघर्षाच्या वळणावर आले आहे. दरम्यानच्या काळात तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघांतील सर्वच नेत्यांनी संधिसाधू आणि सोयीस्कर भूमिका घेत राजकारण केले. पुन्हा संघर्षाच्या वळणावर आल्यानंतर अनेक वर्षांपासून विकासाचा गाजावाजा पुन्हा सुरू झाला.  त्यासाठी श्रेयवादाचा आट्टापट्टा चाललेला आहे. मात्र, ये पब्लिक है, सब जानती है...!’, अशीच भावना जनतेची आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण