शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पुणे-मिरज रेल्वेमार्ग दुहेरीकरण जानेवारीपासून

By admin | Published: December 06, 2015 12:36 AM

संजयकाका पाटील : वारणाली उड्डाणपुलाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

सांगली : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या पुणे-मिरज आणि मिरज-फोंडा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या जानेवारीपासून प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेस सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, लवकरच सुरू होणाऱ्या विजापूर-पंढरपूर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षण प्रक्रियेत बदल करून या मार्गाचे उमदीजवळून सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार पाटील म्हणाले की, मिरज-पुणे रेल्वेमार्गावर गाड्यांची संख्या वाढत असल्याने आणि त्यामुळे प्रवासास विलंब होत असल्याने या मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. दुहेरीकरणासाठी केंद्र शासनाने सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असून, या मार्गाच्या दुहेरीकरणास प्रत्यक्ष सुरु वात होणार आहे. येत्या दोन महिन्यांत या मार्गाच्या कामांची निविदा प्रक्रिया राबवून कामास सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर प्रस्तावित विजापूर-पंढरपूर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासही शासनाने मंजुरी दिली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी या मार्गाचे इंडीजवळून सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली होती. मात्र, यापेक्षा हा रेल्वेमार्ग उमदी (ता. जत) येथून गेल्यास अंतर कमी होणार असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आता उमदीजवळून मार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाल्याने भविष्यात उमदी परिसरात रेल्वे पोहोचणार आहे. वारणाली आणि दह्यारी येथील उड्डाणपुलाच्या कामाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील पाणी योजनांच्या थकबाकीबाबत खासदार पाटील म्हणाले की, थकबाकीमुळे जिल्ह्यातील म्हैसाळ योजना अडचणीत सापडली असून, शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन थकबाकी वसुलीस प्रतिसाद देणे आवश्यक आहे. योजनेची १० कोटी ४१ लाखांची थकबाकी असल्याने वीज बिल भरल्याशिवाय योजना चालविणे कठीण आहे. योजनेच्या कार्यक्षेत्रातील वसंतदादा पाटील कारखाना (सांगली), मोहनराव शिंदे साखर कारखाना (आरग), अथणी शुगर (कें पवाड), महांकाली कारखाना (कवठेमहांकाळ) आणि राजारामबापू कारखान्याचे जत युनिट या साखर कारखान्यांशी योजनेच्या थकबाकीबाबत चर्चा झाली असून, त्यांनी थकबाकी वसुलीस प्रतिसाद देण्यास तयारी दर्शविली आहे.