शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

शहरामध्ये संपेनात डास आणि म्हणे तासगावचा झाला विकास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:15 IST

कोट्यवधीच्या विकासाच्या उड्डाणांनी तासगावकरांऐवजी कारभाऱ्यांचाच विकास झाल्याची चर्चा

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांत कोट्यवधीचा विकास केला. याचा गाजावाजा सुरू आहे; मात्र कोट्यवधीच्या विकासाच्या उड्डाणांनी तासगावकरांऐवजी कारभाऱ्यांचाच विकास झाल्याची चर्चा आहे. सामान्यांना अभिप्रेत विकासकामांऐवजी कारभाऱ्यांच्या सोयीनुसार खर्ची पडलेला निधी कुचकामी ठरला आहे. डासांच्या बाबतीत नेहमीच ‘हाय रिस्क’मध्ये असलेल्या ‘शहरात संपेनात डास; म्हणे तासगावचा विकास’ अशीच निराशाजनक प्रतिक्रिया उमटत आहे.

खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तासगावकरांनी पाच वर्षांपूर्वी भाजपच्या हातात तासगाव नगरपालिकेची सत्ता दिली. खासदारांनी वजन वापरून कोट्यवधीचा निधी शहराच्या विकासासाठी आणला. पाच वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च झाले; मात्र यातून सामान्य जनतेला होणारा त्रास कितपत कमी झाला, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. गटार फोडून रस्ता, रस्ता फोडून गटार, दगडी फरशी काढून पेव्हिंग ब्लॉक, पेव्हिंग ब्लॉक काढून काँक्रिटीकरण, असा विळा मोडून खुरपे करण्यासारखा विकास गेल्या पाच वर्षांत करण्यात आला.

काम कोणतेही होऊ दे, आमचं चांगभलं झालं पाहिजे, असाच एकूण विकासाचा रागरंग राहिला. स्वच्छतेच्या बेकायदेशीर ठेक्यापासून, लादलेल्या भुयारी गटारीच्या योजनेपर्यंत अनेक कामांवर कोट्यवधी रुपये खर्ची पडले. काम मंजूर करण्याआधीपासूनच स्वहित किती साधले जाईल, याकडे जादा लक्ष असायचे. स्वत:च्या प्रभागात काम होणार असेल तर मर्जीतील ठेकेदारालाच काम मिळावे, यासाठी अनेक आकांडतांडव केले; मात्र कामाच्या दर्जाबाबत नेहमीच मौन धरले.

कोट्यवधींचा दिखावा करण्याऐवजी केवळ डासमुक्त तासगाव शहर केले असते तरीदेखील दिलासा मिळाला असता. शहर अनेक वर्षांपासून सातत्याने डासांच्या घनतेत ‘हाय रिस्क’मध्ये आहे. अगदी जानेवारीत झालेल्या सर्वेक्षणातदेखील डासांच्या घनतेचा गृहनिर्देशांक ११.५३ आहे. दहा टक्क्यांच्या खाली शहरातील डासांची घनता कधीच आली नाही. परिणामी खासगी रुग्णालये नेहमीच गर्दीने भरलेले असतात. डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप, मलेरिया अशा साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच पाच वर्षांच्या कारभाराचे मूल्यांकन या डासयुक्त तासगाववरूनच दिसून येत आहे.

शाळा, नाट्यगृह कौतुकास्पद

पाच वर्षांच्या नगरपालिकेच्या शाळांनी कात टाकली आहे. खासगी शाळांच्या तोडीस तोड उपक्रम आणि गुणवत्ता यामुळे शाळांचा नावलौकिक झाला आहे. नगरपालिकेने शाळांबाबत घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. नाट्यगृह नूतनीकरणासारखे काही निर्णय शहराचे हित साधणारे असल्याची भावनाही व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sangliसांगली