शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

जयंतरावांच्या वारसदारांची राजकीय पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 01:08 IST

अशोक पाटील । इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक व राजवर्धन यांनी वडिलांच्या ...

ठळक मुद्देयुवकांना नोकरी देऊन चर्चेत राहण्याचा अनोखा फंडानोकरी मेळावा : युवकांना नोकरी देऊन चर्चेत राहण्याचा अनोखा फंडानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात संपर्क दौऱ्यावर भर

अशोक पाटील ।इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक व राजवर्धन यांनी वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्यदिव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. हे आयोजन म्हणजे चर्चेत राहण्याचा अनोखा फंडाच आहे. परंतु जयंत पाटील यांचा राजकीय वारसदार कोण होणार? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.

वाळवा—शिराळा तालुक्यात राजकीय नेत्यांच्या वारसदारांची रेलचेल सुरु आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून सागर खोत यांची निवड केली आहे. त्यांनी रयत अ‍ॅग्रोच्या माध्यमातून आपला संपर्क मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रभर ठेवला आहे. सद्यस्थितीला आमदार जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून सदाभाऊ खोत यांच्याकडेच पाहिले जात आहे.

मंत्री सदाभाऊ खोत यांनी गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात भाजपचे वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून त्यांनी भव्य प्रमाणात राज्यपातळीवरील कबड्डी स्पर्धा भरवून युवकांना आकर्षित केले. यानंतर लगेचच कृषी प्रदर्शन भरवून शेतकºयांमध्ये आपली प्रतिमा उजळवून घेतली.मंत्री खोत यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीही सरसावली आहे. आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य अशा नोकरी मेळाव्याचे शनिवार दि. ९ रोजी आयोजन करण्यात आले आहे. तसेच आष्ट्यात होणारे कृषी प्रदर्शन इस्लामपुरात घेण्याचेही नियोजन सुरु आहे.

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आमदार जयंत पाटील यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक व राजवर्धन या दोघांवर सोपविले आहे. ही वाटचाल म्हणजे आगामी विधानसभेची रंगीत तालीम आहे. जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद असल्याने त्यांना राज्यभर फिरावे लागणार आहे. त्यामुळे मतदारसंघात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी खात्रीचे कोणी तरी असणे गरजेचे असल्यानेच, आ. पाटील यांनी दोन्ही मुलांवर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

गत दोन वर्षांपासून दोन्ही मुलांनी या ना त्या कारणाने आपला मतदारसंघात संपर्क ठेवला आहे. नोकरी मेळाव्यातून युवकांना आकर्षित करण्याचा नवीन फंडा राष्ट्रवादीने काढला आहे. याला राजकीय यश किती मिळते, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे.राजवर्धनच राजकीय वारसदार..!राजारामबापू पाटील यांच्या अकाली निधनानंतर परदेशात शिक्षणासाठी गेलेले धाकटे चिरंजीव जयंत पाटील यांना राजकारणात यावे लागले. जयंतरावांचे सर्वच राजकीय गुण धाकटे चिरंजीव राजवर्धन यांच्यात दिसून येतात. त्यामुळे आगामी राजकारणात जयंतरावांचे राजकीय वारसदार म्हणून राजवर्धन यांचे नाव पुढे आल्यास वावगे ठरणार नाही.

जयंत नक्षत्र, जयंत पॅकेज, जयंत नीती आणि विरोधकांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम या उपमा राजकीय पटलावर गाजलेल्या आहेत. आता सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी ‘जयंत नोकरी मेळावा’ हा नवीन फंडा राजकीय बाजारात आला आहे. यापूर्वी शिराळा येथे महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांनीही नोकरी मेळावा भरवून शक्तिप्रदर्शन केले होते.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटील