शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

४०० चा दुसरा हप्ता द्या, मगच कारखाने सुरू करा; राजू शेट्टींच्या आक्रोश पदयात्रेला पुन्हा सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 12:57 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत पदयात्रा ३० ऑक्टोबर रोजी स्थगित केली होती

इस्लामपूर : साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामात चांगला पैसा मिळवला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन घेण्यासाठीचा भांडवली खर्च वाढल्याने शेतकरी आतबट्ट्यात येत आहे. त्यामुळे कारखान्यांनी चालू गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ४०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी माजी खा. राजू शेट्टी यांनी केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस दराच्या आंदोलनाचा भाग म्हणून शेट्टी यांनी १७ ऑक्टोबरपासून आक्रोश पदयात्रेला सुरुवात केली होती. १३ दिवसांत ३०० कि. मी. अंतराचा टप्पा पायी चालत गाठला होता. मात्र मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून सगळीकडे अस्वस्थता पसरली होती. त्यामुळे शेट्टी यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत आपली पदयात्रा ३० ऑक्टोबर रोजी स्थगित केली होती.मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांचे उपोषण गुरुवारी स्थगित केल्यानंतर माजी खा. शेट्टी यांनी तातडीने निर्णय घेत साखराळे येथील राजारामबापू कारखाना प्रशासनाला निवेदन देऊन आपल्या आक्रोश पदयात्रेला सुरुवात केली.यावेळी शेट्टी यांनी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांना निवेदन देऊन ४०० रुपयांचा हप्ता दिल्याशिवाय कारखाना सुरू करू नका, अशी विनंती केली. यावेळी त्यांनी राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शेट्टी म्हणाले, साखर कारखानदारांनी गाळप क्षमता वाढवताना या खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवर टाकला आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून प्रकल्प उभे केले जात आहेत. या प्रकल्पाच्या कर्जाचा बोजा कारखान्यांनी शेतकऱ्यांना ज्यादा आलेल्या उत्पन्नातील हिश्श्यावर टाकला आहे. त्यामुळे कोणतेही कारण न सांगता कारखान्यांनी ४०० चा दुसरा हप्ता मिळावा.शेतकऱ्यांना मातीत गाडण्यासाठी कारखानदार, केंद्र सरकार आणि विरोधीपक्ष हातात हात घालून काम करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. आर. डी. माहुली यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कारखानदारांसमोर निर्माण झालेल्या समस्यांचा पाढा वाचला.यावेळी संचालक कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, शैलेश पाटील, हणमंत माळी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, स्वाभिमानीचे आप्पासाहेब पाटील, अॅड. एस. व्ही. संदे, भागवत जाधव उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने