शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

निविदा प्रक्रियेत जिल्हा बँक ‘सलाईन’वर

By admin | Updated: May 10, 2017 23:35 IST

निविदा प्रक्रियेत जिल्हा बँक ‘सलाईन’वर

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यासाठी अद्याप एकही निविदा अर्ज दाखल न झाल्याने, जिल्हा बँकेची चिंता वाढली आहे. गुरुवारी निविदा अर्जांसाठी शेवटची मुदत असून जिल्हा बँकेच्या आर्थिक भवितव्याचा फैसलाही यावर अवलंबून राहणार आहे. जिल्हा बँकेने ९३ कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी वसंतदादा कारखाना ताब्यात घेऊन तो भाडेतत्त्वाने चालविण्यास देण्याकरिता निविदा प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक कारखान्यांनी बँकेकडे याबाबत चौकशी केली होती. प्रत्यक्षात सहा अर्जांची विक्री झाली आहे. सांगली जिल्ह्यातील हुतात्मा, राजारामबापू, कोल्हापुरातील व्यंकटेश्वरा, रेणुका शुगर, उगार शुगर आणि मुंबईतील दत्त इंडिया यांनी निविदा अर्ज खरेदी केले आहेत. त्यांच्याकडून मुदतीत अर्ज दाखल होण्याची बँकेला प्रतीक्षा आहे. उर्वरित एका दिवसात आता किती अर्ज दाखल होणार, यावरच बँकेचे भवितव्य अवलंबून आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान तीन निविदा दाखल होण्याची अपेक्षा आहे. गुरुवारी अंतिम मुदतीत कारखानदार निविदा अर्ज दाखल करणार की नाही, याची कोणालाही कल्पना नाही. निविदापूर्व निर्माण झालेला संचालकांमधील वाद आणि एकूणच संशयकल्लोळ निविदेला अडचणीचा ठरत आहे. निविदेला प्रतिसाद मिळाला नाही, तर बँकेच्या अडचणीत भरच पडणार आहे. बँकेला कोणत्याही परिस्थितीत चालू आर्थिक वर्षात कारखान्याची थकबाकी वसूल करणे गरजेचेच बनले आहे. याच थकबाकीमुळे बँकेचा यंदाचा नफा घटला असून एनपीएमध्येही वाढ झाली आहे. आर्थिक अडचणींचा हा बांध तोडण्याचा एकमेव मार्ग आता निविदेवर अवलंबून राहिला आहे. त्यामुळे गुरुवारी बँकेच्या आर्थिक भवितव्याचाही फैसला होणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसात निविदा दाखल होण्याची शक्यता होती. बुधवारी काही कारखानदारांमार्फत निविदा दाखल होण्याची शक्यता वाटत होती. पण प्रत्यक्षात एकही निविदा दाखल झालेली नाही. निविदा प्रक्रिया यशस्वी झाली, तर बँकेला चालूवर्षी ५0 कोटी रुपये संबंधित ठेकेदारांकडून मिळणार असल्याने बँक आशावादी आहे. त्यामुळेच बँकेची चिंता आता वाढली आहे. काय आहे निविदेत?ज्या निविदा प्रक्रियेतील नियम व अटींवरून संचालक मंडळाच्या बैठकीत गोंधळ झाला, त्या अटी प्रत्यक्षात कायदेतज्ज्ञांकडून तयार केल्या आहेत. राज्य सहकारी बँकांच्या जबाबदार अधिकाऱ्यांमार्फत त्यांची खातरजमा करून घेतली आहे. उच्च न्यायालयातील तज्ज्ञ वकिलांनीही त्यास हिरवा कंदील दर्शविला आहे. तरीही संशयकल्लोळ सुरू आहे.