शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणापेक्षा विरोधकांनी केंद्राकडून मदत आणावी : विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 11:02 IST

राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढ्यात आरोग्य, पोलीस, प्रशासन यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी चांगले काम करत आहेत. त्यांचे मनोबल वाढेल, अशी भूमिका त्यांनी घ्यावी, असा सल्लाही कदम यांनी दिला.

ठळक मुद्देराबणाऱ्या यंत्रणेचे मनोबल वाढेल, अशी भूमिका घ्यावी

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत करण्याऐवजी पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन करणाºया विरोधकांनी राजकारण करण्यापेक्षा केंद्राकडून महाराष्टला भरीव मदत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.

ते म्हणाले की, कोरोनाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विरोधक करीत आहेत. राज्य शासन शक्य तेवढ्या चांगल्या उपाययोजना करीत आहे. याऊलट गतवर्षी महापुराच्या काळात केंद्र सरकारने व तत्कालीन राज्य सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकरी, गोरगरिबांना किती मदत केली, हे सर्वांना माहीत आहे. कोरोनाच्या संकटात एकीकडे मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत करण्याचे सोडून विरोधक दुसºयाच गोष्टीचे राजकारण करीत आहेत.

राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. तो कुठल्या पक्षासाठी, जातीधर्मासाठी नाही. त्यामुळे या काळात कुणी राजकारण, प्रदर्शन, आंदोलन करू नये. विरोधकांनी मुख्यमंत्री निधीला मदत करण्याऐवजी पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन करून पक्षीय राजकारण करण्यापेक्षा केंद्राकडून राज्यात जास्तीत-जास्त मदत आणण्याबाबत मोलाची भूमिका पार पाडावी. राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढ्यात आरोग्य, पोलीस, प्रशासन यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी चांगले काम करत आहेत. त्यांचे मनोबल वाढेल, अशी भूमिका त्यांनी घ्यावी, असा सल्लाही कदम यांनी दिला.

कोरोनामुळे राज्यात अडकलेल्या इतर राज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यात, गावी परत जाण्यासाठी याद्या तयार करून त्यांच्यासाठी केंद्राने रेल्वेची सोय करावी, अशी वारंवार मागणी करूनही उत्तर प्रदेश, कर्नाटकसारख्या राज्यांनी गेले २० दिवस टाळाटाळ केली, हे दुर्दैवी आहे, अशी टीका कदम यांनी केली.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रालयातच असतातमुख्यमंत्री उध्दव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत, या विरोधकांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे मंत्रालयात थांबून चांगले काम करत आहेत. तसेच सर्व मंत्रीही आपआपल्या खात्याच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात चांगले काम करत आहेत. लोकांच्या सेवेसाठी सरकार मनापासून काम करत आहे. यापुढेही हे काम चांगल्या पद्धतीने सुरू राहील.

टॅग्स :MLAआमदारfundsनिधीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा