शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
3
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
4
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
6
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
7
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
8
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
9
ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
10
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
11
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
13
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
14
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
15
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
16
Yuvraj Singh Father Yograj Singh : "मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
17
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
18
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
19
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
20
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
Daily Top 2Weekly Top 5

‘ताकारी’चे आवर्तन लांबल्याने तीव्र टंचाई, शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:51 IST

देवराष्ट्रे : कडेगाव, पलूस, खानापूर या दुष्काळी तालुक्यांना नवसंजीवनी ठरलेल्या ताकारी उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन अद्याप सुरू झालेले नाही.

ठळक मुद्देनेत्यांचे दुर्लक्ष; शासनाकडेही कोट्यवधीची थकबाकीजिल्हाधिकाºयांशी पत्रव्यवहार झाला असून शासनाकडूनही बिलाची प्रतीक्षा आहे.

अतुल जाधव ।देवराष्ट्रे : कडेगाव, पलूस, खानापूर या दुष्काळी तालुक्यांना नवसंजीवनी ठरलेल्या ताकारी उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन अद्याप सुरू झालेले नाही. १० कोटी रूपयांच्या वीज बिलाच्या थकबाकीपोटी महावितरण कंपनीने वीजपुरवठा तोडला आहे. परिणामी रब्बी आवर्तन दीड महिना लांबले आहे. तालुक्यात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली असून शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकºयांकडून वसूल केलेली पाणीपट्टीची रक्कम कारखानदार वर्षभर वापरतात. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका शेतकºयांना बसत आहे. हजारो हेक्टरवरील ऊस अडचणीत सापडला आहे. शेतकºयांना पाणी टंचाईचा सामना करीत दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आवर्तन लांबल्याने ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर बागायत क्षेत्र धोक्यात आले आहे. मूठभर कारखानदार व प्रशासनातील कामचुकार कर्मचारी यांच्यामुळे नियमित पाणीपट्टी भरणारा शेतकरी भरडला जात आहे.

रब्बी हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरीही प्रशासनाने ताकारीचे आवर्तन सुरू करण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. सध्या योजनेचे ९ कोटी ४७ लाख रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने वीज पुरवठा बंद आहे. गत हंगामात साखर कारखान्यांनी शेतकºयांकडून वसूल केलेली पाणीपट्टीची रक्कम अद्यापही वर्ग केलेली नाही. दरवर्षीच ही स्थिती निर्माण होत असून शासनाकडूनही पाणीपट्टीची कोट्यवधीची रक्कम येणे आहे. यंदा परतीच्या पावसाने सरासरी ओलांडत खरीप हंगाम पार पाडला.

आता रब्बी हंगाम सुरू झाला असून शेतकºयांनी गहू, हरभरा यासह इतर रब्बी पिकांची पेरणी, टोकणी केली आहे.दरवर्षी ताकारी योजनेची दोन रब्बी आवर्तने देण्यात येतात. त्यामुळे आता पाटबंधारे विभागाने योजनेचे रब्बी आवर्तन तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.गत हंगामात साखर कारखान्यांनी वसूल केलेली पाणीपट्टीची रक्कम अद्यापही पाटबंधारेकडे वर्ग केलेली नाही. त्याचबरोबर जून २०१६ या कालावधित तासगाव तालुक्यासाठी येरळा नदीतून योजनेचे पाणी सोडले होते. हे पाणी लोकप्रतिनिधींच्या मागणीवरुन शासनाने टंचाईतून सोडले होते. याचे ४ कोटीचे बिल शासनाकडून येणे आहे.

याबद्दल जिल्हाधिकाºयांशी पत्रव्यवहार झाला असून शासनाकडूनही बिलाची प्रतीक्षा आहे. यावर्षीही खरीप हंगामात टंचाईतून एक आवर्तन देण्यात आले होते. त्याचेही बिल शासनाकडून येणे आहे. त्यामुळे योजनेचे आवर्तन सुरू होण्यासाठी कारखान्यांबरोबरच जिल्हाधिकाºयांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे.पाणीपट्टी वसुली : साखर आयुक्तांना पत्रताकारी योजनेचे आवर्तन लांबले आहे. शासनाकडील बाकी व कार्यक्षेत्रातील कारखान्यांनी वसूल केलेली पाणीपट्टी न भरल्याने ही स्थिती ओढविली आहे. कारखान्यांकडील पाणीपट्टी वसुलीसाठी ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी थेट साखर आयुक्तांना पत्र पाठविले आहे. ताकारी योजना दुष्काळी जनतेसाठी वरदान ठरत आहे. मात्र शेतकरी पाणीपट्टी वेळेवर भरत असतानाही योजना सुरू होत नसल्याचे टंचाईजन्य स्थिती निर्माण झाली आहे. कारखान्यांकडील बाकी वसुलीसाठी त्रास होत आहे. या वसुलीसाठी साखर आयुक्तांना पत्र पाठविले असल्याचे पाटील यांनी सांगितले.महावितरण कंपनीला वीज जोडण्यासाठी पत्र : पाटीलथकीत वीज बिलाची रक्कम मोठी असल्याने ती भरण्यासाठी शासनाकडील बाकी लवकर मिळणे गरजेचे आहे. ती या आठवड्यात जमा होईल. ही रक्कम जमा झाली की आम्ही अडीच कोटी रुपयांचा भरणा करु. तरी महावितरणने वीज पुरवठा जोडावा, असे पत्र महावितरण कंपनीला दिले असल्याचे ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीwater transportजलवाहतूक