शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

राज्यात गुंडगिरी, पैशाचे राजकारणामुळे जनतेचा अपेक्षाभंग - जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 14:01 IST

शिरटे : सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड बहुमत असताना त्यांना राज्यातील जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. सध्या राज्यात गुंडगिरी आणि पैशाचे ...

शिरटे : सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड बहुमत असताना त्यांना राज्यातील जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. सध्या राज्यात गुंडगिरी आणि पैशाचे राजकारण सुरू आहे. राज्यातील जनतेत सरकारबद्दल प्रचंड नाराजी आणि असंतोष आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले.बहे (ता. वाळवा) येथे विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजनानिमित्त आयाेजित समारंभात ते बोलत होते. ‘राजारामबापू’चे माजी संचालक माणिकराव पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, नेर्लेचे सरपंच संजय पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने, सरपंच संतोष दमामे, उपसरपंच हनमंत पाटील, संचालक विठ्ठलराव पाटील, ‘कृष्णा’चे माजी संचालक अजित थोरात, बी.जी. पाटील, प्रा. शशिकांत पाटील, ॲड. कृष्णराव पाटील उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, राज्यातील जनतेत सरकारबद्दल प्रचंड नाराजी आणि असंतोष आहे. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये जे काही चालले आहे, ते सर्व जनतेला कळत आहे. लोकांना हे पसंत नाही. याचे उत्तर जनता मतपेटीतूनच देईन.सरपंच संतोष दमामे यांनी स्वागत केले. याप्रसंगी बी.डी. पवार, बाळासाहेब पाटील, संदीप नरके, राहुल माने, संग्राम जाधव, देवराज देशमुख, संभाजी दमामे, अविनाश खरात, पोपट जगताप आदी उपस्थित होते. प्रकाश रसाळ, जयवंत काळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शशिकांत पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटील