शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कुठे थांबायचे हे देशमुखांना कळलं; पण राजकारण्यांना कळणार नाही - जयंत पाटील 

By अविनाश कोळी | Updated: September 14, 2024 18:46 IST

मोहन देशमुख यांच्या आत्मचरित्राचे सांगलीत प्रकाशन

सांगली : बांधकाम व्यवसायात शिखर गाठूनही मोहन देशमुख यांनी कुठे थांबायचे हे ठरविले होते. त्याप्रमाणे ते थांबले. राजकारण्यांना कुठे थांबायचे हे कळत नाही. कारण या क्षेत्रात निवृत्ती नसते, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत व्यक्त केले.सांगलीचे मोहन देशमुख यांच्या ‘कृष्णाकाठावरून सांगली ते मुंबई’ या आत्मचरित्राचे प्रकाशन जयंत पाटील व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते शनिवारी सांगलीच्या रोटरी सभागृहात पार पडले. यावेळी जयश्री देशमुख, सुरेश देशमुख, ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर, अरुण जोशी, पत्रकार अशोक घोरपडे उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले की, भौतिक गोष्टींपासून माणूस दूर जात नसल्यामुळे समृद्ध जीवनाचा त्याला मार्ग सापडत नाही. या गोष्टीचे भान ठेवून देशमुख यांनी आयुष्य समृद्ध केले. बिल्डर असतानाही त्यांनी वाममार्गाने कामे करण्याची मानसिकता कधीही बाळगली नाही. त्यामुळेच राज्य सरकारने त्यांचे बरेच प्रस्ताव मंजूर केले. असा प्रामाणिकपणा सध्या दुर्मीळ आहे.केतकर म्हणाले की, माणसांची आर्थिक, भौतिक समृद्धी वाढत असताना सामाजिक समृद्धी घटत चालली आहे. चाळींची जागा सोसायट्यांनी घेतल्यानंतर माणसांमधला दुरावा वाढत गेला. देशमुख यांनी आयुष्याची समृद्धी कशात आहे, हे ओळखले. त्यामुळे त्यांचे पुस्तक केवळ सांगलीचा कृष्णाकाठ किंवा मुंबईची कहाणी नाही, तर जीवनविषयक दृष्टिकोन स्पष्ट करणारा ऐवज आहे.

काँग्रेसची गादी घेऊन मुंबईलामोहन देशमुख यांनी सांगितले की, पदवीधर झालो त्यावेळी सांगलीत काँग्रेसचे अधिवेशन आयोजित केले होते. त्यासाठी हजारो गाद्या आणल्या हाेत्या. काही कारणांनी तो कार्यक्रम रद्द झाला आणि वसंतदादा कारखान्याच्या सभासदांना त्या गाद्यांचे वाटप झाले. माझे वडील सभासद असल्याने ती गादी मिळाली. काँग्रेसची ही गादी व ७५ रुपये घेऊन मी मुंबईत आलो आणि बांधकाम क्षेत्रात यश मिळविले. त्यांच्या या वाक्यावर हशा पिकला.

नंदू नाटेकरांच्या नावे अकॅडमी हवीजागतिक स्तरावर बॅडमिंटनच्या माध्यमातून देशाचे नाव उंचावणारे नंदू नाटेकर सांगलीचे आहेत. मात्र, त्यांच्या नावे सांगलीत एखादी अकॅडमीही उभारली गेली नाही. भविष्यात तरी त्यांच्या नावे अकॅडमी उभी करावी, अशी सूचना केतकर यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटील