शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सांगली जिल्ह्यासाठी रांजणी येथील जागेचा ‘ड्रायपोर्ट’साठी प्रस्ताव- : संजयकाका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:58 AM

सांगली : जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ड्रायपोर्टकरिता आम्ही रांजणी येथील जागेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडून या प्रकल्पासाठी २0 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

ठळक मुद्देस्पाईस पार्क, सौरऊर्जा प्रकल्पही उभारणारया प्रकल्पासाठी २0 हजार कोटी रुपयांची गुंतवणूकसांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, विजापूर, बेळगाव या जिल्ह्यातील

सांगली : जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ड्रायपोर्टकरिता आम्ही रांजणी येथील जागेचा प्रस्ताव दिला असून, केंद्र शासनाकडून या प्रकल्पासाठी २0 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ व प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

खा. पाटील म्हणाले की, हे एक कोरडे बंदर असणार आहे. फुले, द्राक्षे, डाळिंब, दूध अशा शेती व शेतीपूरक उद्योगातील उत्पादनांना ते उपयोगी ठरणार आहे. येथून थेट निर्यात करण्यासाठी याठिकाणी संबंधित सर्व शासकीय कार्यालयेही थाटली जाणार आहेत. या पोर्टचा फायदा सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, विजापूर, बेळगाव या जिल्ह्यातील शेतकºयांनाही होणार आहे. परदेशातून प्रक्रियेसाठी येणाºया कच्च्या मालासाठीही हे बंदर उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी उद्योगाच्या वाढीस चालना मिळेल.

बंदर झाल्यानंतर याठिकाणी रस्ते, वीज, शीतगृहे, गोदामे यासारख्या सुविधांचा लाभही जिल्ह्याला होणार आहे. त्यामुळे हा निर्णय जिल्ह्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.याचठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यातून निर्माण होणाºया विजेमुळे सिंचन योजनांसमोरील विजेचा प्रश्न निकालात निघेल. अनेकदा सिंचन योजना वीजबिलाअभावी बंद पडतात. सौरऊर्जा प्रकल्पसुद्धा आमच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे.

स्पाईस पार्क उभारण्याचेही प्रयत्न आहेत. लोणचे व चटण्यांची मोठी बाजारपेठ या माध्यमातून तयार होईल. जिल्ह्यातील अशा उद्योगाला निर्यातीचे दरवाजे खुले होतील, असेही ते म्हणाले. यावेळी मकरंद देशपांडे उपस्थित होते.'जागेची उपलब्धता मोठीशासनाच्याच मालकीची रांजणी येथील २ हजार २00 एकर जागा उपलब्ध आहे. याच जागेचा प्रस्ताव आम्ही केंद्र शासनाकडे दिला आहे. प्रकल्पासाठी २ हजार एकर जागा लागेल. या जागेच्या बाजूनेच विजापूर-गुहागर हा राष्टÑीय महामार्ग प्रस्तावित आहे. त्यामुळे आपोआप रस्त्याचाही प्रश्न मार्गी लागेल. या प्रकल्पाचा विकास आराखडा येत्या आठवड्याभरात निश्चित होणार आहे, असे खा. पाटील म्हणाले.‘टेंभू’साठी ५५0 कोटींची मागणीताकारी व म्हैसाळ योजनेसाठी यापूर्वीच पंतप्रधान सिंचन योजनेतून निधीची तरतूद झाली आहे. टेंभूसाठी आणखी ५५0 कोटी रुपयांची मागणी आम्ही केली आहे. नोव्हेंबर २0१९ पर्यंत सिंचन योजनांची कामे पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले.