खराब रस्त्यांमुळे हरवतेय टपाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST2021-04-18T04:26:20+5:302021-04-18T04:26:20+5:30
सांगली : ड्रेेनेजसाठी खोदलेले व काम पूर्ण झाल्यानंतर मातीच्या ढिगाऱ्यांमुळे चढ-उतारांनी भरलेले रस्ते यामुळे पोस्टमनच्या कॅरेजला लावलेली पत्रे पडत ...

खराब रस्त्यांमुळे हरवतेय टपाल
सांगली : ड्रेेनेजसाठी खोदलेले व काम पूर्ण झाल्यानंतर मातीच्या ढिगाऱ्यांमुळे चढ-उतारांनी भरलेले रस्ते यामुळे पोस्टमनच्या कॅरेजला लावलेली पत्रे पडत आहेत. हरवलेले टपाल शोधताना एका पोस्टमनची दमछाक झाली. खराब रस्त्यांमुळे अनेकांचे हाल सुरू आहेत.
सांगलीत वसंतदादा कारखाना, लक्ष्मीनगर, अजिंक्यनगर, शिवोदयनगर आदी उपनगरांमध्ये सर्वत्र ड्रेनेजसाठी रस्ते खोदले आहेत. ड्रेनेजचे काम ज्याठिकाणी पूर्ण होते, त्याठिकाणी केवळ मातीचे भराव टाकण्यात येतो. त्यामुळे चढ-उतारांचा रस्ता तयार होता. यावरुन वाहनेच नव्हे, नागरिकांना चालणेही मुश्किल झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांचे यामुळे हाल होत आहेत. त्यातच आता पोस्टमनची पत्रेही या खड्ड्यांमुळे हरवत आहेत. एका पोस्टमनने त्याच्या सायकलच्या कॅरेजला लावलेली पत्रे शिवोदयनगर परिसरात पडली. त्याची शोधाशोध करताना पोस्टमनची दमछाक झाली. टपाल व पार्सल पोहोचविताना पोस्टमनला येथील उपनगरांमध्ये त्रास होत आहे. अनेक रस्ते बंद असल्यामुळे पायपीट करीत किंवा सायकलने अनेक भागांना वेढा मारुन नागरिकांच्या घरात टपाल पोहोच करावे लागत आहे.