शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

देशातील जातीविद्वेषाचे राजकारण बंधुतेला घातक : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:23 IST

इस्लामपूर : प्रत्येक धर्मातील महापुरुषांनी मानवतेची जाणीव पेरली; मात्र त्याच महापुरुषांचे अनुयायी आपली दुकानदारी चालविण्यासाठी शत्रुत्व पेरण्याचे काम करत आहेत

ठळक मुद्देइस्लामपुरात राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन; एन. डी. पाटील, अश्विनी धोंगडे यांना पुरस्कार प्रदानरत्येक धर्मवासीयांनी आपल्या धर्माचे आचरण करताना दुसºया धर्मातील जी चांगली तत्त्वे आहेत ती स्वीकारली,

इस्लामपूर : प्रत्येक धर्मातील महापुरुषांनी मानवतेची जाणीव पेरली; मात्र त्याच महापुरुषांचे अनुयायी आपली दुकानदारी चालविण्यासाठी शत्रुत्व पेरण्याचे काम करत आहेत. या प्रवृत्तींच्या माध्यमातून सुरु असलेले जातीविद्वेषाचे राजकारण बंधुतेला घातक आहे. अशावेळी सर्व महापुरुषांना बंधुतेच्या धाग्यात गुंफून एकात्मिक मानवतावादाच्या सूत्राने भारताला तत्त्वज्ञानात्मक महासत्ता बनविण्यासाठी बंधुतेचा विचार जोपासला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरु असलेल्या एकोणीसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील आणि ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे यांना ‘राष्ट्रीय बंधुता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सरोज पाटील, प्रकाश रोकडे, महेंद्र भारती, संमेलनाध्यक्ष उध्दव कानडे, प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. सबनीस म्हणाले, देशातील सध्याचा कालखंड हा जातीय संघर्षाचा आहे. प्रत्येक धर्मात आक्रमक मूलमतत्त्ववाद फोफावत आहे. राज्यकर्ते संविधानाच्या पवित्रतेची लाज गुंडाळून लोकशाहीची विटंबना करत आहेत. सत्य अंग चोरुन उभे आहे. हिंसा ही कोणत्याही धर्माला मान्य नाही. त्यामुळे बंधुतेच्या निकषावर धर्माची चिकित्सा करणे महत्त्वाचे आहे. संवादाशिवाय समता आणि बंधुता शक्य नाही. बंधुतेचा विचार जीवनाला विकसित करणारा आहे. त्याची जोपासना करणे गरजेचे आहे.प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, धर्म-जाती या माणसानेच निर्माण केल्या आहेत. स्वत:चे हितसंबंध जपण्याचा त्यांचा हा चिरेबंदी खेळ असतो. धर्माच्या नावावर समाज दुभंगून टाकला जात आहे. जाती-धर्माच्या तावडीतून सुटल्याशिवाय तुम्हाला माणूस बनता येणार नाही. आपले विचारधन हे माणुसकी जपणारे असावे. त्यासाठी ‘मी माणूस आहे’ एवढे धाडसाने म्हणण्याचा गर्व बाळगा. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती-पातीच्या विध्वंसाची मोहीम राबवून प्रत्येकाला त्याचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला.डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, स्त्रियांना माणूसपणाकडे घेऊन जाणारी विचारधारा उन्नत करण्याचा प्रयत्न आहे. जीवनाच्या दोन गटांमध्ये विभागलेल्या स्त्रियांना विकासाच्या मध्यप्रवाहात आणण्याची जबाबदारी बंधुता संमेलनाने घ्यावी. स्त्रियांना अत्याचारापासून मुक्त करुन भगिनी बंधुतेचा नवीन प्रयोग सुरु करणे गरजेचे आहे.

समारोपापूर्वी एम. डी. पवार पीपल्स बँकेला ‘राजर्षी शाहू सामाजिक न्याय हक्क’ पुरस्कार देण्यात आला. वैभव पवार यांनी तो स्वीकारला. तसेच हडपसरच्या कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेस दिलेला ‘स्वामी विवेकानंद’ पुरस्कार शिवाजीराव पवार यांनी स्वीकारला.

त्यानंतर प्रा. जे. पी. देसाई यांनी ‘स्वामी विवेकानंदांचे बंधुतामय तत्त्वज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, प्रत्येक धर्मवासीयांनी आपल्या धर्माचे आचरण करताना दुसºया धर्मातील जी चांगली तत्त्वे आहेत ती स्वीकारली, तरच जगाचा विकास शक्य आहे. पावित्र्य, शुध्दता आणि दयाशीलता ही तत्त्वे कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी नाही. स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्म जगन्मान्य केला तरी जागतिक व्यासपीठावर त्यांनी सर्वधर्मसमभावाचे तत्त्वज्ञान मांडले. मानवनिर्मित विषमता नष्ट करणे ही समता ठरते.

डॉ. रामचंद्र देखणे यांची प्रकट मुलाखत घतली. वैशाली जौंजाळ यांनी ‘पाझर’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एकनाथ पाटील यांनी आभार मानले. नगरसेवक शहाजी पाटील, अ‍ॅड. एन. आर. पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, शिवाजीराव पवार, प्रा. एल. डी. पाटील, प्रा. सौ. कल्पना मोहिते उपस्थित होत्या.अध्यक्षपदी : सबनीस यांची निवडबंधुता साहित्य परिषद व प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी बंधुता संमेलनात अध्यक्षपदाच्या निवडीवरुन कधीही निवडणूक अथवा वाद होत नाहीत, असे सांगत, पिंपरी-चिंचवड येथे होणाºया २० व्या बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड जाहीर केली.धोंगडेंची दानत...!व्यासपीठावर राष्ट्रीय बंधुता पुरस्कार स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ पुरोगामी लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी आपल्या भाषणावेळीच पुरस्कारातून मिळालेल्या ५ हजार रुपयांच्या रकमेत स्वत:चे ५ हजार रुपये घालून १० हजार रुपयांची देणगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र भारती व प्रकाश रोकडे यांच्याकडे सुपूर्द करुन आपली दानशूरता दाखवून दिली.