शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कुठे थांबायचे हे देशमुखांना कळलं; पण राजकारण्यांना कळणार नाही - जयंत पाटील 

By अविनाश कोळी | Updated: September 14, 2024 18:46 IST

मोहन देशमुख यांच्या आत्मचरित्राचे सांगलीत प्रकाशन

सांगली : बांधकाम व्यवसायात शिखर गाठूनही मोहन देशमुख यांनी कुठे थांबायचे हे ठरविले होते. त्याप्रमाणे ते थांबले. राजकारण्यांना कुठे थांबायचे हे कळत नाही. कारण या क्षेत्रात निवृत्ती नसते, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत व्यक्त केले.सांगलीचे मोहन देशमुख यांच्या ‘कृष्णाकाठावरून सांगली ते मुंबई’ या आत्मचरित्राचे प्रकाशन जयंत पाटील व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते शनिवारी सांगलीच्या रोटरी सभागृहात पार पडले. यावेळी जयश्री देशमुख, सुरेश देशमुख, ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर, अरुण जोशी, पत्रकार अशोक घोरपडे उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले की, भौतिक गोष्टींपासून माणूस दूर जात नसल्यामुळे समृद्ध जीवनाचा त्याला मार्ग सापडत नाही. या गोष्टीचे भान ठेवून देशमुख यांनी आयुष्य समृद्ध केले. बिल्डर असतानाही त्यांनी वाममार्गाने कामे करण्याची मानसिकता कधीही बाळगली नाही. त्यामुळेच राज्य सरकारने त्यांचे बरेच प्रस्ताव मंजूर केले. असा प्रामाणिकपणा सध्या दुर्मीळ आहे.केतकर म्हणाले की, माणसांची आर्थिक, भौतिक समृद्धी वाढत असताना सामाजिक समृद्धी घटत चालली आहे. चाळींची जागा सोसायट्यांनी घेतल्यानंतर माणसांमधला दुरावा वाढत गेला. देशमुख यांनी आयुष्याची समृद्धी कशात आहे, हे ओळखले. त्यामुळे त्यांचे पुस्तक केवळ सांगलीचा कृष्णाकाठ किंवा मुंबईची कहाणी नाही, तर जीवनविषयक दृष्टिकोन स्पष्ट करणारा ऐवज आहे.

काँग्रेसची गादी घेऊन मुंबईलामोहन देशमुख यांनी सांगितले की, पदवीधर झालो त्यावेळी सांगलीत काँग्रेसचे अधिवेशन आयोजित केले होते. त्यासाठी हजारो गाद्या आणल्या हाेत्या. काही कारणांनी तो कार्यक्रम रद्द झाला आणि वसंतदादा कारखान्याच्या सभासदांना त्या गाद्यांचे वाटप झाले. माझे वडील सभासद असल्याने ती गादी मिळाली. काँग्रेसची ही गादी व ७५ रुपये घेऊन मी मुंबईत आलो आणि बांधकाम क्षेत्रात यश मिळविले. त्यांच्या या वाक्यावर हशा पिकला.

नंदू नाटेकरांच्या नावे अकॅडमी हवीजागतिक स्तरावर बॅडमिंटनच्या माध्यमातून देशाचे नाव उंचावणारे नंदू नाटेकर सांगलीचे आहेत. मात्र, त्यांच्या नावे सांगलीत एखादी अकॅडमीही उभारली गेली नाही. भविष्यात तरी त्यांच्या नावे अकॅडमी उभी करावी, अशी सूचना केतकर यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटील