शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

पूल पीडब्ल्यूडीचा, डोकेदुखी महापालिकेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 15:45 IST

रुंदीकरण करायचे झाल्यास महापालिकेला किमान ८ ते १० कोटींची तरतूद करावी लागेल. त्यात रस्ता रुंदीकरणाबाबत न्यायालयात दावाही प्रलंबित आहे. त्यामुळे भविष्यात पूल उभा राहिला तरी, जोड रस्त्याअभावी त्यावरील वाहतूक सुरू होण्यात अडचणी येणार आहेत.

ठळक मुद्देपर्यायी पुलावरून अवजड वाहतूक सुरू झाल्यास बाजारपेठेतील वाहतुकीची समस्या गंभीर बनणार आहे.

सांगली : कृष्णा नदीवरील आयर्विनच्या पर्यायी पुलाचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पुलाला व्यापारी, नागरिकांचा विरोध आहे. त्यात नदीवर केवळ पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार आहे. पुलाच्या जोड रस्त्यांची जबाबदारी महापालिकेवर आहे.

पांजरपोळ ते टिळक चौक आणि कापडपेठमार्गे जाणाऱ्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. रुंदीकरण करायचे झाल्यास महापालिकेला किमान ८ ते १० कोटींची तरतूद करावी लागेल. त्यात रस्ता रुंदीकरणाबाबत न्यायालयात दावाही प्रलंबित आहे. त्यामुळे भविष्यात पूल उभा राहिला तरी, जोड रस्त्याअभावी त्यावरील वाहतूक सुरू होण्यात अडचणी येणार आहेत.

महाडमधील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेमुळे आयर्विन पुलाची कमजोरी आणि त्याला पर्यायी पुलाची गरज समोर आली. त्यानुसार आयर्विन पुलाचेही आॅडिट झाले. हा पूल अजूनही मजबूत असला तरी, त्याची कालमर्यादा संपली आहे. त्यामुळे पुन्हा पर्यायी पुलाच्या मागणीचा विचार सुरू झाला. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पावेळी हा मुद्दा लावून धरला. अखेर राज्याच्या अर्थसंकल्पात नव्या पर्यायी पुलाच्या २५ कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला. पुलाच्या कामाची निविदा काढून ठेकेदाराला वर्कआॅर्डरही देण्यात आली.

मेन रोड-कापडपेठमार्गे पांजरपोळसमोरून सांगलीवाडीतील चिंचेच्या बनापर्यंत हा पूल उभारण्यात येणार आहे. टिळक चौकमार्गे महापालिकेकडे जाणारा मार्ग एकेरी आहे. मेन रोड-कापड पेठ रस्ताही एकेरी आहे. सांगलीवाडीच्या नागरिकांनी पुलाला विरोध सुरू केला; मग सांगलीतील व्यापाऱ्यांनी विरोधाची भूमिका घेतली. त्यामुळे पुलाचे काम बंद पडले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्याला सांगलीकडील बाजूला जोड रस्ता तयार करण्याचे काम महापालिकेला करावे लागणार आहे.

पांजरपोळ ते कापडपेठमार्गे मेनरोड हा रस्ता डीपीमध्ये ८० फुटी असला तरी, त्यासंदर्भात कित्येक वर्षांपासून न्यायालयात दावा सुरू आहे. न्यायालयानेही रुंदीकरणाला स्थगिती दिली आहे. त्यात रुंदीकरण करायचे झाल्यास जवळपास दीडशेहून अधिक व्यापाºयांची दुकाने हलवावी लागणार आहेत.

महापालिकेने पुलाच्या मंजुरीवेळी रस्ता रुंदीकरण करून देण्याची ग्वाही दिली आहे; पण तत्कालीन आयुक्तांनी रुंदीकरणातील तांत्रिक अडचणी समजावून घेतलेल्या नाहीत. व्यापारी, नागरिकांची घरे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यांना भरपाईपोटी ८ ते १० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. या रकमेची तरतूद कोठून करायची, हा प्रश्न महापालिकेसमोर आहे.

सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता, रुंदीकरणाची प्रक्रियाच पूर्ण होऊ शकत नाही. त्यातच हरभट रोडवरील वाहतुकीची कोंडी होते. आता अवजड वाहनांना बंदी असतानाही वाहनांची गर्दी आहे. पार्किंगची कुठलीही व्यवस्था बाजारपेठेत नाही. त्यात पर्यायी पुलावरून अवजड वाहतूक सुरू झाल्यास बाजारपेठेतील वाहतुकीची समस्या गंभीर बनणार आहे. त्यामुळे पूल सार्वजनिक बांधकाम विभागाचा असला तरी, डोकेदुखी मात्र महापालिकेचीच अधिक होणार असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :SangliसांगलीTrafficवाहतूक कोंडीriverनदी