शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पावसामुळे पानमळ्यांना फटका, पान उत्पादक चिंतेत; मिरज तालुक्यात किती हेक्टर क्षेत्र.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:15 IST

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान

दिलीप कुंभारनरवाड : मिरज तालुक्यातून होणाऱ्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील पान उत्पादक शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडला असून भविष्यात पानमळे टिकणार का? हा चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मिरज तालुक्यात सुमारे १९० हेक्टर क्षेत्रावर पानमळे असून यामध्ये प्रामुख्याने नरवाड, बेडग, मालगाव, आरग याठिकाणी सुमारे ८५ हेक्टर पानमळे आहेत. मे महिन्यांपासून पावसाने तालुक्याला उसंत दिली नसल्याने याचा सर्वाधिक फटका पानमळा पिकास बसला आहे. कारण पानमळ्यातील खाऊच्या पानवेलीला पाणी अधिक चालत नाही. पानवेलींची मुळे नाजूक असल्याने पावसाचे प्रमाण जास्त होऊन मुळे कुजून जातात. परिणामी पानवेली सुकून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. असाच प्रकार चालू पावसाने झाला आहे. सतत पडणाऱ्या पावसाने पानवेलींच्या मुळ्या कुजून याचे स्पष्ट परिणाम येणाऱ्या हिवाळ्यात जाणवू लागण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. अगोदरच म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे पाण्याच्या पातळ्या जमिनीलगत आल्या असताना सध्या पडत असलेल्या पावसामुळे पानवेलींचे आयुर्मान कमी होणार आहे. पानवेलींच्या मुळ्या सुकू लागताच पानवेलींचा खुडा मंदावून अखेर बंद पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.

पानमळ्याला पावसाळ्यातील पाणी नियोजन अतिशय काळजीपूर्वक करणे गरजेचे असून पावसाळ्यात पानमळ्याच्या वाफ्यात पाणी अजिबात साठू न देता ते पानमळ्याच्या बाहेर काढून दिले पाहिजे. -संगीता पवार, सहाय्यक कृषी अधिकारी 

चालू वर्षी पानमळा पिकास पाऊस जास्त झाल्याने पानवेलींची मुळे कुजून शेतकऱ्यांचे येणाऱ्या हिवाळ्यात पूर्णपणे नुकसान होणार असून याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन पानमळा पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. -मधूकर जाधव, पान उत्पादक शेतकरी, नरवाड