शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

...अन्यथा उद्धव ठाकरेंनी सत्ता सोडावी : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 10:20 IST

हे सरकार येत्या तेरा दिवसांत पडेल, असे भाकित भाजप नेते नारायण राणे यांनी केले आहे. कदाचित हे भविष्य खरे ठरेल, असे मला वाटते. तर देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री असल्याने तेसुद्धा याची प्रतीक्षा करीत असल्याचेही आठवले म्हणाले.

सांगली : तेरा दिवसांत सरकार पडेल, असे भाकित नारायण राणे यांनी केले आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गोष्टीची वाट पाहात आहेत. कधी सरकार पडेल आणि कधी मी मुख्यमंत्रिपदावर विराजमान होईन, याची प्रतीक्षा त्यांना लागली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळावीत, अन्यथा सत्ता सोडावी, असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ठाकरे सरकारवर निशाणा साधला.बहुजन समता पार्टीच्यावतीने सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात मेळावा पार पडला. यावेळी आठवले म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक होण्यासाठी मागील भाजप सरकारने शंभर कोटींचा निधी जाहीर केला होता. आता सरकार महाविकास आघाडीचे आले आहे. त्यामुळे निधी अडचणी येत आहेत. हे सरकार येत्या तेरा दिवसांत पडेल, असे भाकित भाजप नेते नारायण राणे यांनी केले आहे. कदाचित हे भविष्य खरे ठरेल, असे मला वाटते. तर देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री असल्याने तेसुद्धा याची प्रतीक्षा करीत असल्याचेही आठवले म्हणाले.

तर मिरज येथे दुसरी अखिल भारतीय बौध्द धम्म महापरिषद पार पडली असून, यावेळी बोलताना आठवलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ठाकरे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करतो म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य पद्धतीने केली नसल्याने राज्यभर सुरु असलेल्या भाजपच्या आंदोलनास माझा पाठींबा आहे. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळावीत, अन्यथा सत्ता सोडावी असा खोचक टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.