शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

सुरक्षित वाहन चालविण्यास प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : या वर्षभरात जिल्ह्यातील अपघातांचे व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असलेतरी अजूनही अपघातांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : या वर्षभरात जिल्ह्यातील अपघातांचे व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असलेतरी अजूनही अपघातांचे प्रमाण कमी होणे अपेक्षित आहे. कोरोनामुळे नसलेल्या अनेक सवयी नागरिकांनी अंगी बाणवल्या. अगदी त्याप्रमाणेच सुरक्षित वाहन चालविण्यासाठी वाहनचालकांनी प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी सांगलीत केले.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक शाखेच्यावतीने महिनाभर चालणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, वाहन चालवताना आवश्यक असलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन केल्यास कटू अनुभव येणार नाहीत. प्रशासनाकडूनही अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यास वाहनचालकांचा प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम म्हणाले, रस्ता सुरक्षा अभियानाचा कालावधी शासनाने वाढविल्याने वाहनचालकांत सुरक्षित वाहन चालविण्याबाबत अधिक जागरूकता होईल. वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी कारवाईबरोबरच प्रबोधनही आवश्यक आहे. अपघातामुळे होणारी हानी टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःहूनच नियम पाळल्यास त्याचा फायदा होणार आहे.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, आयुक्त नितीन कापडणीस, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, सहायक निरीक्षक प्रज्ञा देशमुख आदी उपस्थित होते.

चौकट

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी सुरक्षित वाहन चालविण्याविषयी उपस्थितांना शपथ दिली. तसेच महिलांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले. अभियानाच्या पहिल्या दिवशी वाहतूक नियम सांगणाऱ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले हाेते. शहरातील प्रमुख मार्गावरूनही महिलांची दुचाकी रॅली काढण्यात आली.