शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

राजकारणापेक्षा विरोधकांनी केंद्राकडून मदत आणावी : विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 11:02 IST

राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढ्यात आरोग्य, पोलीस, प्रशासन यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी चांगले काम करत आहेत. त्यांचे मनोबल वाढेल, अशी भूमिका त्यांनी घ्यावी, असा सल्लाही कदम यांनी दिला.

ठळक मुद्देराबणाऱ्या यंत्रणेचे मनोबल वाढेल, अशी भूमिका घ्यावी

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत करण्याऐवजी पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन करणाºया विरोधकांनी राजकारण करण्यापेक्षा केंद्राकडून महाराष्टला भरीव मदत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.

ते म्हणाले की, कोरोनाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विरोधक करीत आहेत. राज्य शासन शक्य तेवढ्या चांगल्या उपाययोजना करीत आहे. याऊलट गतवर्षी महापुराच्या काळात केंद्र सरकारने व तत्कालीन राज्य सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकरी, गोरगरिबांना किती मदत केली, हे सर्वांना माहीत आहे. कोरोनाच्या संकटात एकीकडे मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत करण्याचे सोडून विरोधक दुसºयाच गोष्टीचे राजकारण करीत आहेत.

राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. तो कुठल्या पक्षासाठी, जातीधर्मासाठी नाही. त्यामुळे या काळात कुणी राजकारण, प्रदर्शन, आंदोलन करू नये. विरोधकांनी मुख्यमंत्री निधीला मदत करण्याऐवजी पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन करून पक्षीय राजकारण करण्यापेक्षा केंद्राकडून राज्यात जास्तीत-जास्त मदत आणण्याबाबत मोलाची भूमिका पार पाडावी. राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढ्यात आरोग्य, पोलीस, प्रशासन यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी चांगले काम करत आहेत. त्यांचे मनोबल वाढेल, अशी भूमिका त्यांनी घ्यावी, असा सल्लाही कदम यांनी दिला.

कोरोनामुळे राज्यात अडकलेल्या इतर राज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यात, गावी परत जाण्यासाठी याद्या तयार करून त्यांच्यासाठी केंद्राने रेल्वेची सोय करावी, अशी वारंवार मागणी करूनही उत्तर प्रदेश, कर्नाटकसारख्या राज्यांनी गेले २० दिवस टाळाटाळ केली, हे दुर्दैवी आहे, अशी टीका कदम यांनी केली.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रालयातच असतातमुख्यमंत्री उध्दव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत, या विरोधकांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे मंत्रालयात थांबून चांगले काम करत आहेत. तसेच सर्व मंत्रीही आपआपल्या खात्याच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात चांगले काम करत आहेत. लोकांच्या सेवेसाठी सरकार मनापासून काम करत आहे. यापुढेही हे काम चांगल्या पद्धतीने सुरू राहील.

टॅग्स :MLAआमदारfundsनिधीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा