शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अपक्षामुळे बिघडले ‘स्थायी’चे गणित, सांगली महापालिकेत भाजपची खेळी यशस्वी : सम-समान संख्याबळाला दिला शह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 23:49 IST

महापालिकेत भाजपने सत्ता मिळविली असली तरी, स्थायी समितीत मात्र बहुमताचा गुंता वाढला होता. पण अपक्ष नगरसेवक गजानन मगदूम यांना भाजपच्या गोटात खेचून संख्याबळाचा तिढा सोडविण्यात भाजपला

शीतल पाटील ।सांगली : महापालिकेत भाजपने सत्ता मिळविली असली तरी, स्थायी समितीत मात्र बहुमताचा गुंता वाढला होता. पण अपक्ष नगरसेवक गजानन मगदूम यांना भाजपच्या गोटात खेचून संख्याबळाचा तिढा सोडविण्यात भाजपला यश आले आहे. अन्यथा स्थायी समितीत भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे समान संख्याबळ झाले असते. प्रसंगी सभापती पदाचा निर्णय चिठ्ठीवर झाला असता. पण हा बाका प्रसंग टाळण्यात भाजपची नेतेमंडळी यशस्वी ठरली.

महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आली असून त्यांचे ४१ नगरसेवक आहेत. विरोधी काँग्रेसचे २०, तर राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. दोन्ही काँग्रेसने या निवडणुकीत आघाडी केली होती. स्वाभिमानी आघाडीच्या चिन्हावर विजय घाडगे विजयी झाले, तर प्रभाग दोनमधून काँग्रेसचे बंडखोर गजानन मगदूम निवडून आले. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपच्या पहिल्या महापौर व उपमहापौरांचीही निवड झाली. संख्याबळात भाजप वरचढ ठरले असले तरी, स्थायी समितीत बहुमताचा आकडा गाठण्याची कसरत भाजपला करावी लागणार होती.

स्थायी समितीची सदस्यसंख्या १६ इतकी आहे. भाजपकडे ४१ नगरसेवक असल्याने त्यांचे आठ सदस्य स्थायी समितीत जाणार आहेत, तर काँग्रेसचे ४ व राष्ट्रवादीचे तीन सदस्य स्थायी समितीत असतील. एका सदस्यासाठी भाजप व दोन्ही काँग्रेसमध्ये रस्सीखेच निर्माण झाली असती. पण भाजपने गजानन मगदूम यांना सहयोगी सदस्य केल्याने त्यांचे संख्याबळ ४२ वर पोहोचले.

परिणामी ही एक जागा भाजपच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे आता भाजपचे ९ सदस्य स्थायी समितीत असतील, तर दोन्ही काँग्रेसचे मिळून ७ सदस्य असतील. मगदूम व विजय घाडगे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला असता, तर काँग्रेसची संख्या चारवरून पाचवर गेली असती. राष्ट्रवादीचे तीन सदस्य होते. त्यामुळे दोन्ही काँग्रेसचे मिळून आठ सदस्य झाले असते. अशावेळी भाजप व दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांची संख्या सम-समान झाली असती. परिणामी स्थायी समिती सभापती निवडीत पुन्हा घोडेबाजार रंगला असता. पण हा तिढा सोडविण्यात भाजप यशस्वी ठरली. कोणताही गाजावाजा न करता ऐनवेळी मगदूम यांना भाजपच्या गोटात आणण्यात आले. त्यांच्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनीही फिल्ंिडग लावली होती. पण त्यांना यश आले नाही.नेमके काय झाले...काँग्रेसकडे २० नगरसेवक आहेत. त्यांना विजय घाडगे व गजानन मगदूम या दोन सदस्यांनी पाठिंबा दिला असता, तर त्यांचे संख्याबळ २२ वर गेले असते. परिणामी काँग्रेसचा कोटा ४.५१ इतका झाला असता. त्यामुळे काँग्रेसची एक जागा वाढून त्यांचे पाच सदस्य स्थायी समितीत आले असते. पण भाजपने वेळीच सावधगिरी बाळगत मगदूम यांना आपल्याकडे खेचल्याने काँग्रेसचे गणित बिघडले.संख्याबळ : कोणाचे, कसे...स्थायी समितीची सदस्यसंख्या १६ आहे. प्रत्येक पक्षाच्या संख्येनुसार सदस्यांचा कोटा निश्चित केला जातो. एका सदस्यासाठी ४.८७५ इतका मतांचा कोटा आहे. भाजपचे ४१ नगरसेवक आहेत. त्यानुसार भाजपच्या वाट्याला ८.४१ इतका कोटा येतो. म्हणजेच त्यांचे आठ नगरसेवक स्थायी समितीचे सदस्य बनू शकतात. काँग्रेसकडे २० नगरसेवक आहेत. त्यांचा कोटा ४.१०, तर राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक असून त्यांचा कोटा ३.०७ इतका होतो. म्हणजे काँग्रेसचे चार व राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक स्थायीचे सदस्य बनू शकतात. अशावेळी एका जागेचा प्रश्न कायम राहतो. अपक्ष नगरसेवकाने भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ ४२ वर पोहोचले. म्हणजे त्यांचा कोटा ८.६१ वर पोहोचला. त्यामुळे ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. परिणामी भाजपचे नऊ सदस्य स्थायी समितीत असतील.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपा