शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
4
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
5
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
6
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
7
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
8
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
9
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
10
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
11
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
12
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
13
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
14
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
15
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
16
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
17
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
18
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
19
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
20
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ

निविदा प्रक्रियेत जिल्हा बँक ‘सलाईन’वर

By admin | Updated: May 10, 2017 23:35 IST

निविदा प्रक्रियेत जिल्हा बँक ‘सलाईन’वर

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यासाठी अद्याप एकही निविदा अर्ज दाखल न झाल्याने, जिल्हा बँकेची चिंता वाढली आहे. गुरुवारी निविदा अर्जांसाठी शेवटची मुदत असून जिल्हा बँकेच्या आर्थिक भवितव्याचा फैसलाही यावर अवलंबून राहणार आहे. जिल्हा बँकेने ९३ कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी वसंतदादा कारखाना ताब्यात घेऊन तो भाडेतत्त्वाने चालविण्यास देण्याकरिता निविदा प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक कारखान्यांनी बँकेकडे याबाबत चौकशी केली होती. प्रत्यक्षात सहा अर्जांची विक्री झाली आहे. सांगली जिल्ह्यातील हुतात्मा, राजारामबापू, कोल्हापुरातील व्यंकटेश्वरा, रेणुका शुगर, उगार शुगर आणि मुंबईतील दत्त इंडिया यांनी निविदा अर्ज खरेदी केले आहेत. त्यांच्याकडून मुदतीत अर्ज दाखल होण्याची बँकेला प्रतीक्षा आहे. उर्वरित एका दिवसात आता किती अर्ज दाखल होणार, यावरच बँकेचे भवितव्य अवलंबून आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान तीन निविदा दाखल होण्याची अपेक्षा आहे. गुरुवारी अंतिम मुदतीत कारखानदार निविदा अर्ज दाखल करणार की नाही, याची कोणालाही कल्पना नाही. निविदापूर्व निर्माण झालेला संचालकांमधील वाद आणि एकूणच संशयकल्लोळ निविदेला अडचणीचा ठरत आहे. निविदेला प्रतिसाद मिळाला नाही, तर बँकेच्या अडचणीत भरच पडणार आहे. बँकेला कोणत्याही परिस्थितीत चालू आर्थिक वर्षात कारखान्याची थकबाकी वसूल करणे गरजेचेच बनले आहे. याच थकबाकीमुळे बँकेचा यंदाचा नफा घटला असून एनपीएमध्येही वाढ झाली आहे. आर्थिक अडचणींचा हा बांध तोडण्याचा एकमेव मार्ग आता निविदेवर अवलंबून राहिला आहे. त्यामुळे गुरुवारी बँकेच्या आर्थिक भवितव्याचाही फैसला होणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसात निविदा दाखल होण्याची शक्यता होती. बुधवारी काही कारखानदारांमार्फत निविदा दाखल होण्याची शक्यता वाटत होती. पण प्रत्यक्षात एकही निविदा दाखल झालेली नाही. निविदा प्रक्रिया यशस्वी झाली, तर बँकेला चालूवर्षी ५0 कोटी रुपये संबंधित ठेकेदारांकडून मिळणार असल्याने बँक आशावादी आहे. त्यामुळेच बँकेची चिंता आता वाढली आहे. काय आहे निविदेत?ज्या निविदा प्रक्रियेतील नियम व अटींवरून संचालक मंडळाच्या बैठकीत गोंधळ झाला, त्या अटी प्रत्यक्षात कायदेतज्ज्ञांकडून तयार केल्या आहेत. राज्य सहकारी बँकांच्या जबाबदार अधिकाऱ्यांमार्फत त्यांची खातरजमा करून घेतली आहे. उच्च न्यायालयातील तज्ज्ञ वकिलांनीही त्यास हिरवा कंदील दर्शविला आहे. तरीही संशयकल्लोळ सुरू आहे.