शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

राजारामबापू-वसंतदादांमध्ये केवळ वैचारिक मतभेद : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 13:58 IST

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व लोकनेते राजारामबापू पाटील यांचे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. या दोन्ही ...

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व लोकनेते राजारामबापू पाटील यांचे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय नव्हे, तर वैचारिक मतभेद होते. दोघांनी मिळूनच ते वाद संपुष्टात आणले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या वतीने सांगलीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात लोकनेते राजारामबापू पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण मंगळवारी आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अनिल बाबर, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण लाड उपस्थित होते.पवार म्हणाले, “एमआयडीसीच्या माध्यमातून राज्यभर जो उद्योग विस्तार झाला, त्यात तत्कालीन उद्योगमंत्री म्हणून राजारामबापूंचे योगदान महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र काँग्रेसची धुरा सांभाळत ते राज्याच्या काेनाकोपऱ्यांत पोहोचले. ग्रामविकास, महसूल व उद्योग अशा खात्यांचे मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी घेतलेले अनेक निर्णय ऐतिहासिक ठरले. लोकांच्या प्रश्नांसाठी मेहनत घेताना ते थकले नाहीत. जळगाव ते नागपूरदरम्यान जी पहिली शेतकरी दिंडी निघाली, त्यात आम्ही सगळे थकून थांबलो; पण, अविश्रांत यात्रा पूर्ण करणारे केवळ राजारामबापू व प्रा. एन. डी. पाटीलच होते.”

बापू - दादांमधील फरकशरद पवार म्हणाले, “वसंतदादा व राजारामबापूंच्या कार्यपद्धतीत एक फरक दिसून येतो. वसंतदादा बहुतांश काळ सत्तेत होते. सत्तेत राहून त्यांनी विकासात योगदान दिले. मात्र, राजारामबापू यांनी विरोधात असतानाही विकासकामे केली.”

सांगली जिल्हा चमत्कारिक“सांगली जिल्हा मला नेहमी चमत्कारिक वाटतो. येथील लोक कधी काय करतील, याचा नेम नाही. देशातील पहिली सर्कस याच जिल्ह्यातील व्यक्तीने काढली. खानापूर, कडेगाव, आटपाडी, जतमधील लोक तर देशाच्या काेनाकोपऱ्यात दिसतात. लाचारी न पत्करता स्वाभिमानाने जगणारे लोक इथे मला दिसतात,” असे कौतुक पवार यांनी केले.

टॅग्स :SangliसांगलीSharad Pawarशरद पवार