शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

राजारामबापू-वसंतदादांमध्ये केवळ वैचारिक मतभेद : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 13:58 IST

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व लोकनेते राजारामबापू पाटील यांचे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. या दोन्ही ...

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व लोकनेते राजारामबापू पाटील यांचे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय नव्हे, तर वैचारिक मतभेद होते. दोघांनी मिळूनच ते वाद संपुष्टात आणले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या वतीने सांगलीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात लोकनेते राजारामबापू पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण मंगळवारी आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अनिल बाबर, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण लाड उपस्थित होते.पवार म्हणाले, “एमआयडीसीच्या माध्यमातून राज्यभर जो उद्योग विस्तार झाला, त्यात तत्कालीन उद्योगमंत्री म्हणून राजारामबापूंचे योगदान महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र काँग्रेसची धुरा सांभाळत ते राज्याच्या काेनाकोपऱ्यांत पोहोचले. ग्रामविकास, महसूल व उद्योग अशा खात्यांचे मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी घेतलेले अनेक निर्णय ऐतिहासिक ठरले. लोकांच्या प्रश्नांसाठी मेहनत घेताना ते थकले नाहीत. जळगाव ते नागपूरदरम्यान जी पहिली शेतकरी दिंडी निघाली, त्यात आम्ही सगळे थकून थांबलो; पण, अविश्रांत यात्रा पूर्ण करणारे केवळ राजारामबापू व प्रा. एन. डी. पाटीलच होते.”

बापू - दादांमधील फरकशरद पवार म्हणाले, “वसंतदादा व राजारामबापूंच्या कार्यपद्धतीत एक फरक दिसून येतो. वसंतदादा बहुतांश काळ सत्तेत होते. सत्तेत राहून त्यांनी विकासात योगदान दिले. मात्र, राजारामबापू यांनी विरोधात असतानाही विकासकामे केली.”

सांगली जिल्हा चमत्कारिक“सांगली जिल्हा मला नेहमी चमत्कारिक वाटतो. येथील लोक कधी काय करतील, याचा नेम नाही. देशातील पहिली सर्कस याच जिल्ह्यातील व्यक्तीने काढली. खानापूर, कडेगाव, आटपाडी, जतमधील लोक तर देशाच्या काेनाकोपऱ्यात दिसतात. लाचारी न पत्करता स्वाभिमानाने जगणारे लोक इथे मला दिसतात,” असे कौतुक पवार यांनी केले.

टॅग्स :SangliसांगलीSharad Pawarशरद पवार