शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

पूल पीडब्ल्यूडीचा, डोकेदुखी महापालिकेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 15:45 IST

रुंदीकरण करायचे झाल्यास महापालिकेला किमान ८ ते १० कोटींची तरतूद करावी लागेल. त्यात रस्ता रुंदीकरणाबाबत न्यायालयात दावाही प्रलंबित आहे. त्यामुळे भविष्यात पूल उभा राहिला तरी, जोड रस्त्याअभावी त्यावरील वाहतूक सुरू होण्यात अडचणी येणार आहेत.

ठळक मुद्देपर्यायी पुलावरून अवजड वाहतूक सुरू झाल्यास बाजारपेठेतील वाहतुकीची समस्या गंभीर बनणार आहे.

सांगली : कृष्णा नदीवरील आयर्विनच्या पर्यायी पुलाचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पुलाला व्यापारी, नागरिकांचा विरोध आहे. त्यात नदीवर केवळ पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार आहे. पुलाच्या जोड रस्त्यांची जबाबदारी महापालिकेवर आहे.

पांजरपोळ ते टिळक चौक आणि कापडपेठमार्गे जाणाऱ्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. रुंदीकरण करायचे झाल्यास महापालिकेला किमान ८ ते १० कोटींची तरतूद करावी लागेल. त्यात रस्ता रुंदीकरणाबाबत न्यायालयात दावाही प्रलंबित आहे. त्यामुळे भविष्यात पूल उभा राहिला तरी, जोड रस्त्याअभावी त्यावरील वाहतूक सुरू होण्यात अडचणी येणार आहेत.

महाडमधील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेमुळे आयर्विन पुलाची कमजोरी आणि त्याला पर्यायी पुलाची गरज समोर आली. त्यानुसार आयर्विन पुलाचेही आॅडिट झाले. हा पूल अजूनही मजबूत असला तरी, त्याची कालमर्यादा संपली आहे. त्यामुळे पुन्हा पर्यायी पुलाच्या मागणीचा विचार सुरू झाला. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पावेळी हा मुद्दा लावून धरला. अखेर राज्याच्या अर्थसंकल्पात नव्या पर्यायी पुलाच्या २५ कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला. पुलाच्या कामाची निविदा काढून ठेकेदाराला वर्कआॅर्डरही देण्यात आली.

मेन रोड-कापडपेठमार्गे पांजरपोळसमोरून सांगलीवाडीतील चिंचेच्या बनापर्यंत हा पूल उभारण्यात येणार आहे. टिळक चौकमार्गे महापालिकेकडे जाणारा मार्ग एकेरी आहे. मेन रोड-कापड पेठ रस्ताही एकेरी आहे. सांगलीवाडीच्या नागरिकांनी पुलाला विरोध सुरू केला; मग सांगलीतील व्यापाऱ्यांनी विरोधाची भूमिका घेतली. त्यामुळे पुलाचे काम बंद पडले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्याला सांगलीकडील बाजूला जोड रस्ता तयार करण्याचे काम महापालिकेला करावे लागणार आहे.

पांजरपोळ ते कापडपेठमार्गे मेनरोड हा रस्ता डीपीमध्ये ८० फुटी असला तरी, त्यासंदर्भात कित्येक वर्षांपासून न्यायालयात दावा सुरू आहे. न्यायालयानेही रुंदीकरणाला स्थगिती दिली आहे. त्यात रुंदीकरण करायचे झाल्यास जवळपास दीडशेहून अधिक व्यापाºयांची दुकाने हलवावी लागणार आहेत.

महापालिकेने पुलाच्या मंजुरीवेळी रस्ता रुंदीकरण करून देण्याची ग्वाही दिली आहे; पण तत्कालीन आयुक्तांनी रुंदीकरणातील तांत्रिक अडचणी समजावून घेतलेल्या नाहीत. व्यापारी, नागरिकांची घरे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यांना भरपाईपोटी ८ ते १० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. या रकमेची तरतूद कोठून करायची, हा प्रश्न महापालिकेसमोर आहे.

सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता, रुंदीकरणाची प्रक्रियाच पूर्ण होऊ शकत नाही. त्यातच हरभट रोडवरील वाहतुकीची कोंडी होते. आता अवजड वाहनांना बंदी असतानाही वाहनांची गर्दी आहे. पार्किंगची कुठलीही व्यवस्था बाजारपेठेत नाही. त्यात पर्यायी पुलावरून अवजड वाहतूक सुरू झाल्यास बाजारपेठेतील वाहतुकीची समस्या गंभीर बनणार आहे. त्यामुळे पूल सार्वजनिक बांधकाम विभागाचा असला तरी, डोकेदुखी मात्र महापालिकेचीच अधिक होणार असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :SangliसांगलीTrafficवाहतूक कोंडीriverनदी