शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

शहरामध्ये संपेनात डास आणि म्हणे तासगावचा झाला विकास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:15 IST

कोट्यवधीच्या विकासाच्या उड्डाणांनी तासगावकरांऐवजी कारभाऱ्यांचाच विकास झाल्याची चर्चा

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांत कोट्यवधीचा विकास केला. याचा गाजावाजा सुरू आहे; मात्र कोट्यवधीच्या विकासाच्या उड्डाणांनी तासगावकरांऐवजी कारभाऱ्यांचाच विकास झाल्याची चर्चा आहे. सामान्यांना अभिप्रेत विकासकामांऐवजी कारभाऱ्यांच्या सोयीनुसार खर्ची पडलेला निधी कुचकामी ठरला आहे. डासांच्या बाबतीत नेहमीच ‘हाय रिस्क’मध्ये असलेल्या ‘शहरात संपेनात डास; म्हणे तासगावचा विकास’ अशीच निराशाजनक प्रतिक्रिया उमटत आहे.

खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तासगावकरांनी पाच वर्षांपूर्वी भाजपच्या हातात तासगाव नगरपालिकेची सत्ता दिली. खासदारांनी वजन वापरून कोट्यवधीचा निधी शहराच्या विकासासाठी आणला. पाच वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च झाले; मात्र यातून सामान्य जनतेला होणारा त्रास कितपत कमी झाला, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. गटार फोडून रस्ता, रस्ता फोडून गटार, दगडी फरशी काढून पेव्हिंग ब्लॉक, पेव्हिंग ब्लॉक काढून काँक्रिटीकरण, असा विळा मोडून खुरपे करण्यासारखा विकास गेल्या पाच वर्षांत करण्यात आला.

काम कोणतेही होऊ दे, आमचं चांगभलं झालं पाहिजे, असाच एकूण विकासाचा रागरंग राहिला. स्वच्छतेच्या बेकायदेशीर ठेक्यापासून, लादलेल्या भुयारी गटारीच्या योजनेपर्यंत अनेक कामांवर कोट्यवधी रुपये खर्ची पडले. काम मंजूर करण्याआधीपासूनच स्वहित किती साधले जाईल, याकडे जादा लक्ष असायचे. स्वत:च्या प्रभागात काम होणार असेल तर मर्जीतील ठेकेदारालाच काम मिळावे, यासाठी अनेक आकांडतांडव केले; मात्र कामाच्या दर्जाबाबत नेहमीच मौन धरले.

कोट्यवधींचा दिखावा करण्याऐवजी केवळ डासमुक्त तासगाव शहर केले असते तरीदेखील दिलासा मिळाला असता. शहर अनेक वर्षांपासून सातत्याने डासांच्या घनतेत ‘हाय रिस्क’मध्ये आहे. अगदी जानेवारीत झालेल्या सर्वेक्षणातदेखील डासांच्या घनतेचा गृहनिर्देशांक ११.५३ आहे. दहा टक्क्यांच्या खाली शहरातील डासांची घनता कधीच आली नाही. परिणामी खासगी रुग्णालये नेहमीच गर्दीने भरलेले असतात. डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप, मलेरिया अशा साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच पाच वर्षांच्या कारभाराचे मूल्यांकन या डासयुक्त तासगाववरूनच दिसून येत आहे.

शाळा, नाट्यगृह कौतुकास्पद

पाच वर्षांच्या नगरपालिकेच्या शाळांनी कात टाकली आहे. खासगी शाळांच्या तोडीस तोड उपक्रम आणि गुणवत्ता यामुळे शाळांचा नावलौकिक झाला आहे. नगरपालिकेने शाळांबाबत घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. नाट्यगृह नूतनीकरणासारखे काही निर्णय शहराचे हित साधणारे असल्याची भावनाही व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sangliसांगली