पवार पंतप्रधान तर जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:17+5:302021-06-11T04:18:17+5:30
इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, शहाजी पाटील, अरुण कांबळे, ...

पवार पंतप्रधान तर जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावेत
इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, शहाजी पाटील, अरुण कांबळे, खंडेराव जाधव, संजय कोरे, छाया पाटील, रोझा किणीकर, संग्राम पाटील, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करत नेत्यांना पाठबळ देण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार देशाचे पंतप्रधान तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
येथील राष्ट्रवादी भवनमध्ये वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व केक कापून पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, प्रदेश सरचिटणीस अरुण कांबळे, पक्ष प्रतोद संजय कोरे, नगरसेवक खंडेराव जाधव, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, महिला जिल्हाध्यक्ष छाया पाटील, शहराध्यक्ष रोझा किणीकर उपस्थित होत्या.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून राज्याला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांना आपण सर्वांनी एकसंघपणे पाठबळ द्यावे लागेल. नगरपालिकेसह सर्व निवडणुका प्रचंड ताकदीने लढण्याची, जिंकण्याची व्यूहरचना करावी लागेल. भविष्यात सर्वांना बरोबर घेऊन तालुक्यातील पक्ष संघटन अधिक मजबूत करू.
राज्य सरचिटणीस अरुण कांबळे म्हणाले, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत काम करणे, हे मोठ्या भाग्याचे आहे. संजय कोरे, खंडेराव जाधव, संग्राम पाटील, छाया पाटील, रोझा किणीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. शहाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. खासदार शरद पवार हे देशाचे पंतप्रधान तर जयंत पाटील राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सुभाष सूर्यवंशी, आनंदराव पाटील, अॅड. विश्वासराव पाटील, एम. जे. पाटील, संजय पाटील, प्रा. कृष्णा मंडले, रफिक पठाण, सचिन कोळी, स्वरूप मोरे, प्रकाश कांबळे, शैलजा जाधव, वैशाली पाटील, प्रियांका साळुंखे, सागर चव्हाण, विशाल सूर्यवंशी, मोहन भिंगार्डे, विनायक यादव, विनायक कदम, शुभम पाटील उपस्थित होते. गोपाळ नागे यांनी आभार मानले.