शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

राजकारणापेक्षा विरोधकांनी केंद्राकडून मदत आणावी : विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 11:02 IST

राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढ्यात आरोग्य, पोलीस, प्रशासन यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी चांगले काम करत आहेत. त्यांचे मनोबल वाढेल, अशी भूमिका त्यांनी घ्यावी, असा सल्लाही कदम यांनी दिला.

ठळक मुद्देराबणाऱ्या यंत्रणेचे मनोबल वाढेल, अशी भूमिका घ्यावी

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत करण्याऐवजी पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन करणाºया विरोधकांनी राजकारण करण्यापेक्षा केंद्राकडून महाराष्टला भरीव मदत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.

ते म्हणाले की, कोरोनाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विरोधक करीत आहेत. राज्य शासन शक्य तेवढ्या चांगल्या उपाययोजना करीत आहे. याऊलट गतवर्षी महापुराच्या काळात केंद्र सरकारने व तत्कालीन राज्य सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकरी, गोरगरिबांना किती मदत केली, हे सर्वांना माहीत आहे. कोरोनाच्या संकटात एकीकडे मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत करण्याचे सोडून विरोधक दुसºयाच गोष्टीचे राजकारण करीत आहेत.

राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. तो कुठल्या पक्षासाठी, जातीधर्मासाठी नाही. त्यामुळे या काळात कुणी राजकारण, प्रदर्शन, आंदोलन करू नये. विरोधकांनी मुख्यमंत्री निधीला मदत करण्याऐवजी पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन करून पक्षीय राजकारण करण्यापेक्षा केंद्राकडून राज्यात जास्तीत-जास्त मदत आणण्याबाबत मोलाची भूमिका पार पाडावी. राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढ्यात आरोग्य, पोलीस, प्रशासन यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी चांगले काम करत आहेत. त्यांचे मनोबल वाढेल, अशी भूमिका त्यांनी घ्यावी, असा सल्लाही कदम यांनी दिला.

कोरोनामुळे राज्यात अडकलेल्या इतर राज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यात, गावी परत जाण्यासाठी याद्या तयार करून त्यांच्यासाठी केंद्राने रेल्वेची सोय करावी, अशी वारंवार मागणी करूनही उत्तर प्रदेश, कर्नाटकसारख्या राज्यांनी गेले २० दिवस टाळाटाळ केली, हे दुर्दैवी आहे, अशी टीका कदम यांनी केली.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रालयातच असतातमुख्यमंत्री उध्दव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत, या विरोधकांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे मंत्रालयात थांबून चांगले काम करत आहेत. तसेच सर्व मंत्रीही आपआपल्या खात्याच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात चांगले काम करत आहेत. लोकांच्या सेवेसाठी सरकार मनापासून काम करत आहे. यापुढेही हे काम चांगल्या पद्धतीने सुरू राहील.

टॅग्स :MLAआमदारfundsनिधीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा