शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्यांनी बदलले राजकारण्यांचे रंग

By admin | Updated: December 3, 2015 00:49 IST

जिल्हा बॅँक : सुटकेसाठी सुरू झाली केविलवाणी धडपड, कार्यकारी संचालकांच्या राजीनाम्याने खळबळ

अविनाश कोळी / सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम करणाऱ्या राजकारण्यांचे रंग दोन मोठ्या घोटाळ्यांनी बदलले आहेत. तत्त्व आणि शिष्टाचाराला गाठोड्यात बांधून अनेकांनी घोटाळ्यांचे गाठोडे उघडले आहे. या प्रत्येक प्रकरणातून सुटण्यासाठी काहींनी केलेल्या तडजोडी आता जिल्ह्याच्या वेशीवर टांगल्या गेल्या आहेत. राजकारणाच्या जोडीने अर्थकारण सक्षम होण्याऐवजी, आर्थिक संस्थेत राजकीय अनर्थ घडत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील १५७ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणणारे बॅँकेचे कार्यकारी संचालक शीतल चोथे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ माजली आहे. घोटाळाप्रकरणी साक्ष फिरविण्यासाठी काहींनी दबाव टाकल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा अजूनही सुरू आहे. त्यापूर्वी सव्वाचार कोटीच्या घोटाळा प्रकरणातून सुटण्यासाठी वसंतदादा कारखाना आणि पर्यायाने काही संचालकांशी झालेल्या तडजोडीसुद्धा या चर्चेला बळ देत आहेत. यात अडकलेल्या काही संचालक व अधिकाऱ्यांना पळवाटा शोधताना यश मिळत असले तरी, त्यातून हुकूमशाही प्रवृत्तीचा जन्म होत असल्याचे भानही काहींना राहिलेले नाही. त्यातूनच कायदे आपल्या सोयीनुसार फिरतील, अशी स्वप्नेही रंगविली जात आहेत. राज्य बँकेच्या एका गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६0 मधील कलम ८८ (१) ११ नुसार पाच वर्षांपूर्वीच्या जुन्या प्रकरणातील आक्षेप वगळण्यात आल्याने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १५७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या माजी संचालक व अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याच कलमाच्याआधारे माजी संचालकांनी चौकशीतून वगळण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट बनले आहे. राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणामुळे आजी-माजी संचालक व त्यांच्या वारसदारांची चिंता कमी झाली आहे. दुसरीकडे बँकेतील ४ कोटी १८ लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणातही अनेक आजी-माजी संचालक अडकले आहेत. यातील प्रकरणे नवीन असल्यामुळे राज्य बँकेच्या प्रकरणाचा दाखला देऊन यातून सुटण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे यातील काही प्रकरणे हातासरशी करण्याकरिता काही संचालक मंडळी प्रयत्नशील आहेत. सव्वाचार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या बँक गॅरंटी शुल्काचे प्रकरण मोठे आहे. २ कोटी १६ लाखाचे हे प्रकरण एका झटक्यात मिटले, तर उर्वरित प्रकरणांचा झटका न बसण्याइतकाच आहे. त्यामुळे या मोठ्या प्रकरणातून बाहेर पडण्याचा मार्ग काही संचालकांनी शोधला. वसंतदादा कारखान्याशी यासंदर्भात तडजोडीच्या चर्चा झाल्या आणि जिल्हा बँकेतील राजकीय समीकरणाने रंग बदलला. सत्ताधारी असूनही विरोधी सदस्याच्या कर्ज प्रकरणासाठी आग्रही होण्याचा प्रकार बँकेत घडला. विरोधी आणि सत्ताधारी असे चित्र न दिसता, काही कर्ज प्रकरणात दोन्ही गटाचे संचालक एकत्रित दिसले. राजकीय समीकरणांपेक्षा डोक्यावरील कारवाईची टांगती तलवार हटविण्यासाठी काही संचालकांची धडपड सुरू आहे. वसंतदादा कारखान्याचा तिढा सुटला, तर जवळपास ३२ आजी-माजी संचालक, वारसदार व अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्या दिशेने आता या प्रकरणाची वाटचालही सुरू झाली आहे. कायदेशीर व तडजोडीचे काही मार्ग अस्तित्वात असतानाही अकारण दबावाचे राजकारण चालू झाल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वातावरण गढूळ होत चालले आहे. प्रकरणे निकाली काढण्याकडे कल पूर्वी राज्यातील आघाडी सरकारच्या कालावधित सहकार विभागाने वारंवार अशा चौकशांना स्थगिती दिल्यामुळे तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांना घोटाळा प्रकरणांमध्ये दिलासा मिळत होता. सरकार बदलले असल्याने तसेच चौकशी अधिकारी हस्तक्षेप खपवून घेत नसल्याने, थेट आक्षेपार्ह प्रकरणेच निकाली काढण्यासाठी आता यात अडकलेले काही आजी-माजी संचालक प्रयत्न करीत आहेत.