शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

कुठे थांबायचे हे देशमुखांना कळलं; पण राजकारण्यांना कळणार नाही - जयंत पाटील 

By अविनाश कोळी | Updated: September 14, 2024 18:46 IST

मोहन देशमुख यांच्या आत्मचरित्राचे सांगलीत प्रकाशन

सांगली : बांधकाम व्यवसायात शिखर गाठूनही मोहन देशमुख यांनी कुठे थांबायचे हे ठरविले होते. त्याप्रमाणे ते थांबले. राजकारण्यांना कुठे थांबायचे हे कळत नाही. कारण या क्षेत्रात निवृत्ती नसते, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत व्यक्त केले.सांगलीचे मोहन देशमुख यांच्या ‘कृष्णाकाठावरून सांगली ते मुंबई’ या आत्मचरित्राचे प्रकाशन जयंत पाटील व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते शनिवारी सांगलीच्या रोटरी सभागृहात पार पडले. यावेळी जयश्री देशमुख, सुरेश देशमुख, ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर, अरुण जोशी, पत्रकार अशोक घोरपडे उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले की, भौतिक गोष्टींपासून माणूस दूर जात नसल्यामुळे समृद्ध जीवनाचा त्याला मार्ग सापडत नाही. या गोष्टीचे भान ठेवून देशमुख यांनी आयुष्य समृद्ध केले. बिल्डर असतानाही त्यांनी वाममार्गाने कामे करण्याची मानसिकता कधीही बाळगली नाही. त्यामुळेच राज्य सरकारने त्यांचे बरेच प्रस्ताव मंजूर केले. असा प्रामाणिकपणा सध्या दुर्मीळ आहे.केतकर म्हणाले की, माणसांची आर्थिक, भौतिक समृद्धी वाढत असताना सामाजिक समृद्धी घटत चालली आहे. चाळींची जागा सोसायट्यांनी घेतल्यानंतर माणसांमधला दुरावा वाढत गेला. देशमुख यांनी आयुष्याची समृद्धी कशात आहे, हे ओळखले. त्यामुळे त्यांचे पुस्तक केवळ सांगलीचा कृष्णाकाठ किंवा मुंबईची कहाणी नाही, तर जीवनविषयक दृष्टिकोन स्पष्ट करणारा ऐवज आहे.

काँग्रेसची गादी घेऊन मुंबईलामोहन देशमुख यांनी सांगितले की, पदवीधर झालो त्यावेळी सांगलीत काँग्रेसचे अधिवेशन आयोजित केले होते. त्यासाठी हजारो गाद्या आणल्या हाेत्या. काही कारणांनी तो कार्यक्रम रद्द झाला आणि वसंतदादा कारखान्याच्या सभासदांना त्या गाद्यांचे वाटप झाले. माझे वडील सभासद असल्याने ती गादी मिळाली. काँग्रेसची ही गादी व ७५ रुपये घेऊन मी मुंबईत आलो आणि बांधकाम क्षेत्रात यश मिळविले. त्यांच्या या वाक्यावर हशा पिकला.

नंदू नाटेकरांच्या नावे अकॅडमी हवीजागतिक स्तरावर बॅडमिंटनच्या माध्यमातून देशाचे नाव उंचावणारे नंदू नाटेकर सांगलीचे आहेत. मात्र, त्यांच्या नावे सांगलीत एखादी अकॅडमीही उभारली गेली नाही. भविष्यात तरी त्यांच्या नावे अकॅडमी उभी करावी, अशी सूचना केतकर यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटील