शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सांगली बाजार समितीत पतंगराव-घोरपडे गटाचे मनोमीलन, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांचेही समर्थन, संजयकाकांना केले दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 17:16 IST

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती प्रशांत शेजाळ यांच्या निवडीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम आणि भाजपचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे गटात संघर्ष होऊन फाटाफूट झाली होती. मात्र आता शेजाळ यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन पदाधिकारी निवडीसाठी पतंगराव आणि घोरपडे गटाचे मनोमीलन झाले आहे.

ठळक मुद्देविशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांचेही समर्थन, संजयकाकांना केले दूरवर्षभरापासून बाजार समितीच्या सत्ताधारी संचालकांत फूट मिरज तालुक्यास  सभापतिपदाची संधीबारा संचालक सहलीवर, काकांच्याही संपर्कात!

अशोक डोंबाळे 

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती प्रशांत शेजाळ यांच्या निवडीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम आणि भाजपचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे गटात संघर्ष होऊन फाटाफूट झाली होती. मात्र आता शेजाळ यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन पदाधिकारी निवडीसाठी पतंगराव आणि घोरपडे गटाचे मनोमीलन झाले आहे.

वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जयश्रीताई पाटील गटांचेही त्यांना समर्थन आहे. तथापी खासदार संजयकाका पाटील गटाला दूर ठेवण्यात आले आहे.जत, कवठेमहांकाळ आणि मिरज हे तीन तालुके बाजार समितीचे कार्यक्षेत्र असल्याने सभापतीपद प्रत्येक तालुक्याला देण्याचा निर्णय यापूर्वी झाला आहे. वर्षभरापासून बाजार समितीच्या सत्ताधारी संचालकांत फूट पडली आहे. सभापतीपदी पहिल्यांदा जत तालुक्याला संधी मिळाली होती.

कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यामध्ये पद देण्यावरून मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून विशाल पाटील आणि पतंगराव कदम गटात पुन्हा मतभेद झाले होते. डॉ. कदम यांच्या नाराजीमुळे विशाल पाटील गटाला संधी न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

तत्पूर्वी विशाल पाटील गटाने संचालकांची जुळवाजुळव केली, त्यामुळे डॉ. कदम गटाला खा. संजयकाका पाटील आणि जयश्रीताई मदन पाटील गटाची मदत घ्यावी लागली. त्यानंतर सभापतीपदी शेजाळ व उपसभापती रामगोंडा संती यांची बिनविरोध निवड झाली. शेजाळ यांच्या निवडीनंतर घोरपडे आणि विशाल पाटील गट पतंगराव कदम गटापासून दुरावले होते.आता एक वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे विद्यमान सभापती प्रशांत शेजाळ यांनी राजीनामा दिला आहे. नूतन सभापती आणि उपसभापती निवडीचा कार्यक्रम येत्या चार दिवसांत जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच बाजार समितीमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

नूतन पदाधिकारी निवडीवेळी बाजार समिती संचालकांमध्ये फूट पडू नये, यासाठी पतंगराव व घोरपडे गटाने बैठक घेऊन एकसंध राहण्याचा निश्चय केला आहे. या बैठकीस विशाल पाटील आणि जयश्रीताई पाटील समर्थक संचालकही उपस्थित होते.

सभापती व उपसभापती निवडीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील समर्थकांना दूर ठेवण्याचे धोरण ठरले आहे. याला संचालकांनी दुजोरा दिला आहे. भविष्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुका समोर ठेवून काँग्रेसच्या नेत्यांनी एकसंध राहून भाजपला शह देण्याची राजकीय खेळी केली आहे.

काँग्रेसच्या एकीला भाजप नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाने समर्थन दिले आहे. घोरपडे यांनी संजयकाका पाटील यांना दूर ठेवून एकत्र येण्यास सकारात्मक भूमिका घेतली आहे. बाजार समितीमधील काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या एकीचे जत, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यातील राजकारणाला बळ मिळणार आहे. परंतु, काँग्रेसमधील सर्व गटांची एकी भविष्यात कायम राहील का, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कवठेमहांकाळ नगरपालिका निवडणुका पतंगराव कदम गट आणि भाजपचे संजयकाका पाटील गटाने तडजोडी करून लढविल्या होत्या. त्यावेळीपासून पतंगराव आणि संजयकाकांचेही सूर जमले होते. बहुतांशी कार्यक्रमातही पतंगराव आणि संजयकाका एकत्र दिसत होते. संजयकाकांच्या मध्यस्थीने बाजार समितीत भाजपच्या नेत्यांनीही हजेरी लावली होती. 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख या नेत्यांच्या साक्षीने संजयकाकांनी पतंगरावांना कायमस्वरूपी बाजार समितीत साथ देण्याचे आवाहन केले होते. संजयकाकांनी दोन्ही कार्यक्रमात अजितराव घोरपडेंवर सडकून टीका केली होती. पतंगराव-संजयकाका यांच्यातील एकीमुळे दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा येईल, असे वाटत नव्हते. पण, नूतन पदाधिकारी निवडीत काँग्रेसच्या सर्व गटांनी आणि अजितराव घोरपडे समर्थक संचालकांनी एकत्र येऊन संजयकाकांना दूर ठेवण्याची सूचना मांडली.

संचालकांच्या सूचनेला काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आणि घोरपडे यांनीही सहमती दिले आहे. नेत्यांच्या मनोमीलनानंतर लगेच बाजार समितीमधील बारा संचालक कर्नाटकच्या सहलीवर गेले आहेत. बाजार समिती सभापती निवडीदिवशीच हे संचालक परत येणार आहेत. बाजार समिती बदलाच्या निमित्ताने मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.मिरज तालुक्यास सभापतिपदाची संधीजत, कवठेमहांकाळ तालुक्यानंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाची संधी आता मिरज तालुक्याला मिळणार आहे. यामध्ये सभापतिपदाच्या शर्यतीत काँग्रेसचे दिनकर पाटील, वसंतराव गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुमार पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

असे असले तरीही अजितराव घोरपडे गटाचे जीवन पाटील, दीपक शिंदे यांच्या नावांचाही विचार होऊ शकतो. त्यामुळे पदांच्या या शर्यतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बारा संचालक सहलीवरसंतोष पाटील, रामगोंड संती, अभिजित चव्हाण, अजित बनसोडे, दिनकर पाटील, वसंतराव गायकवाड, जयश्री यमगर, जीवन पाटील, दीपक शिंदे, अण्णासाहेब कोरे, दयगोंड बिराजदार, अण्णासाहेब कोरे, कुमार पाटील आदी संचालक कर्नाटकच्या सहलीवर गेले आहेत. जीवन पाटील शनिवारी परत सांगलीला आले असून, ते पुन्हा उर्वरित संचालक व विद्यमान सभापती प्रशांत शेजाळ यांना घेऊन जाणार आहेत. हे संचालक निवडीच्या दिवशीच सहलीवरून परत येणार आहेत.काकांच्याही संपर्कात!बाजार समितीमध्ये सध्या खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाचा एकही संचालक नाही. पण, अप्रत्यक्षरित्या काही संचालक त्यांच्या संपर्कात आहेत. यामुळे बाजार समिती सभापती निवडीमध्ये अचानक काहीही घडामोडी घडू शकतात, अशी चर्चा बाजार समितीमध्ये रंगली आहे.बाजार समितीमधील पक्षीय बलाबलपतंगराव कदम गट : प्रशांत शेजाळ, संतोष पाटील, रामगोंड संती, अभिजित चव्हाण, अजित बनसोडेजयश्रीताई मदन पाटील गट : दिनकर पाटील, वसंतराव गायकवाडअजितराव घोरपडे गट : तानाजी पाटील, जयश्री यमगर, जीवन पाटील, दीपक शिंदे.विशाल पाटील गट : अण्णासाहेब कोरेस्वाभिमानी शेतकरी संघटना : कुमार पाटीलव्यापारी गट : मुजीर जांभळीकर, शीतल पाटीलहमाल गट : बाळासाहेब बंडगरजनस्वराज्य गट : दयगोंड बिराजदार

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमSangliसांगलीagricultureशेतीAjitrao Ghorpadeअजितराव घोरपडे