शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

पोलीसाच्या पत्नीची दोन चिमुरड्यासह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 14:56 IST

Crimenews Sangli : राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीसाच्या पत्नीने तिच्या दोन लहान मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास लेंगरे (ता.खानापूर, जि. सांगली) येथे घडली.  उजिता जोतीराम शिंदे (वय ३०), कु. रिया जोतीराम शिंदे (वय ६) व चि. केदारनाथ जोतीराम शिंदे (वय १, सर्व रा. लेंगरे, पाटीलवस्ती) अशी जीवनयात्रा संपविलेल्या माय-लेकरांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी या घटनेला कौटुंबिक वादाची झालर असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती.

ठळक मुद्देपोलीसाच्या पत्नीची दोन चिमुरड्यासह आत्महत्यालेंगरे येथील घटना : विहीरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्रा

विटा (सांगली) : राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीसाच्या पत्नीने तिच्या दोन लहान मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास लेंगरे (ता.खानापूर, जि. सांगली) येथे घडली.  उजिता जोतीराम शिंदे (वय ३०), कु. रिया जोतीराम शिंदे (वय ६) व चि. केदारनाथ जोतीराम शिंदे (वय १, सर्व रा. लेंगरे, पाटीलवस्ती) अशी जीवनयात्रा संपविलेल्या माय-लेकरांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी या घटनेला कौटुंबिक वादाची झालर असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती.लेंगरे येथील जोतीराम शिंदे हे अमरावती येथे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंब लेंगरे येथील भूड रस्त्यावरील पाटीलवस्ती येथे वास्तव्यास आहे. शिंदे यांचा गेल्या सात ते आठ वर्षापूर्वी कलेढोण येथील उजिता यांच्याशी विवाह झाला होता. गेल्या वर्षभरापासून विवाहिता या प्रसुतीसाठी माहेरी कलढोण येथे गेल्या होत्या.गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्या सहा वर्षाची मुलगी रिया, एक वर्षाचा मुलगा केदारनाथ यांच्यासह सासरी लेंगरे येथे राहण्यास आल्या होत्या. त्यांचे पती जोतीराम हे सुध्दा दि. १ मे रोजी सुट्टी घेऊन गावी लेंगरे येथे आले होते. त्यामुळे घरी विवाहिता उजिता, मुलगी रिया, मुलगा केदारनाथ, पती व सासू-सासरे असे वास्तव्यास होते.

शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक विवाहिता उजिता या दोन लहान मुलांना घेऊन घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी लेंगरे येथील पाटीलवस्तीवरील दुर्योधन शिंदे यांच्या मालकीच्या शेतातील विहीरीत मुलगी रिया, चिमुरडा केदारनाथ या दोघांसह स्वत: विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ आली नसल्याने पतीसह तेथील स्थानिक लोकांनी विहीरीत शोध घेतला असता उजिता यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.

रात्री काळोख असल्याने रिया व केदारनाथ या चिमुरड्यांच्या शोधकार्यात अडथळा आला. त्यामुळे शनिवारी सकाळी आठ वाजता विटा पोलीसांच्या मदतीने दोन मुलांचे मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक अकुंश इंगळे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, बीट हवालदार अमोल पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची वर्दी पोलीस पाटील पुष्पा बोबडे यांनी विटा पोलीसांत दिली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आपल्या दोन चिमुरड्या मुलांसह विवाहिता उजिता शिंदे यांनी केलेल्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, या घटनेला कौटुंबिक वादाची झालर असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती. विटा ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर या माय-लेकांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस निरीक्षक संतोष डोके पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीPoliceपोलिस