शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

शहरामध्ये संपेनात डास आणि म्हणे तासगावचा झाला विकास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:15 IST

कोट्यवधीच्या विकासाच्या उड्डाणांनी तासगावकरांऐवजी कारभाऱ्यांचाच विकास झाल्याची चर्चा

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांत कोट्यवधीचा विकास केला. याचा गाजावाजा सुरू आहे; मात्र कोट्यवधीच्या विकासाच्या उड्डाणांनी तासगावकरांऐवजी कारभाऱ्यांचाच विकास झाल्याची चर्चा आहे. सामान्यांना अभिप्रेत विकासकामांऐवजी कारभाऱ्यांच्या सोयीनुसार खर्ची पडलेला निधी कुचकामी ठरला आहे. डासांच्या बाबतीत नेहमीच ‘हाय रिस्क’मध्ये असलेल्या ‘शहरात संपेनात डास; म्हणे तासगावचा विकास’ अशीच निराशाजनक प्रतिक्रिया उमटत आहे.

खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तासगावकरांनी पाच वर्षांपूर्वी भाजपच्या हातात तासगाव नगरपालिकेची सत्ता दिली. खासदारांनी वजन वापरून कोट्यवधीचा निधी शहराच्या विकासासाठी आणला. पाच वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च झाले; मात्र यातून सामान्य जनतेला होणारा त्रास कितपत कमी झाला, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. गटार फोडून रस्ता, रस्ता फोडून गटार, दगडी फरशी काढून पेव्हिंग ब्लॉक, पेव्हिंग ब्लॉक काढून काँक्रिटीकरण, असा विळा मोडून खुरपे करण्यासारखा विकास गेल्या पाच वर्षांत करण्यात आला.

काम कोणतेही होऊ दे, आमचं चांगभलं झालं पाहिजे, असाच एकूण विकासाचा रागरंग राहिला. स्वच्छतेच्या बेकायदेशीर ठेक्यापासून, लादलेल्या भुयारी गटारीच्या योजनेपर्यंत अनेक कामांवर कोट्यवधी रुपये खर्ची पडले. काम मंजूर करण्याआधीपासूनच स्वहित किती साधले जाईल, याकडे जादा लक्ष असायचे. स्वत:च्या प्रभागात काम होणार असेल तर मर्जीतील ठेकेदारालाच काम मिळावे, यासाठी अनेक आकांडतांडव केले; मात्र कामाच्या दर्जाबाबत नेहमीच मौन धरले.

कोट्यवधींचा दिखावा करण्याऐवजी केवळ डासमुक्त तासगाव शहर केले असते तरीदेखील दिलासा मिळाला असता. शहर अनेक वर्षांपासून सातत्याने डासांच्या घनतेत ‘हाय रिस्क’मध्ये आहे. अगदी जानेवारीत झालेल्या सर्वेक्षणातदेखील डासांच्या घनतेचा गृहनिर्देशांक ११.५३ आहे. दहा टक्क्यांच्या खाली शहरातील डासांची घनता कधीच आली नाही. परिणामी खासगी रुग्णालये नेहमीच गर्दीने भरलेले असतात. डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप, मलेरिया अशा साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच पाच वर्षांच्या कारभाराचे मूल्यांकन या डासयुक्त तासगाववरूनच दिसून येत आहे.

शाळा, नाट्यगृह कौतुकास्पद

पाच वर्षांच्या नगरपालिकेच्या शाळांनी कात टाकली आहे. खासगी शाळांच्या तोडीस तोड उपक्रम आणि गुणवत्ता यामुळे शाळांचा नावलौकिक झाला आहे. नगरपालिकेने शाळांबाबत घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. नाट्यगृह नूतनीकरणासारखे काही निर्णय शहराचे हित साधणारे असल्याची भावनाही व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sangliसांगली