शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

Sangli: ३० तास स्टेशनवर 'तो' बेशुद्ध होता अन् दुर्लक्षामुळे गेला जीव; किर्लोस्कवाडीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना

By अविनाश कोळी | Updated: April 29, 2025 19:12 IST

स्टेशन प्रबंधक यांना आरपीआय व भाजपच कार्यकर्त्यांकडून मागणीचे निवेदन 

किर्लोस्करवाडी : येथील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर शनिवारी २६ ते रविवार दि. २७ एप्रिलपर्यंत तब्बल ३० तास एक प्रवासी बेशुद्ध अवस्थेत पडून होता. त्याच्याकडे ना रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले ना अन्य कुणी. त्यामुळे त्याचा जीव गेला. याप्रकरणी आरपीआय व भाजपच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला आहे.  येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक नागरिक बेशुद्ध अवस्थेत आढळला. तो प्रवासी म्हणून तिथे उतरला होता. ३० तासानंतर काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यावर रेल्वे प्रशासनाने १०८ ला फोन करून सांगली सिव्हिल येथे त्याला पाठवून दिले. परंतु उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. या व्यक्तीवर वेळेत प्रथमोपचार झाले असते तर त्या व्यक्तीचा जीव वाचला असता. दररोज हजारो प्रवासी असणाऱ्या या स्टेशनवर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिस यांचा वावर असतो. निष्काळजीपणामुळे निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

संबंधित प्रकरणात त्या दिवशी ड्युटीवर असलेले स्टेशन मास्तर आणि रेल्वे पोलिस अधिकारी यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप अल्पसंख्यांक मोर्चा आणि आरपीआयच्यावतीने स्टेशन प्रबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी धनंजय माने, निहाल नदाफ, राजू मुजावर हजर होते.

..तर तीव्र आंदोलन करुदहा दिवसांत सदर अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अमीर पठाण यांनी दिला आहे. 

सदरच्या व्यक्तीला बाहेरच्या कुणीतरी आणून सोडले असावे. आम्ही त्याला चौकशी करून काही फळे खायला दिली होती. स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. - मुरलीधर, स्टेशन प्रबंधक.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेpassengerप्रवासीDeathमृत्यू