कवितेला आयुष्यातून वजा करणे अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:22 IST2021-03-07T04:22:53+5:302021-03-07T04:22:53+5:30
येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे काव्यवाचन करताना डॉ. राहुल गौर, सूूर्यकांत शिंदे, ज्ञानेश्वरी पाटील. लोकमत न्यूज नेटवर्क कामेरी : ...

कवितेला आयुष्यातून वजा करणे अशक्य
येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे काव्यवाचन करताना डॉ. राहुल गौर, सूूर्यकांत शिंदे, ज्ञानेश्वरी पाटील.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : संगीत आयुष्याचा सुखात आणि दु:खात नेहमी सोबत करते. संगीताशिवाय आयुष्य व्यर्थ आहे. कवितेला आयुष्यातून वजा करून आयुष्य बनूच शकत नाही, कविता हे जगण्याचे गाणे बनवले पाहिजे, असे मत डॉ. राहुल गौर यांनी व्यक्त केले.
येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या ३२ व्या स्मृती व्याख्यानमालेत पाचव्या समारोपाच्या व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘कविता व काव्यावर शतदा प्रेम करावे’ या काव्य वाचन कार्यक्रमात कवींनी आपल्या रचना सादर केल्या. कवी ईलाही जमादार यांच्या कवितांना देखील कवींनी उजाळा देऊन त्यांना एक अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी कवी रवी बावडेकर, डॉ. राहुल गौर, ज्ञानेश्वरी पाटील, धर्मवीर पाटील, सूर्यकांत शिंदे यांनी आपल्या सुमधुर आवाजाने काव्यमैफील रंगतदार बनवली. अध्यक्षस्थानी राजारामबापू बँकेचे संचालक संभाजीराव पाटील होते.
संभाजीराव पाटील म्हणाले, एका बाजूला लोक पुस्तक वाचनापासून दूर जात असताना जय किसानने ३२ वर्षे ही व्याख्यानमाला चालवली हे कौतुकास्पद आहे. ऑनलाइन माध्यमातून देखील व्याख्यानमाला चालवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली, उद्या आपल्या भागातील एक वैचारिक व्यासपीठ म्हणून जय किसानची ओळख होईल. यावेळी कादंबरीकार दि. बा. पाटील, शंकरराव चव्हाण, जि. प. सदस्या राजश्री एटम, मंडळाचे संस्थापक पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, प्रा. दीपक स्वामी उपस्थित होते. कालिदास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक यांनी केले. प्रा. स्वप्निल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संयोजक शंकर पाटील यांनी आभार मानले.