शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

चला पंढरीला जाऊ...; आषाढीसाठी सांगलीतून २८० जादा बसेस

By अशोक डोंबाळे | Updated: June 24, 2023 15:43 IST

यंदा महिला वारकऱ्यांची संख्या वाढणार

सांगली : आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पंढरपूरला जाणे सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्यातील दहा एसटी आगांरातून २८० जादा बसेस सोडण्याचे नियोजन झाले आहे. वारीच्या कालावधीत ८६ लाख ८२ हजार ७८० रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरला जातात. यापूर्वी दिंड्यांमधून अनेकजण रवाना झाले असून, अजूनही आपापल्या नियोजनानुसार जात आहेत. एकादशीच्या दोन ते तीन दिवस आधी वारकऱ्यांची संख्या वाढते. त्यामुळे जिल्ह्यातील एसटीच्या दहा आगारांतून २८० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

असे आहे नियोजनआगार -     बसफेऱ्या - मिळणारे उत्पन्नसांगली          ३८              ५६८५०६मिरज            ३२              ६४४२८९इस्लामपूर     २९              ८२११०७तासगाव        २९             १४५२८२४विटा              २८             ६५७४१२जत               २८             ८४५२९२आटपाडी      २९             ९९३७००क.महांकाळ  २५            ६१३५५८शिराळा          २२           ६६७५११पलूस             १८            १४१८५८१एकूण            २८०          ८६८२७८०

यंदा महिला वारकऱ्यांची संख्या वाढणारएसटीने महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत दिली आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास उपलब्ध करून दिला असून, ६० वर्षांवरील नागरिकांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येतो. भरीव सवलत देण्यात येत असल्याने वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी वर्तवली.

२५ जून ते ४ जुलैपर्यंत जादा बसेस२९ जूनरोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे २५ जून ते ४ जुलैपर्यंत पंढरपूरसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. आवश्यक तेवढ्या प्रवाशांची भरती होताच बस पंढरपूरकडे रवाना करण्यात येणार आहे. गर्दी लक्षात घेऊन जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022