शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भरकटलेल्या वाटेवर विरोधीपक्ष, नागरी प्रश्नांबाबत सामाजिक संघटनाच दक्ष

By अविनाश कोळी | Updated: January 29, 2024 16:33 IST

पदरमोड करून आंदोलन

अविनाश कोळीलोकांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सत्तेच्या पटावर मुशाफिरी करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांचीच असते. मात्र, सत्ताधारी जर राजकारणातच मश्गुल राहिले तर विरोधी पक्षाने नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करावा, अशी अपेक्षा असते. सांगली जिल्ह्यातील अनेक नागरी प्रश्नांशी सर्वपक्षीय काडीमोड झाल्याने सामाजिक संघटनांना याचा भार आपल्या खांद्यावर घ्यावा लागला. रेल्वेस्थानक, उड्डाणपूल, रस्ते इतकेच काय नदीत पाणी आणण्यापर्यंतची कामे दबावगटाच्या माध्यमातून संघटना यशस्वीपणे करीत आहेत.सांगली : सांगली जिल्हा हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. दिग्गज नेत्यांचा व राज्यात दबदबा असणाऱ्या नेत्यांचा हा जिल्हा समजला जातो. आजही सत्ताधारी तसेच विरोधी गटाकडे तितकेच ताकदवान नेते आहेत. सत्तेत काेणीही असले तरी विरोधात असणाऱ्या नेत्यांनी काही वर्षांपूर्वीपर्यंत केलेली आंदोलने राज्यभर गाजली. दखल घ्यावीत, अशी आंदोलने करण्यापेक्षा निदर्शने, धरणे आंदोलनाची औपचारिकता पार पाडली जाते. पाठपुरावा करीत प्रश्न तडीस नेण्याची पद्धत राजकीय स्तरावर लोप पावत आहे.

राजकीय स्तरावर उदासीनतेचे वारे वाहत असताना सामाजिक संघटनांनी याचा भार खांद्यावर उचलत नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास सुरुवात केली. कृष्णा नदी पहापूर नियंत्रण कृती समितीने शनिवारी कृष्णा नदी कोरडी पडली म्हणून नदीत उतरून आंदोलन केले. दोन दिवसांपासून याचा बोभाटा झाल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग आली. कोयनेतून सोडलेले पाणी नंतर नदीत दाखलही झाले. तरीही पाण्याच्या गैरनियोजनाची पोलखोल या संघटनेने केलीच.सांगली रेल्वेस्थानकावर प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पादचारी पूल नसल्याबद्दल नागरिक जागृती मंचने आंदोलन केले. महाव्यवस्थापकांच्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी कोंडी केल्यानंतर प्रश्न सुटला. रेल्वे प्रशासनाने दखल घेत स्थानकावरील कामे मंजूर केली. मिरजेच्या रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न जिवंत ठेवून राजकीय नेत्यांची कोंडी करण्याचे कामही याच संघटना करीत आहेत.

पदरमोड करून आंदोलन

सांगलीतील नागरिक जागृती मंच, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती, मिरज शहर सुधार समिती, काही रेल्वे प्रवासी संघटना नागरिकांच्या प्रश्नांसाठी झटताना दिसत आहेत. कागदपत्रांची जमावाजमव करण्यापासून प्रवास करण्यापर्यंत पडरमोड करून ते कर्तव्यभावनेने प्रश्नांचा पाठलाग करतात.

विरोधी पक्षांचे चाललेय काय?विरोधात असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी केवळ राजकारणात व्यस्त दिसताहेत. महाआघाडी म्हणून या पक्षांनी कधीही एकत्र येत नागरी प्रश्नावर एकही आंदोलन केले नाही. प्रश्नांचा पाठपुरावा करून किंवा सत्ताधाऱ्यांना जेरीस आणून प्रश्न सोडविल्याचेही ऐकिवात नाही.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण