शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

Sangli News: श्रेयवादाची जुगलबंदी ठरणार नव्या राजकीय संघर्षाची नांदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 16:42 IST

आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर मतदारसंघातील राजकारण अनेक नावीन्यपूर्ण वळणे घेत पुन्हा संघर्षाच्या वळणावर आले

दत्ता पाटीलतासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या सत्तानाट्यानंतर कवठेमहांकाळ पाणी योजनेच्या श्रेयवादाचा नारळ फुटला. तेव्हापासून सुरू झालेली श्रेयवादाची चढाओढ तासगाव पंचायत समिती इमारत बांधकामाच्या निधी मंजुरीपर्यंत येऊन ठेपली आहे. भाजप, राष्ट्रवादीच्या श्रेयवादाचा संघर्ष राष्ट्रवादीचे रोहित पाटील आणि भाजपचे प्रभाकर पाटील या युवा नेत्यांनी चांगलाच मनावर घेतला आहे. या श्रेयवादाच्या जुगलबंदीने राजकीय संघर्षाची नांदी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने मतदारसंघात युवा नेत्यांच्या संघर्षाचा नवा अध्याय पाहिला मिळत आहे.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील व खासदार संजय पाटील यांच्या गटातील जुन्या संघर्षाची नव्याने सुरुवात कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीनंतर झाली तेव्हापासून आजअखेर हा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे.कवठेमहांकाळचे नगराध्यक्षपद ताब्यात घेताच, शासनाने मंजूर केलेली पाणी योजना आमच्याच प्रयत्नातून झाल्याचा दावा खासदार गटाने केला. तर या पाणी योजनेचा प्रस्ताव देऊन पाठपुरावा केल्याचा दावा राष्ट्रवादीने केला तेव्हापासून मतदार संघात येणाऱ्या प्रत्येक निधीवर दोन्ही गटांतील नेते दावा करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेयवादाचा कांगावा सुरू आहे.सहा महिन्यांपूर्वी पंचायत समितीला १५ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर झाला. मात्र राज्यातील सरकार बदलल्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांनी जुन्या सरकारमधील सर्वच कामांना स्थगिती दिली. त्याचवेळी पंचायत समितीच्या निधीसही स्थगिती मिळाली. ही स्थगिती नुकतीच शासनाकडून शासनाकडून उठवण्यात आली. यावरून समाजमाध्यमांवर श्रेयवाद सुरू झाला. भाजपचे नेते प्रभाकर पाटील यांनी पुराव्यांसह हे आमचेच श्रेय असल्याचे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही पुराव्यांसह भूमिका मांडली. या श्रेयवादाने भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतःचे स्वतःच समाधान करून घेतले असले तरी सामान्य जनतेला नेमके काम कोणाचे आहे, याचे वास्तव माहीत आहे. मुळातच श्रेयवादाचा आटापिटा कशासाठी? असाच प्रश्न आहे.पब्लिक सब जानती है...! आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर मतदारसंघातील राजकारण अनेक नावीन्यपूर्ण वळणे घेत पुन्हा संघर्षाच्या वळणावर आले आहे. दरम्यानच्या काळात तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघांतील सर्वच नेत्यांनी संधिसाधू आणि सोयीस्कर भूमिका घेत राजकारण केले. पुन्हा संघर्षाच्या वळणावर आल्यानंतर अनेक वर्षांपासून विकासाचा गाजावाजा पुन्हा सुरू झाला.  त्यासाठी श्रेयवादाचा आट्टापट्टा चाललेला आहे. मात्र, ये पब्लिक है, सब जानती है...!’, अशीच भावना जनतेची आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण