शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Sangli News: राजारामबापू कारखान्याची सूत्रे तिसऱ्या पिढीकडे, अध्यक्षपदी प्रतीक पाटील विराजमान

By श्रीनिवास नागे | Updated: February 17, 2023 14:01 IST

आजोबांनी स्थापन केलेल्या कारखान्याची सूत्रे नातवाकडे

युनूस शेखइस्लामपूर : सहकार क्षेत्रात एका कारखान्याची दुसरी शाखा स्थापन करण्याच्या देशातील पहिल्या विक्रमाची नोंद करणाऱ्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.

वयाच्या ३२ व्या वर्षी प्रतीक यांनी आपले आजोबा राजारामबापू पाटील यांनी १९६८ साली स्थापन केलेल्या या साखर कारखानदारीची धुरा अंगावर घेतली आहे. या निवडीने जयंत पाटील यांच्या राजकारणातील वारस प्रतीक हेच असतील यावर शिक्कामोर्तब झाले. उपाध्यक्षपदी विजयराव पाटील यांना कायम ठेवण्यात आले.येथील कारखाना कार्यस्थळावरील सभागृहात जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या अध्यखातेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष बैठक झाली.सहायक अधिकारी म्हणून  तालुका निबंधक रंजना बारहाते यांनी काम पाहिले.या बैठकीत प्रतीक पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी कार्तिक पाटील यांनी सूचना तर रघुनाथ जाधव यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी विजयराव पाटील यांना देवराज पाटील आणि बाळासाहेब पवार यांनी सूचना व अनुमोदन दिले.

विहित वेळेत दोन्ही पदासाठी एकच अर्ज आल्याने त्याची छाननी आणि माघारीची मुदत संपल्यानंतर सुरवसे यांनी अध्यक्षपदी प्रतीक जयंत पाटील आणि उपाध्यक्ष म्हणून विजयराव बळवंतराव पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले.निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी सर्व संचालकांसोबत राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आशिर्वाद घेतले. तर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेJayant Patilजयंत पाटील