शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

मानोली येथील जमीन मोजणीचे वारसास्थळ नामशेष होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 2:20 PM

survey Manoli Kolhapur Sangli :  आधुनिक काळातील पश्चिम महाराष्ट्राच्या जमीन मोजणीची ( सर्व्हेक्षणाची ) सुरुवात १८४२ साली ज्या ठिकाणाहून झाली, त्या  पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू  असलेल्या "मानोली ट्रिग पॉइंट" या ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याने काही वर्षांनी हा भाग नामशेष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे याची वेळीच दाखल घेणे आवश्यक आहे. हे ठिकाण पुणे विभागातील महसूल खात्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. 

ठळक मुद्देमानोली येथील जमीन मोजणीचे वारसास्थळ नामशेष होण्याची शक्यता मानोली ट्रिग पॉइंट" या ठिकाणी मोठ्या भेगा

विकास शहाशिराळा :  आधुनिक काळातील पश्चिम महाराष्ट्राच्या जमीन मोजणीची ( सर्व्हेक्षणाची ) सुरुवात १८४२ साली ज्या ठिकाणाहून झाली, त्या पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू  असलेल्या "मानोली ट्रिग पॉइंट" या ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याने काही वर्षांनी हा भाग नामशेष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे याची वेळीच दाखल घेणे आवश्यक आहे. हे ठिकाण पुणे विभागातील महसूल खात्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आंबा या गावापासून विशाळगडाच्या रस्त्यावर तीन कि.मी. अंतरावरील मानोली गाव पर्यटन स्थळ पश्चिम महाराष्ट्राचे मानबिंदू ठरावे असे आहे . ब्रिटिशांनी १० एप्रिल १८०२ रोजी भारताच्या त्रिकोनमितीय सर्वेक्षणाला सुरुवात केली. सन १८०० मध्ये झालेल्या म्हैसुर विजयानंतर ब्रिटिशांचा लेफ्टनंट विलियम लॅम्बटन यांनी भारतातील भू - भागाचे अचूक सर्व्हेक्षण करण्याची आवश्यकता ब्रिटिश प्रशासनाकडे कळवली.ब्रिटिशांनी आरंभलेल्या त्रिकोतमितीय सर्वेक्षणात दोन ठिकाणांना जोडणाऱ्या एका आधाररेषेवरुन ( बेस लाईन ) तिसऱ्या ठिकाणाकडे होणारे कोन मोजले जात आणि त्यांची स्थाननिश्चिती केली जात असे. या प्रकल्पाच्या सुरुवातीची आधाररेषा मद्रास जवळील सेंट थामस माऊंट आणि पेरुमबक्कम यातील १२ किमी लांबीची रेषा होती. दुसरी आधाररेषा बैंगलोर येथे १८०४ मध्ये लेफ्टनंट वारन यांनी निर्धारित केली. १८०६ कोईमतूर , १८०८ तजांवर , १८० ९ तिनवेल्ली , १८२२ हैद्राबाद येथपर्यंत ही रेषा पुढे वाढविण्यात आली. दुसरीकडून दक्षिण- पश्चिम बाजूने अँड्यू स्काऊट वा यांनी १८६१ पर्यंत गोव्यापासून ते कराचीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण केले.या सर्वेक्षणास ' द गेट दीयोमेट्रीक सर्वे ऑफ इंडिया ' असे नाव दिले. ब्रिटिशांनी आपली वसाहतवादी धोरणे राबवण्यासाठी हे सर्वेक्षण केले असले तरी, संपूर्ण भारताचे मानचित्र , देशाची समृध्दता अचूकतेने शास्त्रीय पद्धतीने अधोरेखित झाले हेच या सर्व्हेक्षणाचे ऐतिहासिक महत्त्व आहे .१८४२ मध्ये जेव्हा स्कार कोकणातून सर्वेक्षण करत आंबा घाट पार करून आला . तेव्हा, त्रिमितबिंदू निश्चित होईना. उदगिरी , विशाळगड , कासार्डे अशा अनेक ठिकाणी चाचपणी करून अखेर , स्थानिकांच्या मदतीने मानोली येथे हा बिंदू निर्धारित केला गेला. मानोली येथील त्रिमितबिंदूमुळे , कोल्हापूर , सांगली , सातारा , पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांची स्थाननिश्चिती झाली. पुढे याच आधारावर कराचीपर्यंत जमीन मोजणी करण्यात आली .सन १८४२ साली ख्रिसमस साजरा करुन स्कॉट याने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मानोली येथून नव्या कामाची सुरुवात केली . या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात महसूल विभागाच्या वतीने या वारसास्थळावर पांढरा ध्वज फडकवला जातो. मानोली येथील त्रिमितबिंदू हे वारसास्थळ आहे. येथील डोंगराच्या कड्याना मोठ्या भेगा पडल्या आहेत तर काही भाग खचत चालला आहे, त्यामुळे भूमापनाच्या प्रारंभाचे स्मरण करताना या वारसास्थळाचे संवर्धन करुन नव्या पिढीला याचे महत्त्व समजावण्याचा संकल्प करणे आवश्यक वाटते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगली