शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित वाहन चालविण्यास प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : या वर्षभरात जिल्ह्यातील अपघातांचे व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असलेतरी अजूनही अपघातांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : या वर्षभरात जिल्ह्यातील अपघातांचे व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असलेतरी अजूनही अपघातांचे प्रमाण कमी होणे अपेक्षित आहे. कोरोनामुळे नसलेल्या अनेक सवयी नागरिकांनी अंगी बाणवल्या. अगदी त्याप्रमाणेच सुरक्षित वाहन चालविण्यासाठी वाहनचालकांनी प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी सांगलीत केले.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक शाखेच्यावतीने महिनाभर चालणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, वाहन चालवताना आवश्यक असलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन केल्यास कटू अनुभव येणार नाहीत. प्रशासनाकडूनही अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यास वाहनचालकांचा प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम म्हणाले, रस्ता सुरक्षा अभियानाचा कालावधी शासनाने वाढविल्याने वाहनचालकांत सुरक्षित वाहन चालविण्याबाबत अधिक जागरूकता होईल. वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी कारवाईबरोबरच प्रबोधनही आवश्यक आहे. अपघातामुळे होणारी हानी टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःहूनच नियम पाळल्यास त्याचा फायदा होणार आहे.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, आयुक्त नितीन कापडणीस, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, सहायक निरीक्षक प्रज्ञा देशमुख आदी उपस्थित होते.

चौकट

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी सुरक्षित वाहन चालविण्याविषयी उपस्थितांना शपथ दिली. तसेच महिलांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले. अभियानाच्या पहिल्या दिवशी वाहतूक नियम सांगणाऱ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले हाेते. शहरातील प्रमुख मार्गावरूनही महिलांची दुचाकी रॅली काढण्यात आली.