शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
2
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
3
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
4
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
5
रुबलच नाही तर चिनी चलन वापरून भारत करतंय तेल खरेदीचं पेमेंट; रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा
6
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
7
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
8
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
9
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
10
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?
11
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
12
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...
13
Diwali 2025: गोसेवा ही दत्त कृपेची गुरुकिल्ली? वसुबारसेच्या मुहूर्तावर जाणून घ्या 'हे' गुपित!
14
FASTag वार्षिक पास २ महिन्यांतच ठरला 'सुपरहिट'; २५ लाख युजर्सचा आकडा पार, किती झालं ट्रान्झॅक्शन?
15
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
16
वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल
17
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
18
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
19
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
20
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल

Sangli: पावसामुळे पानमळ्यांना फटका, पान उत्पादक चिंतेत; मिरज तालुक्यात किती हेक्टर क्षेत्र.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:15 IST

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान

दिलीप कुंभारनरवाड : मिरज तालुक्यातून होणाऱ्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील पान उत्पादक शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडला असून भविष्यात पानमळे टिकणार का? हा चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मिरज तालुक्यात सुमारे १९० हेक्टर क्षेत्रावर पानमळे असून यामध्ये प्रामुख्याने नरवाड, बेडग, मालगाव, आरग याठिकाणी सुमारे ८५ हेक्टर पानमळे आहेत. मे महिन्यांपासून पावसाने तालुक्याला उसंत दिली नसल्याने याचा सर्वाधिक फटका पानमळा पिकास बसला आहे. कारण पानमळ्यातील खाऊच्या पानवेलीला पाणी अधिक चालत नाही. पानवेलींची मुळे नाजूक असल्याने पावसाचे प्रमाण जास्त होऊन मुळे कुजून जातात. परिणामी पानवेली सुकून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. असाच प्रकार चालू पावसाने झाला आहे. सतत पडणाऱ्या पावसाने पानवेलींच्या मुळ्या कुजून याचे स्पष्ट परिणाम येणाऱ्या हिवाळ्यात जाणवू लागण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. अगोदरच म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे पाण्याच्या पातळ्या जमिनीलगत आल्या असताना सध्या पडत असलेल्या पावसामुळे पानवेलींचे आयुर्मान कमी होणार आहे. पानवेलींच्या मुळ्या सुकू लागताच पानवेलींचा खुडा मंदावून अखेर बंद पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.

पानमळ्याला पावसाळ्यातील पाणी नियोजन अतिशय काळजीपूर्वक करणे गरजेचे असून पावसाळ्यात पानमळ्याच्या वाफ्यात पाणी अजिबात साठू न देता ते पानमळ्याच्या बाहेर काढून दिले पाहिजे. -संगीता पवार, सहाय्यक कृषी अधिकारी 

चालू वर्षी पानमळा पिकास पाऊस जास्त झाल्याने पानवेलींची मुळे कुजून शेतकऱ्यांचे येणाऱ्या हिवाळ्यात पूर्णपणे नुकसान होणार असून याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन पानमळा पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. -मधूकर जाधव, पान उत्पादक शेतकरी, नरवाड