शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील चिंतामणीनगर पुलावरून एकेरी वाहतूक ३० सप्टेंबरला सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 12:02 IST

रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण : दिवाळीपूर्वी १०० टक्के काम पूर्ण

सांगली : चिंतामणीनगर रेल्वे पुलाचे काम ८० ते ८५ टक्के पूर्ण झाले आहे. या पुलावरून एकेरी वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत सुरू होईल, असा विश्वास पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुरेश पाखरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच दिवाळीपूर्वी पुलाचे १०० टक्के काम पूर्ण होईल, असाही त्यांनी अंदाज वर्तविला आहे.सांगली ते माधवनगर रस्त्यावर चिंतामणीनगर येथे रेल्वेच्या उड्डाणपुलाचे काम १० जून २०२३ पासून सुरू झाले आहे. १० जानेवारी २०२४ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. या कालावधीत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मूळ रेल्वे पूल काढून तेथे नवीन रेल्वे पूल बांधण्यासाठी रेल्वेकडून १५ कोटी रुपयांची तरतूद होती. तोपर्यंत स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार दोन बोगदे आणि मूळ पुलाच्या रुंदीकरणाची राज्य शासनाकडून सूचना आली.त्यानुसार वाढीव कामाचा आराखडा करण्यासह मंजुरी मिळण्यास दोन महिने काम थांबले. वाढीव काम १० कोटींपर्यंतचे झाले. या सर्व कारणांमुळेच रेल्वे पुलाच्या कामाला उशीर झाल्याचे रेल्वे प्रशासनाचे मत आहे. सध्या ८० ते ८५ टक्के काम पूर्ण असून, ३० सप्टेंबरपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होईल, असा विश्वास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या कारणांमुळे पुलाचे काम लांबलेरेल्वेच्या कामात कधीही दिरंगाई होत नाही, असा नागरिकांचा विश्वास आहे. याबद्दल रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चिंतामणीनगर रेल्वे पूल काढणे आणि नवीन बांधण्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद होती. कामाला सुरुवात केल्यानंतर रुंदीकरण, दोन बोगद्यांमुळे काम थांबले. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाढीव काम १० कोटी रुपयांचे झाले. या मंजुरीची कागदपत्रे येणे आणि निधी मिळण्यात अडचणी झाल्यामुळे काम थांबले होते. वाढीव काम करण्यामुळे पुलाचे काम मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही, असे रेल्वे प्रशासनाचे मत आहे.

रेल्वेला पाच कोटीच मिळालेसार्वजनिक बांधकाम आणि महापालिकेच्या वाढीव कामासाठी १० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. हा सर्व निधी रेल्वेकडे भरल्यानंतर कामाची निविदा काढण्यासह सर्व प्रक्रिया राबविण्यात येते. पण, महापालिका आणि बांधकाम विभागाकडून आतापर्यंत केवळ पाच कोटी रुपये मिळाले आहेत. उर्वरित पाच कोटी आजही मिळाले नाहीत. तरीही प्रवाशांची गैरसोय नको, म्हणून रेल्वे प्रशासन पुढाकार घेऊन काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

उशिर का झाला?जून, जुलै महिन्यात संततधार पाऊस झाला. या पावसामध्ये काम करणे पुलाच्या मजबुतीसाठी धोकादायक आहे. कारण, मातीत पाणी मुरत असतांना काम करणे चुकीचे असल्यामुळे हळूहळू काम सुरू होते. पावसाने उघडीप दिल्यापासून पुलाचे काम गतीने सुरू आहे. एकरी वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत चालू होणार आहे. त्यादृष्टीने काम पूर्ण झाले आहे, असे पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुरेश पाखरे यांनी सांगितले.

जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे पूल थांबवाचिंतामणीनगर पुलाचे काम युद्धपातळीवर चालू आहे. पुलाच्या कामात घाईगडबड नकोच, असे अभियंत्यांचे मत आहे. चिंतामणीनगरच्या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे पुलाचे काम सुरू करू नये, असेही अभियंत्यांचे मत आहे.

टॅग्स :Sangliसांगली