पेठजवळ महामार्गालगतच्या शेतात एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:53+5:302021-01-08T05:29:53+5:30

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगत शेतात सडलेल्या अवस्थेतील शीर धडावेगळे होऊन पडलेला मृतदेह आढळून आला. ...

One commits suicide in a field near the highway | पेठजवळ महामार्गालगतच्या शेतात एकाची आत्महत्या

पेठजवळ महामार्गालगतच्या शेतात एकाची आत्महत्या

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगत शेतात सडलेल्या अवस्थेतील शीर धडावेगळे होऊन पडलेला मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवारी सकाळी ११च्या सुमारास उघडकीस आली. याच शेतातील एका झाडाला इलेक्ट्रिक वायरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. सुरेश कोंडीबा कोरे (वय ४५, रा. साखराळे) असे मृताचे नाव आहे. १५ दिवसांपासून तो बेपत्ता झाला होता.

सुरेश मोरे याचा २० डिसेंबर रोजी घरामध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादातून तो दुपारी १२च्या सुमारास घरातून बाहेर पडला. रात्री तो परत न आल्याने कुटुंबाने शोधाशोध केली. त्यानंतर पत्नी कविता मोरे हिने पती सुरेश हे बेपत्ता झाल्याची पोलिसात वर्दी दिली. पेठ हद्दीत महामार्गालगत इस्लामपूरमधील गंगाराम रावजी शहा यांचे शेत आहे. या शेतामध्ये सगळीकडे झुडपे वाढलेली आहेत. याच शेतातील झाडास सुरेश याने इलेक्ट्रिक वायरने गळफास घेतला. या शेताच्या परिसरात कोणी जात नसल्याने त्याचा मृतदेह पूर्णपणे सडला होता. त्यातूनच त्याचे शीर धडावेगळे होऊन बाजुला पडले होते, तर झाडाला इलेक्ट्रिक वायरचा गळफास तसाच होता.

सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींच्या नोंद रजिस्टरमध्ये पाहणी करून या घटनेची माहिती मृत सुरेशचे चुलते पांडुरंग मोरे यांना कळविली. त्यांनी सुरेशचा मुलगा अर्जुन याला सोबत घेत घटनास्थळ गाठले. त्यावेळी सुरेशच्या अंगातील कपडे, स्वेटर आणि पादत्राणावरून हा मृतदेह सुरेश मोरे याचा असल्याचे ओळखले. मृत सुरेश याला मद्यपानाचे व्यसन होते. पांडुरंग मोरे यांनी पोलिसात वर्दी दिली आहे.

फोटो - ०४०१२०२१-आयएसएलएम-सुरेश मोरे

Web Title: One commits suicide in a field near the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.